धुरांच्या रेषा हवेत सोडी...!!!
१२५ कोटिच मनुष्यबळ आपल. आता याला बळ म्हणाव की नाही हा विनोदाचा किंवा वादाचा मुद्दा होऊ शकतो. आता इतका जनसमुदाय म्हणल की इकड तिकड़ फिरण आलच. मग आम्हाला बस, विमान, रेल्वे, कार,ट्राम, वडाप, बाइक, रिक्षा, टैक्सी, बैलगाड़ी, ऊंट, याक, घोड़ा, टांगा, सायकल तर कधी पायी. अस कुवत, आवड, भूगोल आणि उपलब्धता यानुसार निवड करावी लागते. पण या सगळ्यात रेल्वे. भाई बंदी मे कुछ बात है. सोई सुविधेबबदल लोकांच्या बोम्बा असतील पण तरी लै जनता अजुन हिच्या भरोशावर आणि प्रेमात आहे हे नक्की. पण इथे नॉन एसी प्रवास करणारा माणूस हा सोशल लाइफ मधे रस घेणारा, शांत पणे लोकांना पाहणारा, Silent observer च असावा अस माझ ठाम मत आहे. त्याच्याइतक एन्जॉय कुणीही करणार नाही. आपण अजुन बसलो न बसलो पाणी चहा कॉफ़ी, सैंडविच, इडली, चिप्स, कंगवे, पीना, हेडफोन, इयरिंग, बोडिस्प्रे अस अक्ख डीमार्ट समोर आल का काय वाटत? आणि त्याचं मार्केटिंग तर मार्केटिंग च्या पोराला लाजवेल एखाद वेळी. समोर दोन अवकाळी पोर आपल्या आईच्या नाकात दम करत असतात. पलीकडचे काका रेल्वेच्या तालावर होय होय नाही नाही करत असतात तर बाजुला बसलेल कपल सदृश्य जोड़ी कूच कूच