मी कोणी लेखक नाही, कवी नाही. जे काही थोडं फार वाचतो,पाहतो,ऐकतो,अनुभवतो आणि त्यात जे जाणवत आणि ज्याविषयी ४ लोकांसमोर काहीतरी व्यक्त करायचा प्रयत्न करतो असा छोटासा स्वच्छंदी.
भेट द्या...वाचा...शक्य असेल तर अभिप्राय द्या..!!
Uri हल्ला आणि सर्जिकल स्ट्राइक
पचवूनी झाले वार हजारो…! परी वार 'उरी'(#Uri) चा सहन न झाला…!!
ध्यास आम्हा जरी मांगल्याचा…! वसा न आमुचा षंढपणाचा…!!
तळपला सिंह तो सिमेवरचा…! प्रश्न आला जेव्हा स्वाभिमानाचा…!!
ब्लॉग सुरु करायच्या आधी लहान सहान लेख मी फेसबुक वर लिहायचो. त्यात सर्वात चांगला प्रतिसाद मिळालेला आणि मला स्वतःला खूप आवडलेल्या निवडक लेखापैकी एक म्हणजे "आजीचा राम". आत्ता ही राम मंदिराची प्राण प्रतिष्ठा, परवाच झालेली गोंदवलेकर महाराजांची पुण्यतिथी यामुळे परत एकदा लहानपणीच्या काही आठवणी जाग्या झाल्या. दरवर्षी राम नवमी ला उस्मानाबादच्या राम मंदिरात आजोबांचं कीर्तन असायचं. कित्येकदा शाळेला सुट्टी असेल तर मी त्यांच्या सोबत गेल्याच मला आठवतं. तेव्हा मला त्यातल काही कळायचं किंवा आवडायचं का हा प्रश्नच नव्हता. आम्ही भावंडं त्यांच्या सोबत जायचो ते खूप वेळा त्यांची काठी म्हणून किंवा कमी ऐकू येणाऱ्या कानाच यंत्र म्हणून. गीतरामायणचं काय तर, भावगीत भक्तीगीत देखील फारसे मला माहित ही नव्हते आणि कळत तर मुळीच नव्हते. पण त्या रामजन्मवेळेच्या काही मिनिट आधी किंवा नंतर, संगीत शिक्षण नसलेल्या पण गाऊन गाऊन ऐकायला गोड वाटेल इतक्या सुरेल आणि माईक नसला तरी किमान १०० -२०० माणसाला ऐकू जाईल अशा खणखणीत आवाजात ऐकू आलेला- " चैत्र मास त्यात शुद्ध नवमी ही तिथी….. गंधयुक्त
कोणती गोष्ट तुम्हाला कोणत्या विचार चक्रात घेऊन जाईल काही सांगता येत नाही. १४ तारखेला दुपारी व्हाट्स अँप ग्रुप ला आईने टाकलेला फोटो आला आणि खाली मेसेज होता, "आम्ही दिवेघाट पार केला. थोडा थकवा जाणवतोय पण बाकी सगळ ठीक". त्या क्षणापर्यंत कितीतरी मिश्र विचार डोक्यात घोळत होते. त्यात तुम्ही पहिला आणि महत्वाचा टप्पा पूर्ण केला याचा आनंद होता, पुढचा प्रवास कसा होईल याची काळजी होती. पण का माहित नाही तो अत्यंत भव्य, देखणा पांडुरंग पाहिला आणि निश्चिन्त झालो. लगेच मला भूतकाळातील दोन गोष्टींची आठवण झाली. सन २००१-०२ मी तिसरीत होतो. गुरुवार होता हे नक्की कारण युनिफॉर्म ला सुट्टी होती. अण्णा ( म्हणजे माझे आजोबा) मला सोडायला शाळेत येत होते. तेव्हा रिक्षा गाडी हे लाड नव्हते, चालतं आजोबांचं बोट पकडून शाळेत जायचं हा रोजचा शिरस्ता होता. वाटेत बाबांचे कोणीतरी मित्र भेटले आणि चला सोडतो दोघांना म्हणाले. मी दोघांच्या मधे बसलो होतो. अजून थोडा रस्ता सरलां न सरला तेव्हा आजूबाजूचे लोक ओरडायला लागले. मला कळत नव्हत काय चाललय पण त्या काकांना कळलं असावं. त्यांनी गाडी पटकन थांबवली. मी मागे वळ
मोठी माणसं सांगत असतात आपल्याला एखादी गोष्ट कळत नसेल तर त्याविषयी बोलू नये....आणि लिहू तर अजिबातच नये. पण मोह अनावर झाला आणि तो का झाला हे खाली कळेल च...अर्थात लहान तोंडी फारच मोठा घास म्हणावा लागेल याला.. आपण मोठे होतो आणि होताना आजबाजूच्या बऱ्याच गोष्टी आपल्याला old fashioned वाटायला लागतात, आणि आपण नवीन गोष्टी मधे धुंद होतो. त्या बऱ्याच गोष्टी मधे संगीत हे पहिल्या तीनात येत असाव. त्यात आपल्याला भावगीत भक्तीगीत वगैरे अस नुसत ऐकलं तरी हे काय बोरींग किंवा म्हाताऱ्यांसारख देवाची गाणी लावलीयत अस होत जे वयानुसार साहजिक आहे. माझ्या ही शाळा कॉलेज पासून आणि मोबाईल हातात आल्यापासून त्यात मराठी हिंदी देशी विदेशी गाण्याच्या कित्येक playlist फोन मधे बनवलेल्या होत्या. त्यात आता सोने पे सुहागा म्हणता येईल अशी आपल्याकडे एक अफाट गोष्ट आहे ती म्हणजे वेग वेगळे बँड्स जुन्या गाण्यांना नवीन वर्जन मधे म्हणतात काही रिमेक तर काही फक्त नवीन गायक तर काही फक्त नवीन म्युसिक लाऊन वगैरे. यांच्या कल्पना भन्नाट असल्या तरी ही लोकं काही गाण्याचं अगदीच वाभाड काढतात तर काही अगदीच लाजवाब बनतात. झालं अस की का
Comments