Posts

Showing posts from 2018

एके वारी कैक सवारी

       सवारी? शीर्षक जरा वेगळं आहे ना? नुसतं यमक जुळल म्हणून टाकल अस वाटण अगदीच स्वाभाविक आहे पण फक्तं तितकंच नाहीय. कारण आपल्याकडे तीर्थक्षेत्र आणि त्याचे उत्सव खूप आहेत आणि त्याविषयी जगभर आस्तिक आणि नास्तिकाना देखील आकर्षण आहे. कारण ही क्षेत्र ऊर्जेचा स्रोत आहेत किंवा प्रेरणा आहेत. त्यातलीच एक आपली वारी. ही मी लहानपणापासून पाहतोय, ऐकतोय अन् त्याविषयी वाचतोय शिवाय दोन वर्षांपूर्वी एक दिवसासाठी का असेना पण ४ पाऊले अनुभवली ही आहे. पण नुसत्या निरीक्षणाने ही त्याच्या भव्यतेचा अंदाज आपल्याला येऊ शकतो. आणि यात एक नक्की समजू शकत की वारी एक आहे पणं त्यात सवारी कैक आहेत. जशा कि वारकऱ्यांच्या समता व भक्तीची, दिंड्या आणि वारी व्यवस्थापनाची, सेवाभावी लोकांच्या माणुसकीची, असंख्य छोटे व्यापाऱ्यांची, अभ्यासू व जिज्ञासूंची, शेवटी यजमान पंढरपूर आणि चंद्रभागेच्या अगत्याची....!!! एकेका विषयावर पुस्तक लिहीता येईल एखाद्याला इतका याचा अवाका आहे.         पहिली सवारी वारकऱ्यांची भक्ती याला व्यक्त करावे असे शब्द जगात कुठेही सापडणार नाहीत. कर्मयोगाचा पुरस्कार करणारा विठ्ठल आणि कसला ही त्रास झाला तरी दर्शनाची

थोडा है बस थोडे की जरुरत है....!!!

         कालपासून ST महामंडळाचा पुन्हा एकदा वेतन वाढी साठी संप सुरू झाला. २०१७ च्या दिवाळी मधे या संपामुळे संपकरी, सरकार, पोलीस यंत्रणा आणि मुख्य म्हणजे `सामान्य नागरिक` सगळेच अक्षरशः वैतागून गेले होते. एक महत्वाची विनंती अशी की `सामान्य नागरिक` हा शब्द ते काय बोल्ड, इटालिक आणि अंडर लाईन का काय असत ना तस करून लक्षात ठेवां बर का...!! कारण कस आहे नेहमी आपण सामान्य नागरिक हा शब्द साधारण आर्थिक निकषांवर मध्यमवर्गीय आणि त्या खालचे असे घेतो पण इथे आर्थिक पेक्षा भौगोलिक निकष अभिप्रेत आहेत. म्हणजे महाराष्टातील जिल्हे, तालुके आणि त्यानंतर काही मोठी गाव सोडून इतर ठिकाणी राहणारी सगळी मंडळी म्हणजे सामान्य नागरिक. ज्यांच्या कडे स्वतःचे ४ चाकी वाहन नाही ते सगळे. आता लोक म्हणतील काय इतकं चिरफाड `सामान्य`तेची त्याच कारण एक पुण्याचे सद्गृहस्थ , ज्यांच्या मते ते महाराष्ट्र, भारत फिरले आहेत आणि दुनियादारी ची बरी जाणं आहे त्यांना.       झालं असं की मागच्या  दिवाळीत आमची भेट झाली होती तेव्हा हा संपाचा विषय निघाला त्यात त्यांची पहिली २-४ वाक्य अशी होती की - "राजकारण करतात साले...यांच्या कामगार संघट

युद्ध अटळ आहे 2019

      आधीच disclaimer देतो की ही पोस्ट काही राजकीय नाही. तितकी माझी पात्रता ही नक्कीच नाही आणि मी आधीच ठरवलं होत की राजकारण म्हणजे कानाला खड़ा . पण एक सामान्य मतदार जो राजकारण करत नाही पण जे काही चालू आहे त्यावरून स्वतःच एक मत बनवतो किंवा स्वतःला काही प्रश्न पडतात तितकच या पोस्ट चा अर्थ.         कर्नाटक निवडणुक. नावाप्रमाणे अनेक नाटक करुन ते वादळ शमल ते येदियुरप्पा च सरकार शमवून च. त्यावर असंख्य प्रतिक्रिया पाहिल्या. घोडेबाजारीला आळा बसला, लोकशाहीचा विजय, सत्तेचा माज उतरला वगेरे वगेरे. अर्थात हे खरच आहे की सत्तेचा माज हा कुठेही नकोच मग पक्ष कोणता ही असो. आणि एकाच पक्षाला मक्तेदारी देणे म्हणजे मनमानी कारभाराला मूकसंमती देण्यासारखं आहे. आणि घोडेबाजार म्हणालं तर हो गोवा मधे राजकारण करून ज्या पद्धतीने सत्ता स्थापन केली गेली त्याला घोडेबाजार म्हणणे चूक वाटणार नाही. आणि अप्पा यानी सरकार सोडल पण शक्य तितके हातपाय मारून पण २२ वर्षापूर्वी अटलजींनी सरकार सोडल फक्त एक मत कमी पडलं म्हणून ते ही नैतिकतेने त्यांची बरोबरी अप्पा सोबत तर होऊच शकत नाही. क्षेत्र कोणताही असो गर्वहरण हवच, ज्याचे पाय जमिनीप

धुरांच्या रेषा हवेत सोडी...!!!

     १२५ कोटिच मनुष्यबळ आपल. आता याला बळ म्हणाव की नाही हा विनोदाचा किंवा वादाचा मुद्दा होऊ शकतो. आता इतका जनसमुदाय म्हणल की इकड तिकड़ फिरण आलच. मग आम्हाला बस, विमान, रेल्वे, कार,ट्राम, वडाप, बाइक, रिक्षा, टैक्सी, बैलगाड़ी, ऊंट, याक, घोड़ा, टांगा, सायकल तर कधी पायी. अस कुवत, आवड, भूगोल आणि उपलब्धता यानुसार निवड करावी लागते. पण या सगळ्यात रेल्वे. भाई बंदी मे कुछ बात है. सोई सुविधेबबदल लोकांच्या बोम्बा असतील पण तरी लै जनता अजुन हिच्या भरोशावर आणि प्रेमात आहे हे नक्की.      ‎पण इथे  नॉन एसी प्रवास करणारा माणूस हा सोशल लाइफ मधे रस घेणारा, शांत पणे लोकांना पाहणारा, Silent observer च असावा अस माझ ठाम मत आहे. त्याच्याइतक एन्जॉय कुणीही करणार नाही. आपण अजुन बसलो न बसलो पाणी चहा कॉफ़ी, सैंडविच, इडली, चिप्स, कंगवे, पीना, हेडफोन, इयरिंग, बोडिस्प्रे अस अक्ख डीमार्ट समोर आल का काय वाटत? आणि त्याचं मार्केटिंग तर मार्केटिंग च्या पोराला लाजवेल एखाद वेळी. समोर दोन अवकाळी पोर आपल्या आईच्या नाकात दम करत असतात. पलीकडचे काका रेल्वेच्या तालावर होय होय नाही नाही करत असतात तर बाजुला बसलेल कपल सदृश्य जोड़ी कूच कूच

दिल्या घेतल्या वचनाची...!!!

     एक जोडप पाहिलय, सहवासाचे ५०-५५ वर्ष पुर्ण केलेल. तारुण्यात घऱट्यच्या काड्या जमवत उन्हात रापलेल. तर पोरांच्या सावलीत उतावयात हसत खेळत पहुडलेल. चिंता वाटावी म्हणाव अस कुठेही काही नव्हतं.   पण आज सकाळी एक भानगड़ झाली. त्यांच्या हाती लागल एक पार्सल, उघडून ठेवलेल. लाल काळ्या कागदानी बांधलेल आणि चॉकलेट न रिबिन्स नी सजवलेल. शिष्टाचाराचे नियम गुंडाळले आणि त्यांनी त्यात डोकावून पाहिल. पार्सल होत नातीच, लवकरच बदलणाऱ्या मधल्या नावाकडून आलेल. तिन पण न संकोचता आणि खुशित दाखवला ड्रेस, फ़ोटो कोलाज च ग्रीटिंग, सोबत पार्सल मधे टिकेल असा artificial गुलाब असावा. हे सम्पतय न सम्पतय तोच नातू ही आला थोड्याश्या घाईत. आज ऑफिस मधे पार्टी आहे. ड्रेस कोड असा आहे. आपल्याला सालसा करायच्या आहे. Etc etc etc. त्यांनी वाचल होत सकाळीच पेपर मधे आज valetine day आहे. पण त्याचा अवाका इतका मोठा आहे हे तिसऱ्या पिढिकडून कळल होत.      आता मात्र ते खुप नाराज झाले.  गूढ़ विचारात जाऊन आले. आजी च्या बाजूला ते शांत पणे जाऊन बसले. शब्द जोड़ले २ मिनिट आणि मग बोलते झाले. "५०-५५ वर्ष झाली नाही ना लग्नाला आपल्या..?"