धुरांच्या रेषा हवेत सोडी...!!!

     १२५ कोटिच मनुष्यबळ आपल. आता याला बळ म्हणाव की नाही हा विनोदाचा किंवा वादाचा मुद्दा होऊ शकतो. आता इतका जनसमुदाय म्हणल की इकड तिकड़ फिरण आलच. मग आम्हाला बस, विमान, रेल्वे, कार,ट्राम, वडाप, बाइक, रिक्षा, टैक्सी, बैलगाड़ी, ऊंट, याक, घोड़ा, टांगा, सायकल तर कधी पायी. अस कुवत, आवड, भूगोल आणि उपलब्धता यानुसार निवड करावी लागते. पण या सगळ्यात रेल्वे. भाई बंदी मे कुछ बात है. सोई सुविधेबबदल लोकांच्या बोम्बा असतील पण तरी लै जनता अजुन हिच्या भरोशावर आणि प्रेमात आहे हे नक्की.
     ‎पण इथे  नॉन एसी प्रवास करणारा माणूस हा सोशल लाइफ मधे रस घेणारा, शांत पणे लोकांना पाहणारा, Silent observer च असावा अस माझ ठाम मत आहे. त्याच्याइतक एन्जॉय कुणीही करणार नाही. आपण अजुन बसलो न बसलो पाणी चहा कॉफ़ी, सैंडविच, इडली, चिप्स, कंगवे, पीना, हेडफोन, इयरिंग, बोडिस्प्रे अस अक्ख डीमार्ट समोर आल का काय वाटत? आणि त्याचं मार्केटिंग तर मार्केटिंग च्या पोराला लाजवेल एखाद वेळी. समोर दोन अवकाळी पोर आपल्या आईच्या नाकात दम करत असतात. पलीकडचे काका रेल्वेच्या तालावर होय होय नाही नाही करत असतात तर बाजुला बसलेल कपल सदृश्य जोड़ी कूच कूच करत असतात, हळूच मागुन २ वर्षाच पोट्ट त्यांच्यात डोकावत असत, तर दाराजवळ एखादा नवतरुण गाणी ऐकत दारात इतके intense लुकनी बाहेर बघत असतो तेव्हा नक्की हा सानू च ऐ काश के हम ऐकत असणार अस वाटत. बाकी जनते पैकी ३३% गाणी ऐकत, ३३% झोपेत मॉडलिंग करत आणि ३३% गप्पा टप्पा करत असते. खरी मजा या गप्पा ऐकण्यात. कोणाला जांच होतोय, कोणाच शेत कोणा चुलत्यानी घेतल, आमचा सरपंच कसा बिनविरोध येणार, निवडणुकीचे भाकित, सातव वेतन आयोग, सेंसेक्स चढ़ उतार, पेट्रोल चे दर आणि काय काय. या जगात फुकट ज्ञान फक्त ३ च ठिकाणी मिळत एक सलून मधे, नंतर दारू पिउन पायलट झालेल्या ६० किलो देहरूपी प्लेन मधे, नंतर Non AC ट्रेन मधे. दिसायला ही भव्य रेल आणि लयबद्ध चाल म्हणून हिची दखल बॉलीवुड नि पण लै घेतली. कारण विषय च खोल आहे तसा हिचा.
     ‎म्हणजे गब्बर आणि ठाकुर यांच्यात गोलीबार कुठे ही झाला असता पण कसाय निवांत ४ उडया मारुन स्टाइल इथच शक्य. ती मलाइका बस वर पण छैय्या छैय्या करू शकली असती पण चुकुन खड्डा आला तर नाचू किती कम्बर  लचकली ही लावणी तिथेच झाली असती. दूसर कुठल वाहन घेतल तर जा सिमरन जिले अपनी जिंदगी हा टाइमपास करायला तितका वेळ मिळाला नसता.  हम दोनों दो प्रेमी मधे पंचम नी ट्रैन चा आवाज हुबेहुब काढलाय आता हेच ते ट्रक नि गेले असते तर किंकाळी फोडावी लागली असती. मैं हु ना मधला शाहरुख जर टमटम च्या धुरातून जैकेट घालून बैग खांद्याला देऊन उतरला असता तर ते लै गावठी वाटल असतं फराह खान ला. तर बंटी आणि बबली ला पण धड़क धड़क करत पळून जाता आल नसत. असो.
     ‎पण यात कुठे तरी शिस्त लपलेलि आहे. ही खुप काही शिकवून जाते बहुधा म्हणून उपमा देताना सुद्धा एखाद्या यशस्वी माणसाची गाड़ी रुळावर आली अस तोंडात येत. आणि इंजिनासरख माणसाला माणूस जोड़ा म्हणजे खुप लोकांना घेऊन जाल. हिचा रूट सुद्धा अस दाखवून देत असावा की लाइफ नेहमी सरळ आणि सतत नसते. स्टेशन आल की दोन मिनिट लोकांसाठी थाम्बा आणि पुढे व्ह्या. कधी जंक्शन येईल तेव्हा खुप सारे पर्याय येतील योग्य पाहा आणि कोणाला ही उपद्रव न देता चालत रहा आणि कधी येतो टर्मिनस. तो मार्ग संपला, प्रत्येक वाट पुढे जाण्यासाठी नसते कुठ तरी थांबण आलच.
     ‎शहरातली लोकल पासून सुरु झालेली ही बया आता मेट्रो किंवा बुलेट ट्रेन रुपात आलिय. झूक झुक आगिनगाड़ी च वय गेल कदाचित पण ते अप्रूप कायम राहणार. जस  ‎एखाद्याच्या हॄदयात शिरायचा मार्ग पोटाटून जातो म्हणतात तस ही रागिणी देशाच नस बनत बनत आपल्या नसा नसात भिनली असच वाटतंय.

एक प्रवासी ©Pk

Comments

Popular Post

रामाच्या निमित्ताने काहीस

वारी १ : यत्र योगेश्वरः कृष्णो...!!

सावली माडगूळकरांची...!!