tag:blogger.com,1999:blog-7003835335972317972024-03-23T03:17:24.719-07:00मन करा रे प्रसन्नमी कोणी लेखक नाही, कवी नाही. जे काही थोडं फार वाचतो,पाहतो,ऐकतो,अनुभवतो आणि त्यात जे जाणवत आणि ज्याविषयी ४ लोकांसमोर काहीतरी व्यक्त करायचा प्रयत्न करतो असा छोटासा स्वच्छंदी.
भेट द्या...वाचा...शक्य असेल तर अभिप्राय द्या..!!
Prasanna Kulkarnihttp://www.blogger.com/profile/16790479522824925011noreply@blogger.comBlogger40125tag:blogger.com,1999:blog-700383533597231797.post-65947076859226176402024-01-13T23:58:00.000-08:002024-01-14T00:34:33.527-08:00रामाच्या निमित्ताने काहीस<p dir="ltr" id="docs-internal-guid-39d5b4a3-7fff-2c35-1cb3-cc2701c90315"><br></p><p dir="ltr" id="docs-internal-guid-39d5b4a3-7fff-2c35-1cb3-cc2701c90315"> ब्लॉग सुरु करायच्या आधी लहान सहान लेख मी फेसबुक वर लिहायचो. त्यात सर्वात चांगला प्रतिसाद मिळालेला आणि मला स्वतःला खूप आवडलेल्या निवडक लेखापैकी एक म्हणजे "आजीचा राम". आत्ता ही राम मंदिराची प्राण प्रतिष्ठा, परवाच झालेली गोंदवलेकर महाराजांची पुण्यतिथी यामुळे परत एकदा लहानपणीच्या काही आठवणी जाग्या झाल्या. <br></p><p dir="ltr"> दरवर्षी राम नवमी ला उस्मानाबादच्या राम मंदिरात आजोबांचं कीर्तन असायचं. कित्येकदा शाळेला सुट्टी असेल तर मी त्यांच्या सोबत गेल्याच मला आठवतं. तेव्हा मला त्यातल काही कळायचं किंवा आवडायचं का हा प्रश्नच नव्हता. आम्ही भावंडं त्यांच्या सोबत जायचो ते खूप वेळा त्यांची काठी म्हणून किंवा कमी ऐकू येणाऱ्या कानाच यंत्र म्हणून. गीतरामायणचं काय तर, भावगीत भक्तीगीत देखील फारसे मला माहित ही नव्हते आणि कळत तर मुळीच नव्हते. पण त्या रामजन्मवेळेच्या काही मिनिट आधी किंवा नंतर, संगीत शिक्षण नसलेल्या पण गाऊन गाऊन ऐकायला गोड वाटेल इतक्या सुरेल आणि माईक नसला तरी किमान १०० -२०० माणसाला ऐकू जाईल अशा खणखणीत आवाजात ऐकू आलेला- </p><br><p dir="ltr"> " चैत्र मास त्यात शुद्ध नवमी ही तिथी…..</p><p dir="ltr"> गंधयुक्त तरीही वात उष्ण हे किती…." ( तिथी आणि </p><p dir="ltr"> किती दीर्घ ओढून)</p><p dir="ltr"> दोन प्रहरी का ग शिरी ? ( हात आणि डोळे सूर्याकडे </p><p dir="ltr"> वर)</p><p dir="ltr"> सूर्य थांबला ? ( समोरच्याकडे प्रश्नार्थक हातवारे)</p><br><p dir="ltr">तो सूर, ती तिथी, तो हातवारा आजही तसाच आठवतो आणि आठवत राहणार.</p><br><p dir="ltr"> हे तर झालं घराबाहेरच, घरात राहणारे सदस्य तर गायक, लेखक, संगीतकार, कीर्तनकार यांच्यासाठी पहिले श्रोते असतात. सादर करणारा त्याला समाधान वाटेल तोपर्यंत ती कलाकृती घोकत राहतो आणि तोवर इतरांची पारायणे मात्र अटळ होतात. त्यामुळे तिथे होणाऱ्या गमती जमती पण वेगळ्या. घरात एखाद लहान मूल असतं, कधी त्याला खेळवण्यासाठी, कधी सवय लावण्यासाठी कधी संस्काराचा भाग म्हणून आपण वेगवेगळ्या माणसाची त्याला ओळख सारखी सारखी करून देतो. म्हणजे कस तर ती गाडी कोणाची तर माम्मा किंवा ते चॉकलेट कोणी दिलं तर मावशी अस काहीस. पुढे पुढे त्यांची ओळख तशीच बनते की हे गाडीवाले मामा किंवा चॉकलेटवाली मावशी वैगरे. हेच काम घरी सराव म्हणून किंवा अचानक सहज लहर म्हणून गाणी गुणगुणताना ऐकू येणाऱ्या पदांनी केलं ~</p><br><p dir="ltr"> " रघुपती राघव गजरी गजरी,</p><p dir="ltr"> तोडीत बोरे शबरी"</p><br><p dir="ltr">किंवा कधी चेष्टा मस्करी किंवा आपली कधी काही खुसफुस झाली तर आपण म्हणतो ना जातो मी आता कुठे तरी निघून. तेव्हा देखील आम्हाला "जाणार आहे मी आता गोंदवल्याला हे कैकदा ऐकायला लागायचं आणि लगोलग एक पद ऐकू यायचं.</p><br><p dir="ltr"> "श्रीरामाचा लळा लागतो त्या तिर्थी जाऊ,</p><p dir="ltr"> मना चल गोंदवले पाहू "</p><br><p dir="ltr">ते वरच्या मावशी आणि मामा सारखी रघुपती राघव म्हणत बोरे खाणारी कोण तर शबरी किंवा श्रीरामाचा लळा कुठे लागतो तर गोंदवले ला हे अगदी पक्क बसल डोक्यात. ते मना चल गोंदवले पाहू हे इतक्यांदा ऐकून मी कधी तिकडे गेलो नाही अस वाटत च नाही, अरे मी तर इथे गेलोय लहान पणापासून हेच पक्क बसलयं, त्याही पुढे जाऊन </p><br><p dir="ltr">"जयाच्या जनी जन्म नामार्थ केला म्हणत" गोंदवलेकर यांना आठवणारे आजोबा आणि "शुकासारखे पूर्ण वैराग्य ज्याचे" स्मरून समर्थांना पाचारण करणारी आजी. तो एक काळ होता त्या दोघांमुळे हे दोन संत नकळत आठवले जायचे आणि आज वेळ अशी आहे की या दोन संताच नाव वाचलं की मला त्या दोघांची आठवण होते. इतकी एकरूपता ही ताकद श्रद्धेची की सगळ्यांना जोडणाऱ्या श्रीरामाची काही कल्पना नाही.</p><p dir="ltr"> अजून एक आठवण म्हणजे लातूरला २०-२२ वर्ष आधी साध्वी कनकेश्वरी यांचा रामकथा सप्ताह झाला होता आणि दररोज संध्याकाळी कोणी इच्छुक भक्त किंवा मोठ्या व्यक्ती यांच्याकडे भेटीसाठी जात. तेव्हा यजमानाच्या जवळचे मित्रमंडळी त्यांना भेटायला किंवा दर्शनाला तिथे जात. आजोबांचे एक मारवाडी मित्र यांच्याकडे त्या साध्वी येणार होत्या हे त्यांना आधीपासून माहीत होत. त्या येणार म्हणून आजोबांनी स्वतः दोन पदे लिहिली होती, जर संधी मिळाली तर गाण्यासाठी आणि ती त्यांनी तिथे गायली देखील. त्याच्या पहिल्या पहिल्या ओळी फक्त आठवतात.</p><br><p dir="ltr">पहिलं होत,</p><p dir="ltr">" पूज्य संत मा कनकेश्वरी जी पधारी है लातूर……</p><p dir="ltr">रामभक्त हम सभी यही के सूनने को है आतुर…"</p><br><p dir="ltr">आणि दुसर होत</p><p dir="ltr">" तोडले संसाराचे पाश, केला वासने चा नाश</p><p dir="ltr">नाम जपानी केला हा आठवा ( शेवटचा शब्द पूर्ण आठवत नाही)</p><p dir="ltr">कुणी माझ्या रामाला आणून भेटवा.".</p><br><p dir="ltr">त्यातल कुणी माझ्या रामाला आणून भेटवा यावर नंतर लोकांनी येऊन येऊन दाद दिलेली आजही आठवते. वर म्हणलो तसे आम्ही जायचो काठी आणि कानाच यंत्र बनून तसचं या काठीला तिथे जायची संधी मिळालेली म्हणून ही आठवण आणि या ओळी २०-२२ वर्षांनी ही ताज्या आहेत.</p><br><p dir="ltr">प्रत्येक हिंदू घरामध्ये राम आणि कृष्ण हे वेगवेगळ्या रुपात वडिलोपार्जित संपत्तीसारखे वारसाहक्काने पुढच्या पिढीला अगदी हजारो वर्षापासून मिळत आलेत, आणि हा वारसा हक्क पुढे जायला तुम्ही गर्भ श्रीमंत असा किंवा कर्म दरिद्री काही फरक नाही. कोणासाठी त्या रूढी परंपरा असतात, कोणासाठी सवयी, कोणासाठी कर्मकांड आणि बोजड, तर कोणासाठी संस्कार. हे घेणाराच्या श्रद्धा आणि विश्वास यावर ठरत. थोडा फार अध्यात्म तुमच्या मनःशांती साठी चांगला असतो हे कळण्याइतका आस्तिक मी तरी आहे. हे जर नाही केलं तर कदाचित त्यांच्या आवाजात ऐकलेलं अजुंन एक पद काही वर्षांनी मला परत आठवत राहील ते ही स्वतःसाठी ही शक्यता नाकारता येत नाही.</p><br><p dir="ltr">"उत्तम जन्मा घेऊनी रामा गेलो मी वाया…</p><p dir="ltr">स्वस्थपण अन नाही ठावले तुजला पुसाया.."</p><br><p dir="ltr">©प्रसन्न कुलकर्णी.</p><div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/a/AVvXsEgwIdEcQDb6DgicA6xV5IocUos1MevUfZ1ewOORa7PXTX7rmfpWrWLbv1t2PpEt3X5i2FFQ7CSqoUTqCkAxcrwqAh_tg5pW8PxV3uuHvyKNFbxtHOFpsg61E0LDNOrfmrvV7NQch86velt2KUxG5IH93f7uzJuCBepDlZ9IDYyadjVgqdvMSyzQSJvabDSA" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;">
<img border="0" src="https://blogger.googleusercontent.com/img/a/AVvXsEgwIdEcQDb6DgicA6xV5IocUos1MevUfZ1ewOORa7PXTX7rmfpWrWLbv1t2PpEt3X5i2FFQ7CSqoUTqCkAxcrwqAh_tg5pW8PxV3uuHvyKNFbxtHOFpsg61E0LDNOrfmrvV7NQch86velt2KUxG5IH93f7uzJuCBepDlZ9IDYyadjVgqdvMSyzQSJvabDSA" width="400">
</a>
</div><p></p>Prasanna Kulkarnihttp://www.blogger.com/profile/16790479522824925011noreply@blogger.com3tag:blogger.com,1999:blog-700383533597231797.post-71243576458738355452023-07-26T12:26:00.000-07:002023-07-26T12:27:02.146-07:00मुलाखत....!!<div><br></div><div> सध्या trending असलेली उद्धव ठाकरे आणि संजय राऊत किंवा आधीच्या अक्षय कुमार- नरेंद्र मोदी किंवा राज ठाकरे- शरद पवार अशा मुलाखती मुळात मुलाखती नसतात च आणि त्या देणाऱ्यांना ती देण्यात काहीही विशेष साध्य ही करायचं नसत. एकतर तर कोणत्यातरी गोष्टीवरून लक्ष हटवणे, आपण आहोत याची लोकांना आठवण करून देणे किंवा त्यांना एखाद मत किंवा टिप्पणी करायची असते त्यासाठी त्यांना योग्य प्लॅटफॉर्म मिळत नसतो तो उपलब्ध करून घेणे यापेक्षा त्यात काही वेगळा उद्देश असेल अस वाटत देखील नाही. पण मुलाखतीच महत्व केवळ तितकंच असू शकत नाही तर एका पट्टीच्या ऐकणाऱ्यासाठी गप्पागोष्टी पलीकडे ती बरच काही देऊन जाते.</div><div> कुणी मला odd man out किंवा outdated म्हणलं तरी हरकत नाही, पण मला अशा मुआलखती ऐकण्याची आवड अनेक वर्ष आहे अगदी आजही. मी स्वतः क्रिकेट खूप कमी पाहतो पण विक्रम साठे ची 'What the duck' मुलाखतींचे बरेचसे एपिसोड मी पाहिले आहेत किंवा गौरव कपूर चे Breakfast with Champions चे जवळपास सगळे भाग मी पाहिलेले आहेत, कपिल शर्मा मी पाहतो ते फक्त मधल्या गप्पा ऐकण्यासाठी बाकी पांचटपणा वगळून, आप की अदालत मधे माझ्या आवडीचे आलेले अभिनेते, नेते यांचे कित्येक भाग कित्येक वेळा बघून झालेले आहेत, याशिवाय खुपते तिथे गुप्ते (जुना सिझन), माझा कट्टा, संजय मोनेच कानाला खडा किंवा जितेंद्र जोशीच दोन स्पेशल हे देखील मी मना पासून पाहिलेले आहेत. थोडासा काही काळ मागे गेलो तर मच्छिंद्र कांबळी हे वस्त्रहरण नावाचा मुलाखतींचा कार्यक्रम करायचे तो पण काहीच्या काही भारी होता अर्थात मी तेव्हा फार लहान होतो म्हणून ते कळेल इतकी अक्कल नव्हती पण नंतर बरेच भाग यूट्यूबवर पाहिलेले आठवतात.</div><div> पण या सगळ्याच मुलाखती या श्रवणीय असतात अस नाही. मिळमिळीत बोलणं,फक्त पॉलिटिकली करेक्ट राहून किंवा जितकं विचारलं तितकं च बोलण हे काही रसिकांसाठी मेजवानी असू शकत नाही. अर्थात सगळे सारख्या स्वभावाचे नसणारच पण काहीतरी उपजत स्वभाव दाखवणारं ठळक व्यक्तिमत्व किंवा एखाद नाटकी अथवा आव आणलेलं असू द्या पण ऐकणाऱ्याला खिळवून ठेवणारी मुलाखत असेल तरी त्यात गंमत येते. नुसता मुलाखती हा विषय निघाला तरी चुटकीसरशी काही नाव नजरेसमोर येतात जशी की- तेंडुलकर, सेहवाग, गावसकर, श्रीकांत, स्मृती मंधना, हर्षा भोगले, कपिल शर्मा, नवज्योत सिंह सिद्धू, गांगुली, अटल बिहारी, फडणविस, अजित दादा, राज ठाकरे, बाळासाहेब, आर आर पाटील, विलासराव, जितेंद्र जोशी, सौमित्र, सोनू निगम, गुलजार, जावेद अख्तर, स्वानंद किरकिरे, अनुराग कश्यप, अनुपम खेर, सलीम खान, सयाजी शिंदे, प्रशांत दामले वगैरे वगैरे. ही जी मंडळी आहेत यांच्या मुलाखती ऐकून ऐकून पारायण झाली आहेत आतातर. ही आपापल्या क्षेत्रात उत्तम काम तर करत आहेतच पण शिवाय त्याबद्दल बोलताना त्यांची आस्था, त्यांचे भन्नाट किस्से, त्यांचा स्ट्रगल, त्यांच्यातल माणूस पण, त्यांची कला, सारख्याच गोष्टींना वेगळ्या पद्धतीनें हाताळायची हातोटी हे सगळ जितकं सगळ्यांना प्रेरणादायक वाटत तितकं हे सगळ सांगताना त्यातला साधेपणा, सहजता आणि नजाकत हे कायम मला हुरळून टाकतात, पण त्याउलट अशी ही काही नाव आहेत जी त्यांच्या क्षेत्रात अती भारी आहेत पण मुलाखती देताना थोड संकोचतात किंवा हातचं राखून बोलतात. मग अशा मुलाखती केवळ सार्वजनिक औपचारिकता बनतात, ना त्यात मुलाखतकाराला मजा येते ना प्रेक्षकांशी नाळ जोडली जाते.</div><div> ही झाली एक बाजू पण मुलाखत हा दोन्ही बाजूंनी खेळायचा खेळ आहे ना? Batsman किती चांगला आहे हे बघायचं असेल तर Bowler तसा हवा ना.... एखादी गृहिणी लाख सुगरण असेल पण खाणारा खवय्या असायला हवा ना....एखादा शायर ताकदीचा असेल पण त्याला इर्शाद देणारा हवा ना....त्या बॉलर, खवय्या आणि इर्शाद ची भूमिका मुलाखतकाराची. मुळात तो जिज्ञासू, चिकित्सक आणि पुरेसा गृहपाठ केलेला असायला हवा ना....म्हणजे प्रश्न दिलेत तितके विचारायचे आणि मधेच वाह वाह अरेरे करत राहायचं इतकीच सावध आणि दूरस्थ त्याची भूमिका नको. एका उत्तरातून दुसरा प्रश्न त्याला सुचायला हवाच आणि तो विचारायची मुभा त्याला असायलाच हवी. आधीच माहीत असलेले प्रश्न आणि तयार केलेलं उत्तर यात ती गंमत नाही. </div><div> सगळ्यात कठीण जबाबदारी मुलाखतकार आणि त्याहून प्रेक्षकांवर अधिक असते ते म्हणजे संवेदनशीलता आणि रसिकता जपण्याची, बोललेल्या वाक्यांपेक्षा बोलता बोलता कोणत वाक्य टाळलं हे आपोआप उमजल पाहिजे आणि कोणत्या जागी बोलणाऱ्या ला आवंढा गिळण्यासाठी वेळ द्यायचा आणि कोणत्या जागी बरोबर टाळ्या देऊन त्याला दाद द्यायची इतकी समज श्रोत्यात पाहिजे. एकच batsman त्याच Bowler कडून प्रत्येक वेळी कॅच आऊट च होईल असं थोडी आहे कधी बोल्ड होईल तर कधी विकेट सोडणार पण नाही. पण प्रत्येक वेळी प्रश्न आणि आवाजातले चढउतार दोन्ही बदलत राहणे ते पण हळुवारपणे उलगडत हे मुलाखतकार नावाच्या bowler च कसब. Nervous Ninety मधे नव्वदित अनेकदा बाद झालेला किंवा tennis elbow ने त्रस्त सचिन आणि १०० शतक मारून, भारतरत्न मिळाल्यानंतर चां सचिन सारखं बोलणार नाहीत, हिंदुत्वाचा टेंभा न वापरता उच्च पदावर गेलेले फडणवीस किंवा अटलजी आणि मित्रपक्षांनी पाडलेल्या सरकारांनी हतबल फडणवीस आणि १ मताने १३ दिवसांच सरकार पडलेले अटलजी हे वेगळे बोलतील, सखाराम बाईंडर सांगाणारा सयाजी शिंदे आणि झाडं लावा आणि जगवा हे कळकळीने सांगणारा आणि स्वतः देखील तसा वागणारा सयाजी हे एकसारखे बोलणार नाहीतच, आप मधून उद्विग्न होऊन बाहेर पडलेला कुम्मार विश्वास आणि हिंदीचा प्रचारक, प्रसारक कुमार विश्वास हे वेगळे बोलणारं. त्या विषयामधली आणि त्या वेळेमधली संवेदनशीलता समजून घेणं हे ज्याची त्याची आवड आणि कसब......</div><div><br></div><div>मला थोडीफार पुस्तक वाचायला आवडतात पण मला जर कुणी पर्याय दिला की तुला त्या माणसाचं पुस्तक वाचायला आवडेल की त्याला ऐकायला आवडेल तर मी कायम म्हणेन मी मला त्याला किमान दोन तास ऐकायला आवडेल. अर्थात पुस्तकासारखी सखोल माहिती त्यात नसेल कदाचित पण जे त्या दोन तासात एकंदर body language बरच काही बोलून जाईल...ते जाडजूड पुस्तकामध्ये कधीच सापडणार नाही..</div><div><br></div><div>हे सगळ का सुचलं असेल मला हा कुणाला प्रश्न पडला असेल तर त्याच उत्तर हे की आजच्या उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीतून ती कशी नसू नये आणि परत एकदा सुधीर गाडगीळ यांची माझा कट्टा किंवा दोन स्पेशल मधली मुलाखत आठवून ती कशी असावी ही दोन्ही मत ठाम आणि स्पष्ट झाली इतकंच.</div><div><br></div><div>©प्रसन्न कुलकर्णी<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/a/AVvXsEidwyWHtSH3oAay2SoLSEvJ0ZSb92138-LR59LUKYQPCTNepp0nlctc2S88iU6kbjWlHCmRgaWGgGncMn87OvX8ZAPHnRPSDsokPwTHxoEcW79QNUNyCmqUGhE8HO4MThOHcS_YntMtQzPFznWmGux9bfnEDbfEO6v5kyT6cbFjk51hLenfQEiTJ7Z-adqb" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;">
<img border="0" src="https://blogger.googleusercontent.com/img/a/AVvXsEidwyWHtSH3oAay2SoLSEvJ0ZSb92138-LR59LUKYQPCTNepp0nlctc2S88iU6kbjWlHCmRgaWGgGncMn87OvX8ZAPHnRPSDsokPwTHxoEcW79QNUNyCmqUGhE8HO4MThOHcS_YntMtQzPFznWmGux9bfnEDbfEO6v5kyT6cbFjk51hLenfQEiTJ7Z-adqb" width="400">
</a>
</div></div>Prasanna Kulkarnihttp://www.blogger.com/profile/16790479522824925011noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-700383533597231797.post-64798983070777860672023-06-25T01:08:00.001-07:002023-06-25T01:08:15.622-07:00वारी १ : यत्र योगेश्वरः कृष्णो...!!<div> कोणती गोष्ट तुम्हाला कोणत्या विचार चक्रात घेऊन जाईल काही सांगता येत नाही. १४ तारखेला दुपारी व्हाट्स अँप ग्रुप ला आईने टाकलेला फोटो आला आणि खाली मेसेज होता, "आम्ही दिवेघाट पार केला. थोडा थकवा जाणवतोय पण बाकी सगळ ठीक". त्या क्षणापर्यंत कितीतरी मिश्र विचार डोक्यात घोळत होते. त्यात तुम्ही पहिला आणि महत्वाचा टप्पा पूर्ण केला याचा आनंद होता, पुढचा प्रवास कसा होईल याची काळजी होती. पण का माहित नाही तो अत्यंत भव्य, देखणा पांडुरंग पाहिला आणि निश्चिन्त झालो.<br></div><div> लगेच मला भूतकाळातील दोन गोष्टींची आठवण झाली. सन २००१-०२ मी तिसरीत होतो. गुरुवार होता हे नक्की कारण युनिफॉर्म ला सुट्टी होती. अण्णा ( म्हणजे माझे आजोबा) मला सोडायला शाळेत येत होते. तेव्हा रिक्षा गाडी हे लाड नव्हते, चालतं आजोबांचं बोट पकडून शाळेत जायचं हा रोजचा शिरस्ता होता. वाटेत बाबांचे कोणीतरी मित्र भेटले आणि चला सोडतो दोघांना म्हणाले. मी दोघांच्या मधे बसलो होतो. अजून थोडा रस्ता सरलां न सरला तेव्हा आजूबाजूचे लोक ओरडायला लागले. मला कळत नव्हत काय चाललय पण त्या काकांना कळलं असावं. त्यांनी गाडी पटकन थांबवली. मी मागे वळून पाहिलं आजोबांना चक्कर आल्यासारखं होत होता आणि त्यांचा मागे झोक जात होता. ते रस्त्यावर पडल्यासारखे झाले. त्यांना लहानसा अटॅक येऊन गेला होता. पुढे ते अँजीओ ग्राफी आणि प्लास्टी सगळे सोपस्कार झाले. नंतर ते जवळपास १६ वर्ष ठणठणीत जगले. कधी ही त्या प्रसंगाची आठवण आली की ते सांगायचे कोणीतरी माणूस मागे होता ज्याने मला कोसळण्यापसून वाचवल आणि कदाचित त्याच्या मांडीवर ५ मिनिट मी डोकं ठेवून झोपलो होतो. कोण होता माहित नाही पण माझ्यासाठी तो पांडुरंग च होता. मिष्कीलीने अस ही म्हणायचे की जो स्वतः विटेवर आहे तो माझ्यासाठी ५ मिनिट रस्त्यावर नसेल का उतरला.</div><div> दुसरा प्रसंग म्हणजे ८ वर्ष पुढे २००८ ला. एका भयानक अपघाताला आम्हाला सामोरं जावं लागलं. अगदी जगू किंवा नाही आणि जगलो तरी कसे हा प्रश्न उभा रहावा इतका मोठा अपघात. तेव्हा अचानक कुणाला बुध्दी सुचली माहीत नाही आणि आमचे पाय डॉ. विठ्ठल लहाने म्हणजे मुंबईच्या त्यात्याराव लहाने यांचे लहान बंधू यांच्या लातूरच्या दवाखान्यात गेले. पुढे अगदी आम्हाला ठणठणीत बर केल्यावर असच कोणाच्या तरी तोंडून शब्द पडले की अगदी नावाप्रमाणे डॉ. विठ्ठल हा पांडुरंग बनून आला हो. एखादा क्षण पुढे मागे झालं असता किंवा विषयाची जाण नसणाऱ्या कडे आपण गेलो असतो तर काय झालं असत. तेव्हापासून जेव्हा काही अघटीत घडत आणि आपण मनापासून त्याची आठवण काढतो तेव्हा तो येतो असे उगाच मनात घट्ट बसल होत.</div><div> मला आमच्या घरच्या वारकऱ्यांचा म्हणजे आई, आत्या अन काकू वग्रे यांचा मेसेज पाहून डोक्यात विचार सुरु झाले कि कोणाचं डोकं असेल अशा योग्य जागी ती गगनचुंबी मूर्ती उभी करण्याचं. हजारो लोक चालायला सुरुवात होऊन २ दिवस झालेले असतील त्यात दिवेघाट चा एक लांब आणि कठीण टप्पा संपत आलेला असेल. सगळी लोक दमून भागून हश्श हुश्श करत तिथे आले असतील इथेच त्यांना तो थकवा पळवून लावणारा, पुन्हा चालण्याची प्रेरणा देणारा आणि मुख्य म्हणजे पंढरपूर गाठल्यानंतर किती समाधान आहे याची एक छोटीशी प्रचिती देणारा असा भव्य आणि तितकाच काळजीने आपल्या वारकरी बाळांना पाहणारा पांडुरंग अगदी योग्य जागी आहे हे नक्की. त्या मूर्तीकडे बघून येणारा उत्साह अगदी त्या अभंगा प्रमाणे "तुका म्हणे सोपी केली पायवाट उतरावया भवसागर रे" अस तुम्हाला भासला असणार याची देखील मला खात्री आहे.</div><div> या वरच्या दोन तीन प्रसंगात आपल्याला ही माहित नसतं खरंच पांडुरंग असतो या मागे की आपला आस्तिक आणि भावनिक दृष्टिकोन तुम्हाला तसा विचार करायला लावतो ते. आपण इतक्या विज्ञानवादी जगात राहून सुद्धा आपल्याला गोष्टी पटतात आणि सुखावह वाटतात हे योग्य की अयोग्य या संभ्रमात मी तरी कायम पडतो. कारण मी तरी धार्मिक आणि आस्तिक असलो तरी देव भोळा नाही. पण कधी कधी बर असत. फार ही विज्ञानवादी आणि नास्तिक असलो की एक ना एक गोष्ट सांभाळण्याची आणि सावरण्याची जबाबदारी तुमची असते. ज्या गोष्टी आपल्या कल्पनेच्या आणि आवाक्याच्या बाहेरच्या आहेत त्यांचं देखील दडपण आपल्यावर येतं. त्यापेक्षा पांडुरंग च असावा या मागे अस मानल की किमान ज्या गोष्टी आपल्या हाताबाहेर आहेत त्या त्याच्या आहेत हे तरी मन मानत. किमान आपण त्यावर विश्वास आणि श्रध्दा ठेवून त्या आशेवर मजेत जगतो.</div><div><br></div><div>तुमच्या या प्रवासात कुणाला काही त्रास असतील तब्येतीचे, कुणाला घरी काही कर्तव्य असतील, काही कार्य असे व्यवहार असतील पण या सगळ्या गोष्टी मागे सोडून तुम्ही 'आपल्या' पांडुरंगाला वारीचा प्रवास आत्तापर्यंत मस्त केलात तसाच शेवटचा टप्पा ही मस्त कराल याची मला खात्री आहे. बर नुसती शरीराने तुम्ही वारी केली इतकंच नाही तर तुमच्या काळजीने, तुमची आठवण काढत काढत आम्ही ही तुमच्या सोबत च होतो. कुठे पोहोचले ..? माळशिरसला पोहोचले असतील का....? तिथे रिंगण पाहिलं असेल का? दमले असतील का....? अस करून तुम्ही ६-७ लोक आपापल्या परिवाराला मनाने त्या वारीत घेऊन गेलात. तुम्ही थेट नाव घेत तुमच्या मनात प्रत्यक्ष आणि आमच्या मनात अप्रत्यक्षरित्या तुम्ही पांडुरंग म्हणजे कृष्ण जागा ठेवलात मग तुमचा प्रवास सुखकर न झाला तरच नवल होत. ते गीतेत म्हणलेली उक्ती इथेही लागू आहेच की,</div><div><br></div><div>यत्र योगेश्वरः कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः।</div><div>तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम ||</div><div><br></div><div>ज्याबाजुला श्रीकृष्ण आणि अर्जुन आहेत विजयश्री त्याबाजुला च राहतो अस काहीस.</div><div><br></div><div>बाकी तुमच्या प्रवासाचा मी खूप आधीपासून आणि जवळून साक्षीदार आहे. मी तरी यात खूप काही शिकलो, खूप गमती जमती पहिल्या त्याबद्दल पण लिहायचा प्रयत्न करेन च.</div><div><br></div><div>"तोपर्यंत श्री विठ्ठलं चिंतयामी..."</div><div><br></div><div>©प्रसन्न कुलकर्णी</div><div><br></div><div><div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/a/AVvXsEjsjdwkHpUXQDynWF4kWqNqpV31XSpGed_neA5ygiHVaM9ND125-ddr-yJDTh-JIUnXE4iBgdrzRtZy6729Sygo59BuOt-Tw-JwiacLwToSjiM7Y7tM4eQwYzQja-mZw6pmy4RT2xCvQMcYvFeuFp98J1ZmBZLvLk8ilk4K7Wuwmu0lwXsEAreGVdRGkse7" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;">
<img border="0" src="https://blogger.googleusercontent.com/img/a/AVvXsEjsjdwkHpUXQDynWF4kWqNqpV31XSpGed_neA5ygiHVaM9ND125-ddr-yJDTh-JIUnXE4iBgdrzRtZy6729Sygo59BuOt-Tw-JwiacLwToSjiM7Y7tM4eQwYzQja-mZw6pmy4RT2xCvQMcYvFeuFp98J1ZmBZLvLk8ilk4K7Wuwmu0lwXsEAreGVdRGkse7" width="400">
</a>
</div><br></div>Prasanna Kulkarnihttp://www.blogger.com/profile/16790479522824925011noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-700383533597231797.post-26221544199387554302023-05-28T20:31:00.001-07:002023-05-28T20:31:05.721-07:00मेरा आवाज ही मेरी पेहचान है..!!<div><div> अशनिर ग्रोवर ने एका मुलाखतीत म्हणलेल होत, भारतीय माणूस आणि भारतीय मार्केट हे जगात वेगळं आहे बाकी जगाचे नियम इथे लागू होत नाहीत. अर्थात तो ग्राहकां बद्दल हे सांगत होता, पण हे अगदी विक्रेत्यांना सुद्धा लागू आहे. </div><div>म्हणजे तुम्ही त्यांना जगात भारी अशी काहीतरी अशी काहीतरी टेक्नॉलॉजी द्या पण ते त्यात सुद्धा काहीतरी जूगाड करून त्याला आपल्याला गरजे नुसार आणि सवयीनुसार Indian Touch देतील. UPI ला ते आवाजाचं मशीन लावणे हा त्याचाच भाग होता. अगदी निरक्षर आणि अजिबात Tech Savy नसलेल्यांना ते इतकं मोठं वरदान मिळालं की बस. म्हणजे असं काहीतरी छोटस पण नवीन साधन तयार करावं ही, कल्पना अमलात आणावी अशी उत्पादकांना गरज वाटावी हे आपल्या छोट्या विक्रेंत्याच यश आहे. अशीच आणखी २ अगदी छोटी आणि किरकोळ उदाहरण पाहिली, आणि मला आपल्या जुगाड संस्कृतीच कौतुक वाटत. जे सगळ्यांनी पाहिलेले असतील पण मी कदाचित मी अलीकडच्या काळात मन लाऊन पाहिले म्हणून नीट लक्षात आलं.</div><div><br></div><div>केस १:- पूर्वी आणि आजही हायवे वरती अशी फळं किवा किरकोळ काहीतरी विकणारे लोक असतात. त्यात द्राक्षांचे घड किंवा द्रोणामध्ये जांभूळ, करवंद, सफरचंद अशा फळापासून ते काचा साफ करणारे स्प्रे, मोबाईल स्टँड, चष्मे किंवा काहीही असू शकत. मग ते धावत्या गाडीमध्ये लोकांना दिसावं म्हणून रस्त्याच्या बाजूला ती वस्तू हातात उंच धरून लोकांना दिसेल असं थांबायचं, ज्याला हवी तो थांबेल. प काळाप्रमाणे माणसाला यात त्रुटी दिसत गेल्या हळू हळू बदल होत गेले. सगळीकडे बदल झालेत की नाही हे माहीत नाही पण मी विश्रांतवाडी ते आळंदी या मार्गावर अनेकदा गेलोय तिथले बदल मला जाणवले. कितीही माणूस असा वस्तू हवेत धरून थांबला तरी तो काय विकतोय हे कळेपर्यंत वेगात असलेली गाडी पुढे निघून जाते आणि माणूस असा विचार करतो की जाऊ दे आता पुढे आलोय, पुढे कुठे दिसला तर घेऊ फळं किंवा तत्सम गोष्टी. यावरती २ पर्याय विक्रेत्यांनी काढलेले होते, ज्यांच्या कडे विकणारा एकच माणूस आहे त्याने काळा फळा व खडू सारखं काहीतरी आणलं आणि मोठ्या अक्षरात त्यावर XYZ पदार्थ इतके इतके रुपये लिहून ते लावायला लागला. गाडीतल्या वेगवान माणसाला विचार करायला १०-२० सेकंद देण्यासाठी तो बोर्ड तो ५०-१०० मीटर आधी लावायला लागला, त्यापुढे दुकान किंवा त्याचा ठेला. ज्यांच्या कडे एक हून अधिक माणूस उपलब्ध असेल तिथे १ माणूस १०० एक मीटर आधी उभा राहून तो वस्तू हवेत धरू लागतो म्हणजे मूळ दुकानाजवळ येई पर्यंत गाडीवानाचा निर्णय झालेला असतो. इथपर्यंत काहीही नवीन होत नसलं तरीही माणूस इतकं शिकला की त्याला निर्णय करण्यासाठी समोरच्याला थोडा वेळ देणं आवश्यक आहे आणि वाचण्यापेक्षा visuals ने लक्ष वेधणे जास्त सोपं आहे. नंतर नंतर त्यांच्याकडे स्पीकर आले, ते जोरात त्यावर ओरडू लागले. कदाचित भरधाव गाडिमधल्या लोकांना visuals पेक्षा ही ऐकण सोपं आहे हे देखील आता माणूस शिकला होता. पण तरी ही त्यात त्यांचा एक माणूस कायम बिझी असणार च होता. आता त्यांना त्यापुढे एक गंमत सापडली. आता त्यांनी त्या स्पीकर ला एक रेकॉर्डेड क्लिप जोडलेली पाहिली. ज्यावर त्याने एकदाच त्याच्याच भाषेत, त्याच्याच विशेष ढंगात वस्तू आणि त्याचा भाव रेकॉर्ड करून ठेवला होता. आता कायम लूप वरती ते रेकॉर्डिंग वाजत राहतय आणि तो स्पीकर त्या लोकानी दुकानाच्या काही अंतर आधी झाडाला किंवा बाजूला ठेवून दिला आहे. आता तो लोकांची मानसिकता आणि त्याला विचार करायला वेळ तो ही कमीत कमी human efforts ने कस साध्य होईल हे शिकला आणि हा जुगाड मला प्रचंड आवडला. त्याने त्याच्या व्यवसायात बदल केला नाही. टोल नाक्यावर विकू कीव महागडी काही दुकान टाकली नाहीत. फक्त ऑटोमेशन चा वापर त्याचे कष्ट कसे कमी होतील हे पाहिलं. आणि शेवटी आपल्या ग्राहकांचा आपल्या आवाजावर च विश्वास आहे हे त्याने ओळखंल असावं. त्याने सगळ बदलल पण ग्राहक आपल्याकडे येण्यासाठी शेवटी आपला आवाज च आपली ओळख आहे हे जाणून ते मात्र शाश्वत ठेवलं.</div><div><br></div><div>केस २:- पूर्वी उसाचा रस त्या लाकडी गाड्यावर काढला जायचा. जो त्याकाळी बैलाने फिरवला जाई, नंतर नंतर माणसे स्वतः च तो फिरवायची. त्याचा तो करकर येणारा आवाज ही त्याची ओळख होती. नंतर त्याच मशीन आलं, ऊस पिळणार धातूचं किंवा लाकडी च मशीन. पण त्या मशीन च्या चाकाच्या मध्यभागी किंवा तत्सम जागी एक घुंगरू लावायला सुरुवात झाली. कोणी सुरू केली ही पद्धत देवास ठाउक पण ही signature sign झाली. कुणाला ही फक्त आवाजावरून कळायला लागलं की इथे आसपास उसाचा रस मिळतो. आज एका ठिकाणी असाच रस एका रसवंती गृहात गेलो. गेल्यावर लक्षात आल की इथे ग्राहक तर नाहीच आहेत आणि मशीन पण तो माणूस आत्ता सुरू करतोय आपण ऑर्डर दिल्यावरती. मग हे घुंगरू कसे वाजतायत आधीपासून. तर त्या बाबाजी ने मोटार टाईप मशीन सारखं लाऊन ते घुंगरू दुकानासमोर झाडाला लाऊन टाकले होते. जे कायम वाजत राहत होते, मशीन सुरू असो की बंद.</div><div> म्हणलं साला याला म्हणतात ग्राहकांच्या सवयी जपणे. मशीन तर अद्ययावत आहे कसला आवाज नाही. पण लोकांना थोडी याची सवय आहे. त्यांना हाक मारायला आणि नोटीस व्हायला घुंगरू तर वाजले पाहिजेत. या आवाजाची ओळख तर पठ्ठ्यानी कायम ठेवली आणि आपल्या जुगाड संस्कृतीची सुद्धा.</div><div><br></div><div>भारतात ऑटोमेशन चालेल पण आपल्या नियमानुसार आणि सवयी नुसार... हे मात्र खर...!!</div><div><br></div><div>©प्रसन्न कुलकर्णी</div></div><div><br></div><div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEj-h3r9J2OqDwpKKa768Pe6j6te_r_KMUqS6RaUlghyWyDfLufOFvs_GV7ZFCB6ebzxHU_0epZ65nKOGCnAjpkjQwI8yVFzUc1WBAO8XjDe5nz0RCoksSt3RmeRjjlZ2P8r_EpTM5wU7Uu6/s1600/1685331044146304-0.png" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;">
<img border="0" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEj-h3r9J2OqDwpKKa768Pe6j6te_r_KMUqS6RaUlghyWyDfLufOFvs_GV7ZFCB6ebzxHU_0epZ65nKOGCnAjpkjQwI8yVFzUc1WBAO8XjDe5nz0RCoksSt3RmeRjjlZ2P8r_EpTM5wU7Uu6/s1600/1685331044146304-0.png" width="400">
</a>
</div>Prasanna Kulkarnihttp://www.blogger.com/profile/16790479522824925011noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-700383533597231797.post-77655630166116885722023-03-30T12:54:00.001-07:002023-03-31T01:11:45.869-07:00६८ वर्षांची जादूची पेटी...!!<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgNhs9Yk_Xz3f8OqgVTOpXRsAxzvmP32ZTKCuZEbKnCTS8ZBhyphenhyphenlQlRs4cY531RSEGjgLwe-vERaxdce4wZvP-ELG2ehhTTu51G0n-i0e8BDmMBqhuGemzaHp_BMY0dpznUIP0D0aPpVpRHu/s1600/1680206084217462-0.png" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;">
<img border="0" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgNhs9Yk_Xz3f8OqgVTOpXRsAxzvmP32ZTKCuZEbKnCTS8ZBhyphenhyphenlQlRs4cY531RSEGjgLwe-vERaxdce4wZvP-ELG2ehhTTu51G0n-i0e8BDmMBqhuGemzaHp_BMY0dpznUIP0D0aPpVpRHu/s1600/1680206084217462-0.png" width="400">
</a>
</div><div> शाळेत असताना निबंध असायचे ना, सूर्य उगवलाच नाही तर?, प्राणी बोलू लागले तर?, तुम्ही पंतप्रधान झालात तर ? किंवा तुम्हाला भूतकाळात किंवा भविष्यात जायची संधी मिळाली तर ? तेव्हा सुद्धा हे कल्पना रंजन करून मजा यायची अगदी अशात सुद्धा सिनेमामध्ये सुद्धा भूतकाळात किंवा भविष्यात जाता येतील असे सिनेमे पाहिले की आपल्याला अशी संधी मिळाली तर काय असे विचार येत असतात मग तेव्हा ही अनेक प्रसंग आठवतात की हे आपल्याला पाहायला मिळाल तर किती मजा येईल. त्यात छत्रपतींचे किस्से आहेत, पेशव्यांचे आहेत, स्वातंत्र्याचे आहेत, माझ्या शहराचे आहेत, माझ्या कुटुंबातील जुन्या वारसांचे अनेक किस्से आहेत. पण ते काही क्षणापूरते, घटने पूरते किंवा वैयक्तिक स्वार्थाचे आहेत. पण मला जर आज कोणी विचारलं तर खरंच अस काही शक्य झालं विज्ञानाने किंवा जादूने तर मी म्हणेन. मला खुप महापुरुष आणि त्याच्या यशोगाथा आवडतात पण त्या मी रोजच ऐकतो देखील. आणि असही ते सगळं पाहण्यात माझं सम्पूर्ण आयुष्य थिट पडेल. त्याऐवजी मी म्हणेन-</div><div> मला अक्ख एक वर्ष द्या १ एप्रिल १९५५ ते २० एप्रिल १९५६. अक्ख वर्ष मला अदृश्य स्वरूपात जगायला मिळावं. नुसतं अदृश्य स्वरूपात नाही तर अग बाई अरेच्चा सिनेमा मध्ये संजय नार्वेकर ला जसं मनातलं ऐकू येत तस शक्य व्हावं. मग मी हळूच जाऊन बसेन पुण्याच्या पंचवटी नावाच्या बंगल्यात. जिथे त्या पेटी सारख्या दिसणाऱ्या टेबल वर अण्णा उर्फ ग दि मा लिहीत बसलेले असतील आणि मी कसलाही आवाज न करता मांडी घालून, दोन हातांच्या तळव्यांमध्ये हनुवटी टेकवून लहान मुलांसारखा कुतूहलाने पाहत आणि ऐकत बसलेला असेन. आम्ही सुध्दा आयुष्यात ४ शब्द लिहून पाहिले आहेत, भले ते कितीही फाटक, तुटक, साधं आणि केवळ स्वतःपुरत असेल पण ते लिखाण ४ माणसांनी वाचण्याआधी मनात आणि नंतर कागदावर त्यात किती वेळा खाडाखोड होते, किती धाकधूक होते हे जाणून आहे. कागदावर उमटणारे शब्द हे शेवटचे निकाल असतात त्या आधी किती प्रयोग मनात होतात याची गणती नाही. हे सगळं ठिके पण हे एक वर्ष का? हा प्रश्न साहजिकपणे मनात येऊ शकतो. अण्णानी लिखाण तर आयुष्यभर केलंच की...तर १ एप्रिल १९५५ ला गदिमां आणि सुधीर फडकेंच गीत रामायण टेलिकास्ट व्हायला सुरू झालेल. एखादा बालवाडी चा विद्यार्थी थेट मराठी मध्ये पी एच डी आणि संगीता मध्ये विशारद होऊन बाहेर पडेल अस गुरुकुल ठरलं असत ते एक वर्ष माझ्यासाठी.</div><div> म्हणजे बघा गमतीचा भाग म्हणजे पहिल्या च गाण्यात स्वये श्री राम प्रभू ऐकती मध्ये सुरुवातीला लव कुश यांची माहिती सांगताना ओळ येते की,</div><div><br></div><div>"कुमार दोघे एकवयाचे सजीव पुतळे रघुरायाचे"</div><div><br></div><div>कदाचित ही माहती लव कुश यांची होती पण ती लागू होते बाबूजी आणि गदिमांना पण. असा टवटवीत कलेच्या वृद्ध माणसाला कुमार वयाचे म्हणण्याशिवाय निदान माझ्याकडे तरी पर्याय नाही आणि त्या पुढेच्याच ओळीत आणखी गंम्मत म्हणजे, आपल्यासारख्या माणसाला एप्रिल च्या रणरणत्या उन्हात उसनी देखील रसिकता आणता यायची नाही पण अण्णांच्या शब्दामध्ये मात्र त्यात पण रसिकता आलीय.</div><div><br></div><div>"ते प्रतिभेच्या आम्रवनातील, वसंत वैभव गाते कोकीळ"</div><div><br></div><div>या गाण्याचा शेवट होताना गदिमांच्या मनात किती काहूर माजलं असलं असेल ते मला पाहायचाय. एक मुरलेला लेखक म्हणून ते शांत असतील ही पण एक हळवा कवी म्हणून ते लिहिताना २ थेंब तरी रडले असतील का ? आणि असतील तरी ही, श्रीराम स्वतः त्यांचा हुंदका थांबवून शैशवा ऐवजी गदिमांना कवळून गेला असेल का अशी भाबडी शंका मला येते. त्या ओळी म्हणजे-</div><div><br></div><div>पुरुषार्थाची चारी चौकट</div><div>त्यात पाहता निजजीवनपट</div><div>प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट</div><div>प्रभुचे लोचन पाणावती</div><div><br></div><div>मध्ये एक कडवं सोडून</div><div><br></div><div>सोडुनि आसन उठले राघव</div><div>उठुन कवळिती अपुले शैशव</div><div>पुत्रभेटीचा घडे महोत्सव</div><div>परि तो उभया नच माहिती..!!</div><div><br></div><div>जेव्हा पहिल्यांदा मी "राम जन्मला ग सखे ऐकलं" तेव्हा त्यात सांगितलेली तिथी मला तशीच आठवते कायम आणि लक्षात ही तशीच राहते. </div><div><br></div><div>चैत्रमास त्यांत शुद्ध नवमी ही तिथी</div><div>गंधयुक्त तरिहि वात उष्ण हे किती</div><div>दोन प्रहरी का गं शिरीं सूर्य थांबला</div><div>राम जन्मला गं सखी राम जन्मला</div><div><br></div><div>ते ऐकताना काही क्षणासाठी का होईना पण अस वाटून जात की राम जन्मला तेव्हा सूर्य शिरी येऊन थांबला होता अशी फक्त वेळेची माहिती नाही तर त्याचा सोहळा केला आहे. केवळ राम जन्मला हे पाहण्यासाठी सूर्य देखील शिरी येऊन थांबला होता असा भास झाल्याशिवाय राहत नाही.</div><div><br></div><div>आपण म्हणतो तशा लार्जर दॅन लाईफ प्रतिमा सहज पणे तयार करण्यात गदिमा फार सहज यशस्वी झालेत. म्हणजे बघा ना आकाशाईतकी उंची असलेला राम आणि डोहा इतकी आर्तहृदयी सीता हे सांगायला</div><div><br></div><div>"आकाशाशी जडले नाते धरणी मातेचे,स्वयंवर झाले सीतेचे"</div><div><br></div><div> इतकीची ओळ पुरली गदिमांना.</div><div> </div><div>स्वयंवर करताना असलेला कठीण पण आणि तिथे कर्णकर्कश आवाजात रामाने केलेले शिवधनुष्याचे २ तुकडे हे सांगायला आपल्याला एक अक्ख पान लागेल पण</div><div><br></div><div>"तडीताघाता परी भयंकर नाद तोच होई"</div><div><br></div><div>इतक्यात झालं या आधुनिक वाल्मीकीच, आपली कन्या रघुवंशात पडतेय हे ऐकून झालेला आनंद सोबतच तो कन्यादानावेळी गिळला जाणारा आवंढा एका ओळीत मांडला गेलाय.</div><div><br></div><div><br></div><div>हात जोडुनी म्हणे नृपती तो विश्वामित्रासी</div><div>आज जानकी अर्पियिली मी दशरथपुत्रासी"</div><div><br></div><div>पण हे मांडायच्या आधी तो मनात किती वेळा खोडला आणि लिहिला गेला असेल तो पाहता यायला हवं, यासाठी मला तिथे जायचय आणि त्यांच्या मनात काय चाललंय, तो कोलाहल मला ऐकायचंय.</div><div><br></div><div>मला खूप वेळा हा प्रश्न पडायचा की रामायणात असंख्य प्रसंग आहेत, अनेक व्यक्ती आणि त्यांच्या भूमिका आहेत पण तरी गदिमांनी काही विशेष खास नसलेल्या गोष्टी वरती का एक एक स्वतंत्र गाणं केलं असेल, अर्थात तेव्हा अजून तितकी समज नव्हती. ती दोन गाणी म्हणजे </div><div><br></div><div>"या इथे लक्ष्मणा बांध कुटी" आणि "मज आणून द्या तो हरीण अयोध्या नाथा".</div><div><br></div><div>म्हणजे फक्त कुटी बांधण्यासाठी जी जागा निवडली किंवा आजूबाजूच्या परिसराचं वर्णन इतकंच तर महत्व आहे किंवा फक्त त्या हरिणा मुळे झालेलं सिताहरण यापेक्षा त्याच महत्व अस काय आहे? पण परत परत ती गाणी ऐकली आणि थोडं कळत वय झाल. माझे मला काही अर्थ उमगत गेले किंवा मी तसे ते काढले अस ही म्हणू शकतो. आधी सम्पूर्ण गाण्यात तिथल्या परिसरात कसे साधक मुनीजन राहतात, फळे फुले वेली, कोकीळ व इतर पक्षी, हजारो प्रकारची फुले आणि सौंदर्य आहे हे वर्णन केले आणि शेवटी २ कडव्या मध्ये इथे कसे हिंस्त्र श्वापदे राहत असून आपण कायम आपली आयुध तयार ठेवली पाहिजे याचा लक्ष्मणाला सल्ला दिला आहे. त्यातून किती प्रति कुल परिस्थितीत वनवास भोगला याचा अंदाज येऊ शकतो. निसर्गाची रसिकता आणि संकटाची चाहूल याच सुयोग्य भान रामाकडे कस होत हे मांडायला अण्णा विसरले नाहीत. त्या ओळी म्हणजे</div><div><br></div><div>"हा सौमित्रे सुसज्ज सावध, दिसली लपली क्षणात सावज</div><div>सिध्द असू दे सदैव आयुध, या वनी श्वापदा नाही तुटी."</div><div><br></div><div>तर " मज आणुनी द्या हो हरीण अयोध्या नाथा" हे खरं तर त्या हरींणा च निमित्त झालं पण जानकी साठी हरीण म्हणजे मोठी गोष्ट होती का तर नाही? पण तिला देखील अत्यंत मोह व्हावा अगदी ती साक्षात लक्ष्मी असून देखील. म्हणजे ते हरीण कस असेल? याच कौतुक लिहिताना गदिमा काही काळासाठी आपण पुरुष आहोत हे विसरले असतील का? त्याशिवाय का तो स्त्री हट्त किंवा श्रुंगार लिहिता आला असेल ? स्त्री च्या तोंडी वाक्य टाकणं वेगळं आणि त्यासाठी स्त्री सारखा विचार करणं वेगळं. नाही का?</div><div><br></div><div>"चालतो जलद गती मान मुरडीतो मंद,</div><div>डोळ्यात काहीसा भाव विलक्षण धुंद,</div><div>लागला मृगाचा मला नाथ हो छंद" </div><div><br></div><div>आणि बाबूजींनी पण अगदी २ क्षण तो लडिवाळ हट्ट आपल्या आवाजात आणून पुढची ओळ पूर्ण साजेशी रंगवली.</div><div><br></div><div>"जा करा त्वरा मी पृष्टि बांधिते भाता" अगदी माझ्यासाठी हे घेऊन या म्हणून क्रेडिट कार्ड हातात देणारी बायको कुणाला न दिसली तर नवलच.</div><div><br></div><div>जटायू ने रामाला जेव्हा माहिती दिली की, माहिती कसली तर अपराधी पणाने वदंता केली की हे रामराया तुझ्या पत्नीला मी नेताना पाहिलं आहे आणि तिला अडवायची मी शर्थ केली पण मला माफ कर मी वाचवू शकलो नाही. जेव्हा जटायू हे सांगत होता, तडफेने, विवश होऊन बोलत होता की-</div><div><br></div><div>हे पंख छेदिल्यावरती</div><div>मी पडलो धरणीवरती</div><div>ती थर थर कापे युवती</div><div>तडफडाट झाला माझा, तिज कवेत त्याने घेता.</div><div><br></div><div>हे लिहिताना माडगूळकरांची लेखणी ही त्वेषाने चालली असेल का कागदावरती आणि काही क्षणापूरते त्याचे व्रण उमटले असतील का पेटीवरती ते मला शांत पणे आणि अगदी हळूच त्यांचं लक्ष नसताना कागद वर करून पाहायचाय.</div><div><br></div><div>तशी अनेक गाणी आहेतच पण इथे शब्द मर्यादा आहेत म्हणून मला आठवतील ती मोजकी वाक्य जी आठवतायत ती.</div><div><br></div><div>तसा रामायणात कधीच बीभत्स पणा नाही पण पेटवि लंका हनुमंत मध्ये </div><div><br></div><div>"जळे धडा धडा ओळ घरांची राख कोसळे प्रासादांची" लिहुन तो जरासा डोकावतो किंवा </div><div><br></div><div>"माय लेकरा टाकून धावे, लोक विसरली नाती नावे" लिहिताना करुण रसा च दर्शन होत.</div><div><br></div><div>हा बीभत्स पणा किंवा करुण रस केवळ हनुमानाच शौर्य दाखवण्यासाठीच होता अस दिसत, कारण पर राज्यात केलेली कामगिरी दाखवण्यासाठी त्याच उपद्रवमूल्य दाखवण आवश्यक आहे.</div><div><br></div><div>मला विशेष आवडणार आणि पराधीन आहे जगती नंतर सगळ्यात जास्त ऐकलेलं गाणं कोणतं अस मला विचारल तर मी सांगेन "आज का निष्फल होती बाण"</div><div><br></div><div>जेव्हा राम म्हणतो की</div><div>"आज का निष्फल होती बाण,</div><div>पुण्य सरे की सरले माझ्या बाहुमधले त्राण?" तेव्हा खरी जाणिव होते की हो बाबा रामाने सुद्धा मानव जन्म जगला आहे. तो सुद्धा हतबल झाला होता आणि जसे आपण वारंवार प्रयत्न करून ही काही ठिकाणी हतबल होतो तसे अनुभव रामाने सुद्धा मनुष्य रुपात घेतलेले आहेत.</div><div><br></div><div>आपल्याला देखील आपल्या टिचुक भर ज्ञानाचा माज असतो तसा आणि तो कधी ना कधी आपल्याला जमिनीवर आणतो,कदाचित हेच शिकवण्यासाठी कोणती ही लीला न दाखवता हतबलता दाखवली आहे.</div><div><br></div><div>"माझ्याहून ही असह्य झाला, विद्येचा अपमान" किंवा "मला ही ठरला अवध्य का हा तनुधारी अभिमान" याहून त्याची खात्री च पटते.</div><div><br></div><div>आणि भूवरी रावण वध जाहला चा शेवट...!!</div><div><br></div><div>हे सगळं पेटी वरती बसून लिहिलं गेलं त्याला उद्या १ एप्रिल ला तब्बल ६८ वर्ष पूर्ण होतायत. काल वाचलेली कविता आपल्याला आज कंटाळवाणी वाटते. पण ६८ वर्षांपासून मुरलेल हे लोणचं आणखी चविष्ट तर वाटत आहेच पण त्याची रेसिपी पण न समजण्यापुढे गेली आहे.</div><div><br></div><div>अर्थात मी काही भूतकाळात जाऊन अण्णांपाशी जाऊन बसू शकत नाही पण हनुमानाने जस याच गीत मालिकेमध्ये एक वर मागितला आहे तसा मागावा आणि तो आयुष्यभर पाळला जावा इतकंच काय मागाव~</div><div><br></div><div>सूक्ष्म सूक्ष्म देहा धरुनी</div><div>फिरेन अवनी फिरेन गगनी</div><div>स्थली स्थली पण राम कथेचा लाभ मला व्हावा,</div><div>प्रभू मज एकच वर द्यावा.</div><div><br></div><div>~प्रसन्न कुलकर्णी </div><div> </div>Prasanna Kulkarnihttp://www.blogger.com/profile/16790479522824925011noreply@blogger.com2tag:blogger.com,1999:blog-700383533597231797.post-36084162209247155082022-07-23T20:42:00.001-07:002022-07-23T20:42:42.719-07:00बस रेटिंग्स मे याद रखना...!!<div><br></div><div> काल रात्री उशिरा झोमॅटो वर काही ऑर्डर केलेलं, तो डिलिव्हरी बॉय 15 च मिनिटात घेऊन आला. जाताना रेटिंग्स द्या हा सर अस म्हणून गेला. तसा हा कंटाळवाणा प्रकार मला फारसा आवडत नाही किंवा त्याबाबतीत मी थोडासा आळशी आहे की कोण त्या अँप किंवा साईट वरती जाऊन रेट वगरे करेल. पण तेव्हा तो अगदी मिस्टर पूर्णब्रह्म बनून माझ्या कडे आला होता आणि अगदी एक ही कॉल न करता बरोबर पत्त्यावर आला होता म्हणून समाधानी होतो ते वेगळं च..!! सढळ हातांनी सगळीकडे ५ पैकी ५ सगळ्या निकषांवर मी वाटून टाकले आणि बाहेर पडतो तितक्यात अजून एक नोटिफिकेशन आलं. How was your dinner ? Please rate restaurant म्हणून. त्याला म्हणलं तुझं आणि वेगळं असतंय का? म्हणलं घे..तू भी क्या रखेगा..!! पण इकडे विचार चक्र सुरू झालं होतं.</div><div> अशात रेटिंग्स या गोष्टीशी किती वेळा संबंध आलाय हे आठवत होतो. गूगल मॅप वाले जागे साठी, प्ले स्टोरवाले अँप साठी, हॉटेल वाले,लॉज वाले, ओला कॅब वाले, झूम कॉल वाले, duo वाले वगरे वगरे वगरे..!! इतकंच काय ऑफिस मध्ये ही बोनस साठी..!! निश्चित च रेटिंग्स ही एक चांगली पद्धत आहे आपला उत्पादन किंवा सेवा यांची अनेक निकषांवरती मोजमाप करत राहण्याची. अगदी डिलिव्हरी बॉय किंवा ओला ड्रायव्हर यांना तर न विचारता पत्ते सापडणे, बोलण्यातली अदब, स्वच्छता हे ही निकष आहेत. निश्चित ही एक उत्तम गोष्ट भारतात रुजतेय हे नक्की. खोटं बोलणे, अपमानास्पद बोलणे, सुट्टे पैसे, खराब दर्जा अशा अनेक गोष्टीं या मधल्या लोकांकडून होतात. सगळे नाही अगदी ५-१०% लोक तसे असतील पण त्यामुळे बदनामी सेवा आणि उत्पादक कंपनीची होत असते. या रेटिंग्स सिस्टीम मुळे त्या आडमुठ्या लोकांना सरळ करायला मदत होतेच शिवाय जे चांगली सेवा देतात त्यांना पावती सुद्धा मिळते. बहुसंख्य लोक कधीच खोटं बोलत नाही. ते काहीतरी म्हणतात ना तुम्ही थोड्या काळासाठी अनेक लोकांना मूर्ख बनवू शकता, तुम्ही थोड्या लोकांना दीर्घकाळासाठी मूर्ख बनवू शकता पण तुम्ही अनेक लोकांना दीर्घकाळासाठी मूर्ख बनवू शकत नाही. म्हणून तर आपण ऑनलाइन गोष्टी खरेदी करताना सुद्धा रेटिंग बघतो दोन वस्तूंपैकी एखाद्या वस्तूला काहीशे लोकांचं रेटिंग असेल आणि दुसऱ्या वस्तूला काही हजार रेटिंग असेल तर आपण दुसरी वस्तू घेतो. माणसांना मिळणार रेटिंग्स यावर तर त्यांचे बोनस, ओव्हर टाइम हे देखील अवलंबून असतात. विशेषतः कॉर्पोरेट मध्ये तर हे फार फोफावल आहे. खर तर कामाची गुणवत्ता, अचुकता या निकषांवरती रेटिंग व्हायला हवं पण कित्येकदा अंतर्गत पॉलिटिक्स, संबंध किंवा कित्येकदा तर हाजी हाजी करणाऱ्याला ते अधिक दिले जातात. दुर्दैवाने फक्त त्या रेटिंग्स मुळे ४ पैसे मिळतात त्यासाठी हतबल झालेलं मी पाहिल आहे.</div><div> जुन्या हिंदी सिनेमामध्ये डॉक्टर च्या तोंडी एक हमखास वाक्य असायचं- अब इन्हे दवा की नही दुवा की जरूरत है. तस मला इथे जाणवत- तशी भारतीय लोक संवेदनशील आणि प्रेमळ मानली जातात. आता रेटिंग पद्धतीने सेवा सुधारत असलो तरी कैक वर्ष आपण ग्राटिंग पद्धतीने सेवा देतोय. जाता येता राम राम करणारे दुकानदार, कुणी आजारी / गरोदर असेल तर आधीच रिक्षा किंवा गाड्या सांगून ठेवणे, घरी काही अडचण असेल तर फक्त हाक मारून घरपोच ते ही उधारीवर सामान येऊन पडणे, अरे वा छोटी ताई आली का आज बाबा सोबत अस म्हणत २-५ रुपयांच चॉकलेट दुकानदार काकांनी च देणे हे सगळं फक्त आणि फक्त येता जाता ग्रीट करायच्या म्हणजे फक्त जिभेवरच्या साखरेच्या खड्यानी होत असे. आता तुम्ही वाटेल ते पैसे मोजा, सेवा तितकी च मिळेल पण त्या प्रत्येक सेवेमागे रेटिंग आणि त्याची किंमत आहे. काळाचा महिमा म्हणून रेटिंग पद्धत घ्यावीच लागेल पण थोडी थोडकी का असेना ग्रीटिंग पद्धत टिकून राहणे ही भारतीयांची गरज आहे कारण ती त्यांची ओळख आहे आणि वेगळेपण आहे.</div><div><br></div><div>नंतर एखादा सेवेकरी बस रेटिंग मे याद रखना अस म्हणताना आपल्याला हसून धन्यवाद किंवा नुसतं टाटा करून गेला तरी आपण यात यशस्वी झालो अस म्हणता येईल.</div><div><br></div><div>©प्रसन्न कुलकर्णी</div><div><br></div><div><div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjXDzj9FXMefJnbQVHZFiLgY23hX1dL2up2_hprfsJ-hUy1H-vvejx5RbbUQzJVV987rEzyDljj3Q2L7dcch0AUvGRnl5IHabrI5xJe0PiNMhf0lljQd-Y3lytEwsyiYNshWl5kHzsWm9qF/s1600/1658634154674112-0.png" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;">
<img border="0" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjXDzj9FXMefJnbQVHZFiLgY23hX1dL2up2_hprfsJ-hUy1H-vvejx5RbbUQzJVV987rEzyDljj3Q2L7dcch0AUvGRnl5IHabrI5xJe0PiNMhf0lljQd-Y3lytEwsyiYNshWl5kHzsWm9qF/s1600/1658634154674112-0.png" width="400">
</a>
</div><br></div>Prasanna Kulkarnihttp://www.blogger.com/profile/16790479522824925011noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-700383533597231797.post-83505534315642899162022-02-26T09:44:00.000-08:002024-02-26T19:32:11.426-08:00'मूक' बैठक आणि माझी 'बधीर' झालेली भाषा..!!<div><br></div><div> सकाळपासून मराठी गौरव दिनाच्या पोस्ट, कविता, दिसत होत्या. खूप दिवसात काही लिहिलं नाही अशी खंत ही होतीच पण सुचत ही नव्हतं काही आणि ठरवलं असत तर तरी तेच घीस पीठ लिखाण झालं असत, एक तर मराठी भाषेचा गोडवा किंवा आपण मराठी असून मराठी का बोलत नाही यावर उपरोध जो दरवर्षी फक्त आज वाचण्यात येतो. जाऊ दे म्हणत आपला दिनक्रम केला आणि संध्याकाळी नेहमीच्या खानावळीत जेवायला गेलो, तिथे जेमतेम ८-९ लोक बसतील इतकी जागा असते. आम्ही जाऊन बसलो तिथे आधीच ४-५ मुलं होती. जेवण यायला वेळ होता म्हणून सगळेच जरा टाईमपास करत बसले होते. त्या काकांनी येऊन काय हवं नको विचारलं आम्हाला आणि त्या 4-5 मुलांना खुणेने विचारलं. ते सगळे मूक बधीर होते किंवा ऐकू येत असावं काही जणांना.</div><div> हळू हळू त्या पोरांच्या खुणेने च गप्पा सुरू होत्या. कोणी मॅच पाहून दुसर्यांना रन सांगत होता, त्यांनी खुणेनेच त्या काकांना काय हवं ते सांगितलं. त्यांचे हातवारे पूर्ण पणे कळत ही नव्हते इतके फास्ट होते, तरी मला काय कळतंय हे मी प्रयत्न करत होतो. जसा जसा वेळ चालला होता मला त्यांचा हेवा ही वाटायला लागला, अपराधी पणा ही यायला लागला कारण नसताना आणि अस्वस्थता ही यायला लागली. इतकं सगळं एकदम का? हा साहजिक प्रश्न पडू शकतो. हेवा यासाठी की आपण ४ लोक भेटलो की मला बोलू च देत नाहीत, माझं कोणी ऐकूनच घेत नाही, मला मुद्दा मांडता च आला नाही, मी बोललेलं त्याला कळलं च नाही हे सगळं रोज घडत असत. पण ज्यांना आवाज काय माहित नाही, कदाचित शब्द कधी उच्चरला किंवा ऐकला नाही ते लोक उत्तम संवाद करत होते. सलग १० मिनिट ते मी पाहत होतो म्हणून खरतर तिथे भयाण शांतता असली तरी मला त्या 5 जणांचा दंगा अक्षरशः ऐकू येत होता. हेव्या सोबत अपराधी पण देखील जाणवत होतं. कारण त्यांच्या नकळत पणे मी त्यांचं निरीक्षण करत होतो आणि कुठे त्यांना हे लक्षात येतंय आणि ते मस्त जगत असताना मी त्यांना वेगळी वागणूक देतोय का हा अपराधी पणा. आणि त्याहून जास्त म्हणजे ते 5 सोडून मी, माझा मित्र, आणि वाढणारे काका आम्ही बोलु ऐकू शकत होतो. आम्हाला हातवारे करावे लागत नव्हते, आम्ही सहज पोचत होतो. हा सहज संवाद होतोय हे त्यांना मी हिणवतोय अस उगाच वाटून गेलं आणि काही गरज नसताना अपराधीपणाची जास्त जाणीव झाली.</div><div> या दोन्ही भावनेपेक्षा तिसरी भावना, म्हणजे अस्वस्थेततेची जास्त भयंकर होती,जी चिरकाळ टिकणारी वाटली. आपण अनेक भाषेत बोलतो, ऐकतो, वाचतो. आपल भाषेवर प्रेम असत, आपण ती टिकावी म्हणून यत्न करतो, राजभाषा म्हणून हट्ट धरतो, इतर भाषिकावर राग ही धरतो, भाषेवर राजकारण ही करतो. हा सगळ प्रेम, हट्ट, माज कशाचा तर भाषेचा, जी आहे म्हणून. ज्यांना संभाषणा साठी कोणत्या ही भाषेचा सहारा मिळत नाही त्यांचं काय? ज्यांना आवाज नाही त्यांना वापरता येईल अशी एक भाषा नाही जगात. ब्लड इज थिकर दॅन वॉटर म्हणतात तस, त्यांचे नातेवाईक इतर इंद्रिय त्याच्या कामाला येतात. आणि भाषा विषयाला झालेली ग ची बाधा कमी करतात. हा झाला बाहेरच्या जगाशी संवाद...ठिके त्यांना ब्रेल मधून मराठी किंवा कोणती तरी भाषा येत असेल असं समजू. पण आपली आवडती भाषा ऐकणं यात वेगळ सुख असत. विशेष करून गाणी आणि कविता याबद्दल बोलु. कारण ते शब्द वाचता येतात ब्रेल मधून पण ऐकणार कस?</div><div>लहानपणी रडताना यांची आई आजी कस शांत करत असेल यांना, ये ग गाई गोठ्यात,बाळाला दूध दे वाटीत कस सांगणार यांना किंवा लिंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपताना दाखवणं आणि ऐकवण यात फरक आहे. आत्या मामा मावश्या हात करून दाखवणं आणि आजोबा आजी मावश्या दोन हे गाणं म्हणणं, किंवा मामाच्या गावाला जाऊया म्हणणं हे कसं पोचवणार आपण?, आपण ऐकतो मराठी मध्ये सुद्धा खूप..मी तर अजून ही मूड नुसार सगळं ऐकतो गदिमां आणि बाबूजीचा गीत रामायण ऐकतो, अरुण दातेचा जुना रोमान्स असलेलं जेव्हा तिची नी माझी चोरून भेट झाली ऐकतो, बहिणाबाई च मन वढाय वढाय ऐकतो, सुमन कल्याणपूर च असावे घर ते आपले छान ऐकतो, मंगेश पाडगांवकरांचं प्रेम म्हणजे प्रेम असत ऐकतो किंवा कुसुमाग्रजांची पाठवरती हात ठेवून लढ म्हणा ऐकतो, रम्य ही स्वर्गाहुन लंका ऐकतो तर कधी अगदी अशातले रिदम चे बादशहा अजय अतुल ऐकतो, कधी प्रेरणा हवी असेल तर सोडी सोन्याचा पिंजरा ऐकतो, थकलो तर आयुष्यावर बोलू काही ऐकतो किंवा वाट दिसू दे ऐकतो....मी आणि सगळेच मूड नुसार खूप काही ऐकतो आणि त्या गाण्यांमधून व्यक्त होऊन सगळं बाहेर काढतो. यांचं हे अडकून पडलेलं बोलणं कस बाहेर पडत असेल.?</div><div><br></div><div> असे अनेक प्रश्न डोक्यात घेऊन जेवण सुरू झालेल होत...आणि हो माझं ही माझ्या मराठी वरती प्रचंड प्रेम आहेच पण खरच एखाद्या भाषेचा दिवस साजरा करून आपण त्याला मोठं करतोय की लहान हेच कळेनासं होत. ज्याचं भाषेवरती खरच प्रेम असत तो सगळ्या भाषेवरती करतो. आपल्या भाषेचा अट्टाहास धरून स्वतःला आणि इतरांना कमी लेखत नाही. साहित्य चांगलं असेल तर भाषांतर करून ही विकल जातच, म्हणजे भाषेचा अडसर किंवा मर्यादा माणसाला असू शकतो, साहित्याला नाही.</div><div><br></div><div> तरी ही माझं माझ्या मराठी वरती प्रेम आहेच,आणि त्याच्या शुभेच्छा ही मी देणार आहेच. पण एक गोष्ट लक्षात ठेवून की 'संभाषण' या क्रियेत आणि शब्दात 'भाष' आहेच पण ते नसताना ही ज्यांना संवाद करता येतो त्याचा उत्सव किंवा 'संण' होऊ शकतो. (संभाषण वजा भाष)</div><div><br></div><div>असो</div><div><br></div><div>©प्रसन्न कुलकर्णी<br><div>
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjA9M9klxuQc7ac3OeFQXXuUZEPOD9hzAHM1jLEhzSai95egMkGaUKqsXYwPm6TW_yBPFBViOCJb_PMPKuEt5ZxwNn0ShcL0BTo4yj3zAWnH8TsbckAN3vAchkIdtmktfBNp4v430Mn-Zkt/s1600/1645897359182073-0.png">
<img border="0" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjA9M9klxuQc7ac3OeFQXXuUZEPOD9hzAHM1jLEhzSai95egMkGaUKqsXYwPm6TW_yBPFBViOCJb_PMPKuEt5ZxwNn0ShcL0BTo4yj3zAWnH8TsbckAN3vAchkIdtmktfBNp4v430Mn-Zkt/s1600/1645897359182073-0.png" width="400">
</a>
</div></div><div><br></div><div><br></div>Prasanna Kulkarnihttp://www.blogger.com/profile/16790479522824925011noreply@blogger.com2tag:blogger.com,1999:blog-700383533597231797.post-75499529150294273332021-09-18T11:00:00.000-07:002021-09-18T11:01:55.959-07:00सावली माडगूळकरांची...!!<p dir="ltr"></p><div class="separator" style="clear: both; text-align: center;"> मोठी माणसं सांगत असतात आपल्याला एखादी गोष्ट कळत नसेल तर त्याविषयी बोलू नये....आणि लिहू तर अजिबातच नये. पण मोह अनावर झाला आणि तो का झाला हे खाली कळेल च...अर्थात लहान तोंडी फारच मोठा घास म्हणावा लागेल याला..<br></div>
आपण मोठे होतो आणि होताना आजबाजूच्या बऱ्याच गोष्टी आपल्याला old fashioned वाटायला लागतात, आणि आपण नवीन गोष्टी मधे धुंद होतो. त्या बऱ्याच गोष्टी मधे संगीत हे पहिल्या तीनात येत असाव. त्यात आपल्याला भावगीत भक्तीगीत वगैरे अस नुसत ऐकलं तरी हे काय बोरींग किंवा म्हाताऱ्यांसारख देवाची गाणी लावलीयत अस होत जे वयानुसार साहजिक आहे. माझ्या ही शाळा कॉलेज पासून आणि मोबाईल हातात आल्यापासून त्यात मराठी हिंदी देशी विदेशी गाण्याच्या कित्येक playlist फोन मधे बनवलेल्या होत्या. त्यात आता सोने पे सुहागा म्हणता येईल अशी आपल्याकडे एक अफाट गोष्ट आहे ती म्हणजे वेग वेगळे बँड्स जुन्या गाण्यांना नवीन वर्जन मधे म्हणतात काही रिमेक तर काही फक्त नवीन गायक तर काही फक्त नवीन म्युसिक लाऊन वगैरे. यांच्या कल्पना भन्नाट असल्या तरी ही लोकं काही गाण्याचं अगदीच वाभाड काढतात तर काही अगदीच लाजवाब बनतात. झालं अस की काही महिने आधी एकदा you tube वरती फिरत असताना एक मराठी गाण लागलं पहिल्या दोन ओळी ऐकल्या-<br>
<br>
" दैवजात दुःखे भरता, दोष ना कुणाचा<br>
पराधीन आहे जगती, पुत्र मानवाचा..!!"<br>
<br>
2 सेकंद थांबलो, कारण भरपूर मराठी गाणी ऐकत असलो तरी ती समजायला विचार करायला लागावा इतकं जड ऐकून सवय नव्हती. ते शब्द सरळ असले तरी अर्था मधे ताकद होती हे नक्की. रोज बाहेर पिझ्झा बर्गर पंजाबी चायनीज कॉन्टिनेन्टल फूड खाऊन एखाद वेळी अचानक घरी पुरणाची पोळी अन् कटाची आमटी खावी आणि वाह क्या बात है अस तोंडातून पडाव हे अगदी तसच काहीतरी होत. गाण्याचं ध्रुवपद तर ऐकलेल वाटत होत. मूळ गाण शोधून घेतल. नंतर काही दिवस ते गाणं अनेक वेळा ऐकलं. खूप दिवसानंतर गाण्यातल्या गोडव्यापेक्षा शब्द आणि अर्थ यावर फोकस आला होता. म्हणून ते गाणं कुठल आहे कोणी गायल आहे यापेक्षा इतकं सॉलिड कुणी लिहील आहे याचा शोध घेण्यात लक्ष होत. ते शब्द होते ग. दि. माडगुळकर उर्फ गदिमांचे.<br>
तस नाव नवीन नसल तरी गीतकार आणि कवी म्हणून गदिमा नावाचं कुतूहल पुन्हा नव्याने जाग झालं. नेहमीच्या आपल्या खबऱ्याला गूग्ल्या ला विचारलं आणि त्याने क्षणात वेग वेगळ्या लिंक मधून माहिती दिली. त्याची गीतांची यादी बघून मी अक्षशः आ वासला. कारण यादी खूप मोठी होती आणि त्यातली कित्येक गाणी गेल्या 5-10 वर्षात स्वतः ठरवून अशी ऐकावी अस काहीच नव्हत त्याल कारण तेच सगळी old fashioned असतील असा स्टॅम्प मारला होता पणं एक नक्की, ऐकली नसली तरी तीच गाणी रोज ऐकतो की काय इतकी सवयीची वाटली. गाण्याचं नाव वाचल तरी पुढच्या ओळी अचूक येत होत्या जिभेवर. १०-१५ मिनिटांसाठी का होईना पण सगळी वर्ष आणि आणि त्यावेळी ऐकू येणारी गाणी आणि तेव्हा बोर वाटणारी काही गाणी अचानक छान वाटायला लागली होती. आधीच का नाही ऐकली अस वाटू लागलं. जस परगावी गेल्यावर गावचा तोंड ओळख असलेला माणूस भेटावा आणि तिथं तो जवळचा वाटून काही वेळ गप्पा व्ह्याव्या आणि आधीच ओळख का नाही झाली आपली अशी खंत यावी अस काहीस. तशी यादी फार मोठी आहे पणं काही निवडक उल्लेख टाळू शकत नाही.<br>
आता मराठी शाळेत शिकल्यानेे बालगीत आणि कविता ऐकतच आम्ही शाळा शिकलेली होती पणं सगळ्या गाण्यामध्ये 'नाच रे मोरा', 'गोरी गोरी पान' तर होतेच पण 'शेपटीवल्या प्राण्याची सभा' भरवणारे, आणि 'झुक् झुक अगीन गाडी' मधे फक्त शिक्रण येणाऱ्या मामीला सुगरण बनवणारे गदिमा होते हे कळल तेव्हा त्यांची सहजता लक्षात आलीच पणं सोबत लहान मोठ्याना आजही गुंतवून ठेवत अस 'एका तळ्यात होती बदके पिले सुरेख'बघून त्यातली प्रतिभा पणं जाणवली कारण लहान मुलांना साधं बोलण जिथं अशक्य तिथे त्यांनी motivational गाणं बिण लिहील होत त्यातल्या 'एके दिनी परंतु पिलास त्या कळाले' ऐकताना आजही तोच आनंद होतो जो तेव्हा व्हायचा. या सगळ्याचा कडेलोट म्हणजे एका बाजूला 'आईसारखे दैवत साऱ्या' म्हणायचं आणि दुसरीकडे 'आई आणिक बाबा यातुन कोण आवडे अधिक तुला' अस विचारायचं हा विरोधाभास गदिमा च साधू शकले. स्वातंत्र्य दिनी आणखी एक गाणं हमखास लागायचं ते म्हणजे, 'हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेशितांचे' त्यात एक अफाट कडव आहे 'आता नको निराशा थोड्या पराभवाने, पार्थास बोध केला येथेच माधवाने'. या एका ओळीतं पराभव पच्वण्याची गरज आणि कुरुक्षेत्रची व्यापकता डोकावते.<br>
आणखी दोन गोष्टींची ही या यादिने जुनी सफर घडवून आणली ती म्हणजे घरात असणारा एक कीर्तनकार आणि दुसरा रेडिओ. त्यातला कीर्तनकार होते त्यांचं 'कानडा राजा पंढरीचा', 'विठ्ठला तू वेडा कुंभार' आणि 'झाला महार पंढरीनाथ' आवर्जून ऐकत नसलो तरी कित्येकदा कानावर पडलेल होत पणं जाणवलेली गोष्ट ही एकच कवीने विठ्ठलाला राजा, कुंभार आणि महार बनवून आणि तिन्ही भूमिकांमध्ये चपखलपणे नुसत बसवल नव्हत तर त्याला न्याय ही दिला होता. आणखी ही असच एक गाणं 'नाही खर्चीली कवडी दमडी, नाही वेचला दाम, बाई मी विकत घेतला शाम' या गाण्याचं संदर्भ तर अच्युत गोडबोले नी त्यांच्या अर्थात या अर्थविषयक पुस्तकात दिलं आहे त्यात त्यांनी या गाण्याने सुरू करून पैसा आणि चलन यात कवडी आणि दमडी ची किंमत काय इथून सरू केलं आणि आणि त्यावेळी गदीमा ना हे सुचाव हे नवलच. दुसरा आहे रेडिओ जो माझ्या वयाची पहिली १५ वर्ष नित्यनेमाने घरात वाजायचा. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या परभणी किंवा उस्मानाबाद केंद्रावरून अस सुरू होणारा आवाज २ तास तरी नक्की चालायचा मग त्यात ऐकलेली गाणी आज परत त्या यादीत दिसली जस की 'देव देव्हाऱ्यात नाही, संथ वाहते कृष्णामाई, घन घन माला नभी दाटल्या, तुझे रूप चित्ती राहो, खेड्या मधले घर कौलारू, एक धागा सुखाचा' या एक ना अनेक गाणी आणि त्याचे वेग वेगळे अर्थ यातुन गदिमांच शब्दसामर्थ्य न कळल तरच नवल. पुढे टीव्ही वर चालणाऱ्या रियालिटी शोज मधे पणं काही गाणी पेटंट येऊ लागली अर्थात सगळी आवडत नसली तरी आता सवयीची झाली होती जस की 'कशी झोकात चालली कोळ्याची पोरं, गोमू माहेर ला जाते हो नाखवा, पदरवरती जरतरीचा किंवा एक हौस पुरवा महाराज' वगैरे वगैरे. नंतर कुठे तरी ऐकलेली आणि मनात घर करून गेलेली 'या चिमण्यांनो परत फिरा घराकडे आपुल्या किंवा फिटे अंधाराचे जाळे असेल....या दोन्ही वर तर कोणालाही काही वेगळे सांगायची बोलायची गरज पडणार नाही. ऑफिस मधे गाणी वाजायची अर्थात सगळी नव्या फिल्म्स ची पणं मधेच कोणा एका मोठ्याला 'रम्य हि स्वर्गाहून लंका' किंवा 'एकवार पंखावरून लावायची' हुक्की येई तेव्हा ती ही पक्की मनात बसली गेली होती. ही झाली वेगवेगळ्या ठिकाणी ऐकली म्हणून लक्षात राहिलेली गाणी पणं त्या सोबतच काही गाणी त्यांच्या वेगळेपणा मुळे लक्षात राहिली. त्यात एक म्हणजे 'वेदमंत्रहून आम्हा वद्य वंदेमातरम्' तेव्हा गदिमांना ही कोणी भेटला होता का वंदे मातरम् नको म्हणणारा हे त्यांनाच माहिती ( राजकीय पोस्ट कानाला खडा), दुसर 'बहरला पारिजात दारी' लहानपणी घरी पारिजात होता तेव्हा त्याची फुल बाहेर पडायची तेव्हा आजी म्हणाली होती हा तर गुणधर्म आहे याचा आणि यावरच गाणं देखील आहे 'बहरला पारिजात दारी, का फुले पडती शेजारी' त्यामुळं ते लक्षात राहील होत आणि तीसर घन निळा लडि वाळा झुलवू नको हिंदोळा यात म्हणे एकदा गदिमांना कोणी म्हणालं होत ळ हे अक्षर फक्त मराठीत आहे त्याचा उपयोग काय आणि त्यांनी चॅलेज घेऊन गाणं लिहल यात प्रत्येक संपूर्ण गाण्यामध्ये १२-१५ वेळा ळ असलेले शब्द वेगळ्या अर्थाने घेण्यात आलेले आहेत आहे. याला भाषा प्रभुत्व इतकंच म्हणता येईल. अशा पद्धतीने वेग वेगळ्या ठिकाणी प्रत्येक वळणावर जिथे गाण कानावर पडत होत तिथे गदिमांची सावली होतीच पणं ती त्यांची होती हे नंतर कळलं.<br>
हे सगळं लिहिण्याच कारण होत ते गाणं ज्याने हे सगळं सुरू झालं म्हणजे पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. त्रिकालाबाधित सत्य का काय म्हणतात ते या गाण्यातून इतकं सहज मांडल गेलय की बास. यात अनेक ओळी परत परत ऐकाव्या अशा आहेत मग सर्व संग्रहाचा वत्सा नाश हाच अंत असेल किंवा दोन ओंडक्याची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही भेट किंवा नको आसू धाळू आता पुस लोचनास, तुझा आणि माझा आहे वेगळा प्रवास अशा ओळींनी गाण्याला गीतरामायण पुरत न ठेवता सगळीकडे योग्य होईल त्या उंचीवर नेऊन ठेवलं. रामायणातील ५६ प्रसंग निवडून त्याला एका गीत रामायण गुंफन हा खाऊ नक्कीच नाही. जाणकार गायक म्हणतात या काव्यामधे सगळे राग छंद मात्रा परिपूर्ण आहे आणि म्हणून याला कित्येक गायक आणि कवींनी सुद्धा परिपूर्ण काव्य अस म्हणलय यात सगळे भाव आणि ९ रस पूर्णपणे योजिले गेले आहेत जसे की आपण गाण्याची नाव वाचली तरी लक्षात येईल यात बालगीत, हट्ट, दुराग्रह, आज्ञा, मागणी, आर्जव, स्त्री हट्ट, संताप, सूड, कर्तव्य, मित्र भाव, कान उघाडणी आणि विजयोत्सव हे सगळ आहे. एक कवी इतक्या फक्त एक वर्षात ५६ गाणी लिहितो आणि बाबूजी त्याला चाल देतात. हे केवळ अविश्वसनीय आहे. या दोघांनी त्याचे १८०० पेक्षा जास्त कार्यक्रम केले आणि या लिखाणा मुळे ते आधुनिक महाराष्ट्राचे वाल्मिकी म्हणून गौरवले गेले.<br>
माझी बॅच 90s ची, मराठी शाळा, मराठी ऐकणारे बोलणारे वाचणारे आजूबाजूला त्यांच्यामुळे अजून तरी अशी भाषेतली पुरणपोळी खाल्ली की वाह पडतच तोंडातून आणि हेच सगळ कानावर पडलेल आहे लहानपणापासून म्हणून ते nostalgic काय म्हणतात तस व्हायला होत. यावर्षी गदिमा आणि पुल यांची जनशताब्दी म्हणून हे लेख निमित्त पणं आणखी काही वर्षांनी कोणी गदिमा आणि कोण पुल अशी वेळ येईल अशी शक्यता निर्माण झालीच आहे कारण फुटकळ लेखक आणि what's app वरचा इतिहास यामुळं सगळेच ज्ञानी झालेत आणि चंचल झालेत. पण असल ऐकून वाचून अर्ध्या हळकुंडाने पिवळे झाले त्यात आम्ही आम्ही हेच काय ते समाधान....जाता जाता एक महत्त्वाचं, मला काहीही वेगळ माहिती नाही जे मी यांच्या विषयी लिहू शकेन म्हणून संकलन स्वरूपाचा हा प्रयत्न. त्यांनी सेतू बांधा रे गाणं लिहल होत लंकेला जातानाचा प्रसंग लिहिताना. पण ते लेखक, त्यांचं साहित्य आणि ती रसिकता यात एक अंतर पडत चाललाय हे खरं आणि हा सेतू कोणी एक जण बंधू शकणार नाही तो ज्याचा त्यांनी बांधावा लागेल हे नक्की.....छोटा प्रयत्न गदिमा जन्म शताब्दी वर्षा निमित्त<p></p>
<p dir="ltr">©प्रसन्न कुलकर्णी [Pk]</p>
Prasanna Kulkarnihttp://www.blogger.com/profile/16790479522824925011noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-700383533597231797.post-16972093208759222372021-09-18T05:50:00.001-07:002021-09-18T11:02:14.400-07:00डोपामाईनचे चाळे अन पैशांचे खेळ<div> डोपामाईन नावाचं द्रव्य मानवी शरीरात असत म्हणे जे आपल्या सुख, आनंद, कौतुक किंवा एखादी यशप्राप्ती याच्याशी निगडित असत. अर्थात हा शब्द माझ्या अशात ऐकण्यात आला आहे आणि त्याबद्दल मला फार माहिती आहे अस नाही पण मला जे शब्दात मांडायचय त्या साठी याची मदत घेतोय. तर परत मुद्द्यावर आता जे डोपामाईन आपल्या थेट कौतुकाशी जोडलेलं आहे तेच आपल्याला attention seeker बनायला लावत. मग ते चांगलं दिसणं असेल, लिखाण, संगीत, कविता, भाषण, फोटोग्राफी, चित्रकला, खेळ आणि जे जे वेगळेपण जपता येईल असं आहे ते सर्व काही माणूस आपल्या आनंदासाठी करत असेल च पण त्याच कोणी कौतुक केलं कि ते डोपामाईन छेडलं जात आणि हुरळून जाणे किंवा तेच छंद वारंवार जपायला प्रेरणा वगरे मिळणे असे प्रकार होतात. आता सोशल मिडियाने म्हणजे फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूब आणि ते टिक टॉक वेग्रे यांनी तर माकडाच्या हाती कोलीतच दिलंय. मुळात हे सगळे प्लॅटफॉर्म च Human Behaviour ला मोहात पाडून त्यांना नादाला कसं लावता येईल या technology वरच तयार झालेले आहेत. नुसतं डोपामाईन नाही तर आणखी जे काही ज्ञात-अज्ञात मायाजाल आहेत ते सगळे सुरेख गुंफलेले आहेत. म्हणून आपल्या नाना कला इथे टाकून किंवा फोटोस टाकून त्यावर लाईक, कंमेन्ट्स पाहायचा मोह कोणी टाळू शकत नाही.</div><div> याच्या पुढची गम्मत अशी की या डोपामाईन चा संबंध पैशाशी यायला लागला. कारण फक्त कौतुक किंवा attention नाही तर सुख, आनंद ही याचे घटक आहेत. लहान पणा पासून सरप्राइजेस अर्थात अनपेक्षित गिफ्ट्स हे मानवी सुखाचं मोठं कारण आहे. लहानपणी चॉकलेट किंवा कोल्ड ड्रिंक वर स्टिकर यायचे.हे स्क्रॅच करा आणि गिफ्ट्स मिळवा. ते कुतूहल डोपामाईन छेडायच आणि त्या नादाने पोर आणखी खरेदी करायचे. हे झालं लहान मुलांच, मोठे मोठे लोक पत्ते, जुगार, लॉटरी चे तिकीट खरेदी करायचे कारण अचानक मिळणारा पैसा ज्यामुळे त्यांचं डोपामाईन ट्रिगर व्हायचं. त्यात दुहेरी आनंद होता एक तर पैसा मिळेल आणि दुसरं माझं नशीब किंवा माझी हात चलाखी किती उत्तम आहे ही सुखद भावना. पण लॉटरी, जुगार, पत्ते हे तसे निषिद्ध खेळ असल्यामुळे लोक चोरून करायचे किंवा फार कॉमन नव्हतं. पण जसा जसा मोबाईल प्रत्येक हातात गेलाय आणि नवीन मार्ग सहज उपलब्ध आहेत तसा हा खेळ भयंकर होऊ शकतो, असा विचार उगाच डोक्यात फिरतोय. याची सुरुवात paytm, गूगल पे, फ्रिचार्ज नी केलीय अस वाटत. सुरुवातीला paytm मध्ये कॅशबॅक यायचे अगदी प्रत्येक व्यवहाराला. नंतर गूगल पे आलं. त्यांनी ते स्क्रॅच सिस्टम सुरू केली. म्हणजे व्यवहार पूर्ण करून स्क्रॅच करे पर्यंत तुम्हाला माहीत नसतं की काय मिळेल. पण काहीतरी मिळेल या आशेने तुम्ही व्यवहार करत जाता आणि त्यांचा धंदा सुरू राहतो. नंतर नंतर तुम्हाला फक्त बेटर लक नेक्स्ट टाईम चे मेसेज दिसतात पण एव्हाना सवय लागलेली असते. </div><div> आता लिहायचा मुद्दा, कॅशबॅक ची रक्कम लहान असते म्हणून ते सोडून दिलं तरी चालत. पण जिथे मोठी रक्कम येते तिथं प्रश्न वाढतात. जस की-</div><div> </div><div>◆फार पूर्वी नाही पण ८-१० वर्ष आधी ही आणि आज ही टीव्ही, पेपर मध्ये जाहिराती येतात. LIC किंवा इतर विमा कंपनी च्या. मुळात पूर्वी आपल्या मरणानंतर आपल्या मागे लोकांची सोय करणे हे भारतीय लोकांच्या ध्यानी मनी नव्हतं म्हणून विमा आणि गुंतवणूक असे मिक्स प्लॅन LIC ने आणले. त्यात त्यांचा दुहेरी उद्देश साध्य व्हायचा एकतर त्यांचा बिझनेस वाढायचा आणि लोकांमध्ये पैसा, बचत आणि गुंतवणूक याबाबदल जनजागृती व्हायची. जिन्दगी के साथ भी आणि बाद भी वगरे रुजायला पण आपल्याकडे कैक वर्ष लागली. आता विमा बऱ्यापैकी रुळला आहे. आता एक स्टेप पुढ-</div><div>◆ त्यानंतर हळू हळू अजून एक जाहिरात दिसायला लागली. म्युच्युअल फ़ंड सही है ची. अर्थात त्यांचा हि उद्देश चांगला च होता. लोकांमध्ये हे नवीन आणि जास्त उत्पन्न देणारे साधन सवयीचे व्हावे.ज्यांना शेअर्स, बॉण्ड वगरे ची माहिती नाही पण इच्छा आहे त्यांना त्यातल्या त्यात सेफ मार्ग मिळावेत आणि पैसा हि येत राहावा मार्केत मध्ये. त्यासोबत Mutual Funds are sub to market risk हि तळटीप हि फेमस झाली त्यावरून लोकांना यात risk आहे याची जाणीव होत राहिली. या जाणिवेमुळे आज ही माझ्या बाबांच्या वयाचे लोक पटकन आज ही पैसे टाकायला धजावत नाहीत. पण म्युच्युअल फंड ने क्रांती केलीच. महागाई वर आणि निवृत्ती ची सोया म्हणून त्याकडे पाहिलं जात आज.</div><div>◆आता थोडं आणखी पुढे जाऊ. गेल्या 2 वर्षात आणखी 2-3 जाहिराती गोंधळ घालत आहेत ते म्हणजे online Rummy खेले, किंवा आप क्रिकेट टीम बनालो ये आपका काम हम कर लेते है. याची सुरुवात काही 50 रुपये च्या आसपास असते. असे मी डझन भर लोक दाखवू शकतो जे म्हणतात की अरे 50 रुपये तर आपण भेळ पाणीपुरी वर घालतो लागला तर लागला तुक्का वगरे नाहीतर 50 रुपये भेळ खाल्ली समजायच. बरोबर पण आपल्या देशात वयाच्या ५-७ वर्षांपासून क्रिकेट चे फॅन असतात. कशापासून आणि कुठे ही क्रिकेट आवडणारी जनता आपल्या कडे आहे. याच व्यसन 50 रुपये करत करत कुठे घेवून जाऊ शकत याचा अंदाज नाही. याचा एक छोटा अनुभव मीच पाहिला. एका मित्राच्या रूम वर त्याचा रूममेट शिकायला आलेला त्याने 49 रुपये लावले आणि म्हणाला अरे इतके तर चहा वडापाव ला जातात. मी ( अर्थात मनात )म्हणलं अबे #### मग चहा पी ना लेका. बाप घरचा पावकिलो चहा कमी आणून तुला पैसे देत असेल आणि तू इथं चहा न पिता टीम च्या नरड्यात ओत. असो हे देखील इग्नोराय नमः केलं पण-</div><div><br></div><div>◆ गेल्या दोन महिन्यात दोन जाहिराती आणखी पाहिल्या आणि माझी तार च गेली. AMI oraganics चा IPO ओपन होतोय अशी जाहिरात टीव्ही वर आली. आधीच भारतात ली 95% जनता अर्धी वेडी.एकवेळ पूर्ण शहाणे परवडले किंवा पूर्ण वेडे, हे अर्धे हळकुंड म्हणजे महाभयंकर. मुळात शेअर्स , बॉण्ड्स, म्युच्युअल फंडस् कसे काम करतात हे 2-5 वर्ष अनुभव असलेल्या माणसाला देखील पटकन कळत नाही आणि टीव्ही हा सम्पूर्ण तळागाळात जाणारा स्रोत आहे. वरकरणी याचा उद्देश लोकांपर्यंत पोचणे असा असला तरी सध्या IPO चा इतका बोलबाला आणि क्रेझ सुरू आहे की मध्ये जुन्या एका क्लिप चा PP WATERBALS पाणीपुरी चा ipo ची क्लिप आलेली तशी गल्लीतल्या झेरॉक्स वाल्याने IPO काढला तरी तो 10 पट खपेल. मी स्वतः देखील 3 IPO apply केलेत पण सुदैवाने माझ्या आजूबाजूला चांगले लोक आहेत जे मला अत्यंत मोलाचे सल्ले देत असतात आणि गुंतवणूक शिकवतात सट्टे नाही. लोक अंधाधुंद पैसे टाकताना पाहतोय मी. देव न करो एखादा झपका असा बसला तर परत याला जुगार म्हणून कायम च टाटा करायला हीच लोक असतील.</div><div>◆ हे सगळं कमी होत म्हणून परवा एक सिरीज पाहत होतो. त्याआधी एक जाहिरात आली. एक श्रीमंत Character आपल्या पैशाचा माज दाखवत असत. आणि एक साधारण character त्याला खिजवून जात की Crypto मे invest किया क्या? अगर नहीं किया तो क्या खाक इन्व्हेस्ट किया वगरे. इथे लोकांना crypto म्हणजे काय? त्याला भारतात कायद्याने किती सुरक्षा आहे? आपली किमती जमापुंजी किती लावावी? हे कळत नसताना अस काहीतरी बिंबवण कितपत योग्य आहे माहीत नाही. पण झटपट पैसा आणि त्यातलं डोपामाईन परफेक्ट छेडलं जातंय ही काळजी इथला धांदवाईक माणूस घेत असतो बरोबर.</div><div><br></div><div>वॉरेन बफे आणि राकेश झुणझुणवाला यांचे दोन वाक्य मला फार भावतात</div><div>वॉरेन म्हणतो- "Invest in the things that you understand"</div><div>आणि राकेश म्हणतो- "Dont afraid to make mistake but make sure, you make which are afforable to you."</div><div><br></div><div>किती सोप्या भाषेत सांगितलं या लोकांनी, जे कळत नाही त्यापासून लांब राहा किंवा आधी समजून घ्या मग उड्या मारा.</div><div><br></div><div>असो हे कळत असताना ही आपण काहीही करू शकत नाही. कदाचित सरकारांची सुदधा याला मूक संमती असेल, कायद्यात काय लिहिलं आहे हे महत्वाच नाही जर त्यात पळवाटा असतील तर. गंदा है पर धंदा है.</div><div><br></div><div>थोडक्यात काय तर कुठे ही पाहिलं तरी तुम्हाला संभ्रमात आणि मोहात पाडतील असे अनेक मार्ग आहेत. काही ते मार्ग सर करतील, काही त्यात पडून शिकतील, काही दुसरे पडलेले पाहून शिकतील, तर काही असे पडतील की परत वर येणं कठीण जाईल.</div><div><br></div><div>एक गाणं आठवतंय सचिन च</div><div>" ही दुनिया मायाजाल मनुजा, जाग जरा..</div><div>हसू नको तू सावध वाग रे मनुजा जाग मनुजा जाग"</div><div><br></div><div>©प्रसन्न कुलकर्णी</div>Prasanna Kulkarnihttp://www.blogger.com/profile/16790479522824925011noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-700383533597231797.post-31850257389434022302020-05-20T23:39:00.000-07:002020-05-20T23:40:22.388-07:00डोह - BFF नावाचा<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<span style="color: white;"><br style="font-family: roboto, arial, sans-serif; font-size: 16px; letter-spacing: 0.1px; white-space: pre-wrap;" /></span>
<span style="color: white; font-family: "roboto" , "arial" , sans-serif; font-size: 16px; letter-spacing: 0.1px; white-space: pre-wrap;"> मला कविता वाचायला आवडतात. हा म्हणजे इतका हाडाचा कविता प्रेमी मी नाही की कवितांच्या कार्यक्रमाला नियमित जाइन किंवा कविताच पुस्तक आणून वाचेन. पण चर्चेत असणारे कवी, त्यांच्या गाजलेल्या कविता, youtube वरती सापडणाऱ्या मी ऐकत असतो. त्यात स्पृहा जोशी, गुरू ठाकूर, संदीप खरे, जितेंद्र जोशी, सौमित्र, संकर्षण कऱ्हाडे अशी स्क्रिन वर येणारी जास्त ऐकण्यात येतात. त्यात आणखी एक भर पडली ती म्हणजे वैभव जोशीं. प्रचंड ऐकतोय यांच्या कविता. आणि त्याची सुरुवात झाली डोह या कवितेपासून. कवींची काय गम्मत असते नाही, एक गोष्ट १०० ते १००० शब्दात सांगता येत नाही पण अगदी ५-७ ओळींमध्ये ते त्याहून जास्त आणि स्पष्ट बोलून जातात. ही कविता Platonic RelationShip वरती आहे. आता हा शब्दच आधी ऐकण्यात आला नव्हता. search केलं तेव्हा वाटलं की अनेक जण अनेक अर्थ काढू शकतात याचे. पण ते शोधायच्या आधी जो अर्थ पटकन डोक्यात येतो आणि मी कायम त्या अर्थाने कविता ऐकतो, ते म्हणजे आपल्या भाषेत BFF. आपल्यासोबत १०० फोटो टाकतात , hangout ला असतात तसे नाही. फक्त एक किंवा दोन जे मुलांसाठी मैत्रीणीपेक्षा जास्त पण Gf पेक्षा कमी असतात. किंवा मुली साठी मित्रा पेक्षा जास्त पण BF पेक्षा कमी वगरे. कोणाला मान्य असो किंवा नसो काही बाबतीत opposite gender च चांगलं समजून घेऊ शकतात. मित्र मित्राला शिव्या देतील, मैत्रिणी gossiping करतील पण मित्र मैत्रीण एकमेकांना खूपदा जो खांदा देतात तो वेगळाच. ही BFF नावाची concept आपल्या पिढीने आपल्याला दिलेली एक सुरेख भेट आहे हे मी ठासून सांगतो. नाही कळलं ना?</span><br />
<span style="color: white; font-family: "roboto" , "arial" , sans-serif; font-size: 16px; letter-spacing: 0.1px; white-space: pre-wrap;"> कळण्यासाठी सिनेमातले उदाहरण देतो. पुर्वी म्हणजे अगदी ८०-९० किंवा आधीच्या काळात मुलं-मुली एकमेकांना ओळखत असली त्यांची खुले आम मैत्री च प्रमाण फार कमी. अर्थात मी मध्यमवर्गीय जिथे फारस मोकळं वातावरण नसतं त्याबद्दल बोलतोय. म्हणजे एक लडका और लडकी कभी दोस्त नही बन सकते हा टीपीकल डायलॉग असतो तस काहीस. मग देवानंद किंवा शम्मी कपूर सारखा एखादा देखणा आणि Charming हिरो ८-१० मुली पिकनिक ला जाताना किंवा तत्सम ठिकाणी अचानक भेटतो, त्याला एखादी आवडते मग अपघात किंवा भांडण मग एखाद रफी किंवा किशोर च गाणं-</span><br />
<span style="color: white;"><br style="font-family: roboto, arial, sans-serif; font-size: 16px; letter-spacing: 0.1px; white-space: pre-wrap;" /></span>
<span style="color: white; font-family: "roboto" , "arial" , sans-serif; font-size: 16px; letter-spacing: 0.1px; white-space: pre-wrap;"> 'तुमसे अच्छा कौन है, दिल ओ जिगर लो जान लो,</span><br />
<span style="color: white; font-family: "roboto" , "arial" , sans-serif; font-size: 16px; letter-spacing: 0.1px; white-space: pre-wrap;"> हम तुम्हारे है सनम, तुम हमे पहचान लो'</span><br />
<span style="color: white;"><br style="font-family: roboto, arial, sans-serif; font-size: 16px; letter-spacing: 0.1px; white-space: pre-wrap;" /></span>
<span style="color: white; font-family: "roboto" , "arial" , sans-serif; font-size: 16px; letter-spacing: 0.1px; white-space: pre-wrap;">आणि यांना पोरगी पटते काही मिनिटात. ते तिथे स्वाभाविक होत. कधी opposite gender शी डील करून माहीत नसत समोर येईल ते आवडतच. नंतर कस ही असलं तरी पदरी पडलं पवित्र झालं अस ते स्वीकारलं जात.</span><br />
<span style="color: white; font-family: "roboto" , "arial" , sans-serif; font-size: 16px; letter-spacing: 0.1px; white-space: pre-wrap;">नंतर ९०s किंवा २००० च्या काळात थोडा जमाना बदलला. मोठ्या शहरात का असेना पण खुले आम पणे शाळा कॉलेजात मित्र मैत्रिण ग्रुप बनू लागला. एकत्र फिरणे, Movies पाहणे सुरू झालं. त्याला पुढे दिशा देईल असे scene सिनेमात यायला लागले. मैने प्यार किया मध्ये म्हणलं गेलं 'दोस्ती की है निभानी तो पडेगी ही' किंवा कुछ कुछ होता है मधलं वाक्य भलतच फेमस झालं 'प्यार दोस्ती है' म्हणजे या generation ला कळून चुकलं होत अस १-२ गाणे म्हणून पटलेल्या सोबत आयुष्य निघेल च guarantee नाही. दोस्ती आवश्यक आहे. मग तो ट्रेंड सुरू झाला. दोस्ती करा नंतर स्टोरी पुढे किंवा Full Stopp.</span><br />
<span style="color: white; font-family: "roboto" , "arial" , sans-serif; font-size: 16px; letter-spacing: 0.1px; white-space: pre-wrap;">Full Stopp झाला की मग थोडे रडके गाणे</span><br />
<span style="color: white;"><br style="font-family: roboto, arial, sans-serif; font-size: 16px; letter-spacing: 0.1px; white-space: pre-wrap;" /></span>
<span style="color: white; font-family: "roboto" , "arial" , sans-serif; font-size: 16px; letter-spacing: 0.1px; white-space: pre-wrap;"> 'सच कह रहा है दिवाना, दिल दिल ना किसीं से लगाना'</span><br />
<span style="color: white;"><br style="font-family: roboto, arial, sans-serif; font-size: 16px; letter-spacing: 0.1px; white-space: pre-wrap;" /></span>
<span style="color: white; font-family: "roboto" , "arial" , sans-serif; font-size: 16px; letter-spacing: 0.1px; white-space: pre-wrap;">मग २०१० नंतर ते ही बदललं. प्रत्येक शाळा, कॉलेज, जॉब मध्ये एक affair, मग ब्रेक अप. अगदी त्याच सुद्धा celebration.</span><br />
<span style="color: white;"><br style="font-family: roboto, arial, sans-serif; font-size: 16px; letter-spacing: 0.1px; white-space: pre-wrap;" /></span>
<span style="color: white; font-family: "roboto" , "arial" , sans-serif; font-size: 16px; letter-spacing: 0.1px; white-space: pre-wrap;"> 'मेरे सैय्याजिसे आज मैने ब्रेक अप कर लिया'</span><br />
<span style="color: white;"><br style="font-family: roboto, arial, sans-serif; font-size: 16px; letter-spacing: 0.1px; white-space: pre-wrap;" /></span>
<span style="color: white; font-family: "roboto" , "arial" , sans-serif; font-size: 16px; letter-spacing: 0.1px; white-space: pre-wrap;"> किंवा मग Love Triangles. एक दुसरीच्या मागे, ती तिसऱ्याच्याच मागे वगरे. म्हणजे हे कळून चुकलं की एक कोणी परफक्ट नसतो आणि एक कोणी पूर्ण वाईट नाही. तुलना करायला लागले सगळे जण. आता तर एकाच वेळी ३-४ crush, Like असतात च प्रत्येकाला. यावरून कोणाचं character खराब होत नाही हे ही समजलं. पण जेव्हा चॉईस ची वेळ येते तेव्हा त्यातलं एक च करू शकतो. मग बाकीचे? अशा वेळेला २ मार्गाने हे BFF नावाचं by product जन्माला आलं असावं. एक म्हणजे त्या ३-४ पैकी एकाविषयी आपण serious होतो मग बाकीचे काय? तर काही गोष्टी जुळल्या नाहीत म्हणून नाहीतर ते भारी च आहेत आणि त्यांचं आपलं ट्युनिंग जुळतच. थोडक्यात मिस झालेली बस म्हणा हवं तर. आणि दुसरा मार्ग म्हणजे तिच्या सोबत सेटिंग लावून दे ना आपण म्हणतो आणि त्यासाठी मैत्रीण प्रयत्न करते यात ती आपल्याला मूळ जिच्या सोबत सूत जुळवायच तिच्या पेक्षा जास्त आपल्याला ओळखत असते. पण एक गोष्ट नक्की आपण जेव्हा कोणाला approach करतो आपण खूप image चा विचार करतो काय बोलू काय नको, कस दिसू वगरे पण या BFF नावाच्या प्राण्या समोर आपण निर्लज्ज असतो म्हणजे अगदी विस्कटलेले केस दाढी, बरमुडा, मध्ये पाहिलं किंवा इतकी कडकी आहे की चहाचे पैसे पण तू दे किंवा अगदी Adult Joke share करताना सुद्धा तसूभर ही लाज वाटत नाही. कारण ते आपली नियत ओळखून असतात. आपण पाण्यात वर किती चांगले आणि खोलात किती नालायक हे पूर्ण माहीत असत त्यांना. थोडक्यात इथे फक्त एक गोष्ट मॅटर करते, comfort. तुम्ही हुशार असा टुकार असा पैसे वाले असा नाहीतर नसा फरक पडत नाही. किती Comfortable आहात हे imp. ज्या सोबत तुमचं चेष्टेत नाव जोडलं जात नाही तो BFF असूच शकत नाही अस मला वाटत. कित्येकदा इच्छा असून पुढे विचार न केलेलं मी अनेक पाहिलेलं आहेत. त्याच मुख्य कारण हे की त्यांना हे चांगली मैत्रीण किंवा मित्र गमवायचा नसतो. पण हे ही माहीत असत की यांच्या पेक्षा आपल्याला झेलणार कोणी मिळेल का नाही सांगता येत नाही. कळत नकळत आपण खूप गोष्टी त्यांना बोलूंन जातो आणि कित्तेक प्रश्नावर ही लोक सोपं सोपं उत्तर शोधून ही देतात. त्या डोह मध्ये तसच आहे, दोन ओळी म्हणतात</span><br />
<span style="color: white;"><br style="font-family: roboto, arial, sans-serif; font-size: 16px; letter-spacing: 0.1px; white-space: pre-wrap;" /></span>
<span style="color: white; font-family: "roboto" , "arial" , sans-serif; font-size: 16px; letter-spacing: 0.1px; white-space: pre-wrap;">"प्रत्येक डोहाचा तळ गाठायलाच हवा अस नाही,</span><br />
<span style="color: white; font-family: "roboto" , "arial" , sans-serif; font-size: 16px; letter-spacing: 0.1px; white-space: pre-wrap;">एखादा असू द्यावा अथांग,</span><br />
<span style="color: white; font-family: "roboto" , "arial" , sans-serif; font-size: 16px; letter-spacing: 0.1px; white-space: pre-wrap;">कोणत्याही क्षणी हक्काने जावं आणि आपलं प्रतिबिंब ही पडणार नाही अशा अंतरावर बसून बघत राहावं आपण डोहाकडे आणि डोहाने आपल्याकडे।</span><br />
<span style="color: white; font-family: "roboto" , "arial" , sans-serif; font-size: 16px; letter-spacing: 0.1px; white-space: pre-wrap;">ना आपल्या चेहऱ्यावर तृष्णा ना त्याचा पाण्यावर तरंग</span><br />
<span style="color: white; font-family: "roboto" , "arial" , sans-serif; font-size: 16px; letter-spacing: 0.1px; white-space: pre-wrap;">अपेक्षा च नाहीत कसल्या तर कसला अपेक्षा भंग"</span><br />
<span style="color: white;"><br style="font-family: roboto, arial, sans-serif; font-size: 16px; letter-spacing: 0.1px; white-space: pre-wrap;" /></span>
<span style="color: white; font-family: "roboto" , "arial" , sans-serif; font-size: 16px; letter-spacing: 0.1px; white-space: pre-wrap;">आता वाचणार्याला वाटेल हा विषय असा मधेच कसा काय घेतला लिहायला? पण निमित्त मिळत जात. ते अस की माझ्या ही आयुष्यात असे अस्सल नमुने आहेत २-३. जे मला माझ्याहून जास्त ओळखतात. मला खूपदा प्रश्न पडतो की हे लोक मला इतकं चांगलं हँडल कस करत असतील. म्हणजे मला झाडावर चढू देत नाहीत आणि खाली ही पडू देत नाहीत. पाय कायम जमिनीवर हवेत ही काळजी घेणारे. त्याच मला सापडलेलं उत्तर याना आपल्या गुण किवा अवगुणांचं फार अप्रूप नसत. एकतर यांचा स्वभाव अगदी उलट असतो म्हणून किंवा अगदी सेम असतो पण ते आपल्या हुन तीव्र असतात म्हणून. त्यापैकीच एकामुळे हा सगळा लेख प्रपंच झाला. म्हणजे मला माझे गुण माहिती मी पुस्तक वाचतो, त्याचे गूढ अर्थ शोधतो, मला लोक वाचता येतात, मी त्रयस्थ पणे विचार करु शकतो, अवगुण ही माहिती मी प्रचंड चिडखोर आणि मुहफट आहे, मी Over Thinker आहे. पण सेम स्वभावाच आणखी कोणी आहे आणि इतला extrem level च की माझं वेगळं पण उरलाच नाही अशा एका मैत्रिणी सोबत पैज लागलेली ज्यात मी हरलो. तिने अशी अट घातली की मी काहीतरी लिहावं ज्यात मी किंवा माझ्या सारख्या लोकांविषयी तु लिहावं. उद्देश काही वेगळा होता, पूढे गेलो तस वेगळं झालं याच. नवीन ओळख झाल्यावर आपण ट्युनिंग कस जमत यावर मैत्री ठरते पण असतात काही विचित्र लोक त्यांना आपण कसं कचा कचा भांडतो आणि तरीही प्रत्येक वेळी sort करून ती thread पक्की करतो हे भारिय. तसच इथे ही झालंय एखादा लेखक किंवा पुस्तक कोणतं भारी आणि का यावर अशक्य भांडलो आम्ही आजही तो वाद तसाच आहे पण हे बोलता बोलता आणखी किती गोष्टी मध्ये एकमत झालाय याची गणती नाहीय.</span><br />
<span style="color: white;"><br style="font-family: roboto, arial, sans-serif; font-size: 16px; letter-spacing: 0.1px; white-space: pre-wrap;" /></span>
<span style="color: white; font-family: "roboto" , "arial" , sans-serif; font-size: 16px; letter-spacing: 0.1px; white-space: pre-wrap;">मी जेव्हा काय काय लिहिलं पाहिले जे ५-७ readers असतात त्यापैकी ही एक आहे आणि चांगलं वाईट लिहिलेले अनेक draft तिने सहन केलेलं आहेत. शिवाय अभ्यास करत करत तू लिहिणं सोडू नको असा म्हणणार एकमेव प्राणी आहे. उसके लिये इतना तो बनता है. त्याबदल्यात मी ही काही गोष्टी सोडू नको अस म्हणलय पण ती ऐकेलं तर शपथ असतात काही काही माज😂</span><br />
<span style="color: white;"><br style="font-family: roboto, arial, sans-serif; font-size: 16px; letter-spacing: 0.1px; white-space: pre-wrap;" /></span>
<span style="color: white; font-family: "roboto" , "arial" , sans-serif; font-size: 16px; letter-spacing: 0.1px; white-space: pre-wrap;">असो मित्र येतील जातील, प्रेम येईल जाईल पण BFF constant कारण तेच मित्र आहेत आणि काहिचे प्रेम पण तेच आहे.😋 ज्यांना आवडेल त्यांनी ती कविता युट्युब ला जरूर ऐकावी.</span><br />
<span style="color: white;"><br style="font-family: roboto, arial, sans-serif; font-size: 16px; letter-spacing: 0.1px; white-space: pre-wrap;" /></span>
<span style="color: white; font-family: "roboto" , "arial" , sans-serif; font-size: 16px; letter-spacing: 0.1px; white-space: pre-wrap;">©प्रसन्न कुलकर्णी [PK]</span></div>
Prasanna Kulkarnihttp://www.blogger.com/profile/16790479522824925011noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-700383533597231797.post-2475497464916338202020-05-08T00:06:00.001-07:002021-09-18T11:01:06.478-07:00अस्वस्थता-बदलापुर्वीची<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div>
<span style="color: white; font-family: "roboto" , "arial" , sans-serif; font-size: 16px; letter-spacing: 0.1px; white-space: pre-wrap;"><br></span></div>
<span style="color: white;"><span style="font-family: "roboto" , "arial" , sans-serif; font-size: 16px; letter-spacing: 0.1px; white-space: pre-wrap;"> </span><span style="font-family: "roboto" , "arial" , sans-serif; font-size: 16px; letter-spacing: 0.1px; white-space: pre-wrap;">खूप दिवस फेसबुक आणि ब्लॉग पासून लांब होतो. लिहावं नाही लिहावं असं झालेलं पण वेळ ही मिळाला आणि virtual Distance स्वस्थ बसू देईना. आज ४५ दिवस होतील अक्खा देश Lockdown स्थितीत आहे, जसे जसे दिवस पुढे जातायत तसा सगळ्यांना कंटाळा यायचा पण कंटाळा यायला सुरु झालाय आता. फक्त कंटाळा नाही तर व्यक्त किंवा अव्यक्त अस्वस्थता आहे. हा म्हणजे सुरुवातीला असेल त्यांना वर्क फ्रॉम होम, सोशल मीडिया, रामायण महाभारत, वेब सिरीस, पुस्तक, पहिल्यांदाच स्वतःसाठी आणि कुटुंबाला देता आलेला वेळ सकारात्मक बाबी आहेतच. त्यासोबत आणखी एक गोष्ट सगळ्यांकडे कॉमन सुरु आहे, ती म्हणजे सकाळ दुपार संध्याकाळ बातम्या पाहणे त्यात रोज वाढणारे रुग्ण आणि मृत्यचे आकडे, देशविदेशातल्या सरकार आणि प्रशासन यांची जान आणि जहां सांभाळायची कसरत. हे चित्र जितकं आजची स्थिती पाहून सुन्न करणार आहे तितकंच उद्याची कल्पना करून अस्वस्थ करणार आहे. किती हि टाळली तरी न टळणारी अस्वस्थता. </span></span><br>
<div>
<span style="color: white;"><span style="letter-spacing: 0.1px;"><br style="font-family: roboto, arial, sans-serif; font-size: 16px; letter-spacing: 0.1px; white-space: pre-wrap;"></span><span style="font-family: "roboto" , "arial" , sans-serif; font-size: 16px; letter-spacing: 0.1px; white-space: pre-wrap;">थोडक्यात संदीप खरेंची मराठी कवाली सारखी गत अक्ख्या जगाची झालीय-</span><span style="letter-spacing: 0.1px;"><br style="font-family: roboto, arial, sans-serif; font-size: 16px; letter-spacing: 0.1px; white-space: pre-wrap;"></span></span><br>
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">अगतिक झालो निष्प्रभ झालो, तरीही केला तुझाच धावा,<br></div><span style="color: white;"><span style="font-family: "roboto" , "arial" , sans-serif; font-size: 16px; letter-spacing: 0.1px; white-space: pre-wrap;">रोखठोक मज आज बोलू दे माणुसकीने ऐका देवा,</span><span style="letter-spacing: 0.1px;"><br style="font-family: roboto, arial, sans-serif; font-size: 16px; letter-spacing: 0.1px; white-space: pre-wrap;"></span><span style="font-family: "roboto" , "arial" , sans-serif; font-size: 16px; letter-spacing: 0.1px; white-space: pre-wrap;">जाब तुला रे कुणी पुसावा, जाब तुला रे कुणी पुसावा..!!"</span><span style="letter-spacing: 0.1px;"><br style="font-family: roboto, arial, sans-serif; font-size: 16px; letter-spacing: 0.1px; white-space: pre-wrap;"></span><span style="font-family: "roboto" , "arial" , sans-serif; font-size: 16px; letter-spacing: 0.1px; white-space: pre-wrap;">आणि हि हतबलता अगदी शाळेतल्या पोरापासून महाकाय देशापर्यंत आहे. अगदी महत्वाच्या गोष्टी जरी पाहिल्या तरी कोणी कुठे पर राज्यात देशात अडकलं आहे, कोणाची जॉइनिंग ऑर्डर फक्त आलेली आहे, कोणाची ठरलेली लग्न कॅन्सल झाली आहेत त्यात पैसा अडकला आहे, धंदे बसले म्हणून काही रस्त्यावर यायच्या वाटेवर आहेत तर काही जेष्ठ नागरिक जे व्याज किंवा इतर गुंतवणुकीवर जगतात त्यातून येणार उत्पन्न कमी झाली, हातावर पोट असण्यार्याचे हाल तर शब्दापलीकडे आहेत, जे नेते काही उद्दिष्ट घेऊन सत्तेवर आलेत त्यावर वरवंटा फिरलाय, बनवलेली बजेट हलली आहेत, सगळे देश बाकी सगळे मनसुबे बाजूला ठेवून बसली आहे. फक्त हे सगळं संपे पर्यंत धडधाकट राहणे हे एकच उद्दीष्ट उरलं आहे.</span><span style="letter-spacing: 0.1px;"><br style="font-family: roboto, arial, sans-serif; font-size: 16px; letter-spacing: 0.1px; white-space: pre-wrap;"></span><span style="font-family: "roboto" , "arial" , sans-serif; font-size: 16px; letter-spacing: 0.1px; white-space: pre-wrap;"> पण कमाल आहे ना, म्हणजे जस भीमाला आपल्या ताकदीचा गर्व झाला तेव्हा बजरंग बलीच्या शेपटीने त्याच गर्वहरण केलं अशी दंत कथा आहे. आपल्याला गर्व नाही तर माज च होता. आमची मुंबई थांबत नाही, भारतीय रेल्वे युद्धकाळात थांबली नाही, आमची आरोग्य क्षेत्रात प्रगती च्या टिमक्या, जातीचा, धर्माचा, संपत्तीचा माज, श्रद्धा असणे गैर नाही पण दान पेट्या मध्ये करोडोचा गल्ला, उद्योजकांना वाटायचं थोड्या पैशाच्या जोरावर लोक राबतात आणि मी मोठा होतो आज माणसाविना ते ठप्प आहेत, शेअर बाजारात गुंतवणूक वाल्याना वाटायच कि माझ्या स्किलवर लाखो करोडो कमावले. आज धंदे बंद तर अनेक राजाचे रंक होण्याच्या मार्गावर आहेत, नेत्यांना आणि त्याच्या so called कार्यकर्त्यांना आपले शेठ, साहेब किंवा गल्लीतले दादा म्हणजे वट सबको लग्र था अपुनीच भगवान है पण आपण सगळे एकमेकात बांधलेले आहोत. सगळे पिलर पडायला लागले तर इमारत खचणारच. उबंटू सिनेमात एक वाक्य आहे "आपण आहोत म्हणून मी आहे" सगळ्यांना हे विसरायला झालं होत. खरं तर आईन्स्टाईन, स्टीफन हॉकिंग आणि अनेक संशोधक यांनी कित्येकदा सावध केलय कि माणसाचा अधिक हव्यास आणि अति प्रगती हीच आपल्या मानवजातीच्या उठणार आहे. पण ते म्हणतात ना, 'कौन समझा है सिर्फ लफजो से, एक हादसा जरूरी होता है सबके लिये' तरी यातून कोणी शिकणारे याची शक्यता जरा कमीच वाटत आहे कारण या आधी हि अनेक टप्पू देऊन झालेत निसर्गाने.</span><span style="letter-spacing: 0.1px;"><br style="font-family: roboto, arial, sans-serif; font-size: 16px; letter-spacing: 0.1px; white-space: pre-wrap;"></span><span style="font-family: "roboto" , "arial" , sans-serif; font-size: 16px; letter-spacing: 0.1px; white-space: pre-wrap;"> मागे ग दि मा च्या २ गाण्याच्या संदर्भ दोन ब्लॉग मध्ये आलेला योगायोगाने परत तिसरा उच्चार आज करावा वाटतोय. गीत रामायण मधला आज का निष्फल होती बाण या गाण्यात अनेक मुंडकी उडवून हि रावण उभाच होता तेव्हा केविलवाणा राम म्हणतो तशी आज सगळ्याच देशांची स्थिती आहे</span><span style="letter-spacing: 0.1px;"><br style="font-family: roboto, arial, sans-serif; font-size: 16px; letter-spacing: 0.1px; white-space: pre-wrap;"></span><span style="font-family: "roboto" , "arial" , sans-serif; font-size: 16px; letter-spacing: 0.1px; white-space: pre-wrap;"> </span><span style="letter-spacing: 0.1px;"><br style="background-color: white; font-family: roboto, arial, sans-serif; font-size: 16px; letter-spacing: 0.1px; white-space: pre-wrap;"></span><span style="font-family: "roboto" , "arial" , sans-serif; font-size: 16px; letter-spacing: 0.1px; white-space: pre-wrap;">"आज कां निष्फळ होती बाण?</span><span style="letter-spacing: 0.1px;"><br style="font-family: roboto, arial, sans-serif; font-size: 16px; letter-spacing: 0.1px; white-space: pre-wrap;"></span><span style="font-family: "roboto" , "arial" , sans-serif; font-size: 16px; letter-spacing: 0.1px; white-space: pre-wrap;">पुण्य सरें कीं सरलें माझ्या बाहूंमधलें त्राण?"</span><span style="letter-spacing: 0.1px;"><br style="font-family: roboto, arial, sans-serif; font-size: 16px; letter-spacing: 0.1px; white-space: pre-wrap;"></span><span style="font-family: "roboto" , "arial" , sans-serif; font-size: 16px; letter-spacing: 0.1px; white-space: pre-wrap;">पुढची एक ओळ त्या देशां लागू पडते ज्यांना आपल्या आरोग्य सेवेचा माज होता,</span><span style="letter-spacing: 0.1px;"><br style="font-family: roboto, arial, sans-serif; font-size: 16px; letter-spacing: 0.1px; white-space: pre-wrap;"></span><span style="font-family: "roboto" , "arial" , sans-serif; font-size: 16px; letter-spacing: 0.1px; white-space: pre-wrap;">"इंद्रसारथे, वीर मातली, सांग गूढता मला यांतली</span><span style="letter-spacing: 0.1px;"><br style="font-family: roboto, arial, sans-serif; font-size: 16px; letter-spacing: 0.1px; white-space: pre-wrap;"></span><span style="font-family: "roboto" , "arial" , sans-serif; font-size: 16px; letter-spacing: 0.1px; white-space: pre-wrap;">माझ्याहुन मज असह्य झाला विद्येचा अपमान"</span><span style="letter-spacing: 0.1px;"><br style="font-family: roboto, arial, sans-serif; font-size: 16px; letter-spacing: 0.1px; white-space: pre-wrap;"></span><span style="font-family: "roboto" , "arial" , sans-serif; font-size: 16px; letter-spacing: 0.1px; white-space: pre-wrap;">आणि त्यापुढे</span><span style="letter-spacing: 0.1px;"><br style="font-family: roboto, arial, sans-serif; font-size: 16px; letter-spacing: 0.1px; white-space: pre-wrap;"></span><span style="font-family: "roboto" , "arial" , sans-serif; font-size: 16px; letter-spacing: 0.1px; white-space: pre-wrap;">"ज्यांच्या धाकें हटला सागर,भयादराचे केवळ आगर</span><span style="letter-spacing: 0.1px;"><br style="font-family: roboto, arial, sans-serif; font-size: 16px; letter-spacing: 0.1px; white-space: pre-wrap;"></span><span style="font-family: "roboto" , "arial" , sans-serif; font-size: 16px; letter-spacing: 0.1px; white-space: pre-wrap;">त्या भात्यांतच विजयि शरांची आज पडे कां वाण?"</span><span style="letter-spacing: 0.1px;"><br style="font-family: roboto, arial, sans-serif; font-size: 16px; letter-spacing: 0.1px; white-space: pre-wrap;"></span><span style="font-family: "roboto" , "arial" , sans-serif; font-size: 16px; letter-spacing: 0.1px; white-space: pre-wrap;">या ओळी तर अमेरिका, युरोपियन देश, रशिया सारख्या देशांना तंतोतंत लागू आहेत. आर्थिक, लष्करी, राजकीय ताकदीने आणि आपल वर्चस्व टिकवायला हव्या त्या पातळीवर जाणारे अशी ओळख असलेले देश आपलेच लोक दिवसाला १५०० च्या गतीने अगदी असहाय होऊन गुडघ्यावर आलेत. हे झालं त्यांचं आपलं अजून काय होणारे ते विचार ने केलेलाच बरा. झाकली मूठ सव्वालाखाची म्हणून सगळं शांत आहे अशीच शंका यायला लागलीय. तसा भारत आरोग्य क्षेत्रात बराच पूढे आहे. अत्यंत महागड्या समजल्या जाणाऱ्या कॅन्सर, HIV, पोलिओ, मलेरिया यांची जेनेरिक औषध बनवून अत्यंत स्वस्त दरात जगाला देण्यात भारताच्या डझनावर कंपन्यांनी मानाचं स्थान घेऊन ठेवलय. पण चांगली हॉस्पिटल्स, व्हेंटिलेटर, डॉक्टर्स, पॅरा मेडिकल स्टाफ हे जरी चांगले असले तरी लोकसंख्येचा प्रचंड डोलारा, डोलारा पेक्षा भयंकर फाफट पसारा आणि आपल राहणीमान यासमोर सुविधा पुरणार किती. त्यात आपला प्रत्येक नेता आणि कार्यकर्ते ब्लेम गेम मध्ये व्यस्त.. असो</span><span style="letter-spacing: 0.1px;"><br style="font-family: roboto, arial, sans-serif; font-size: 16px; letter-spacing: 0.1px; white-space: pre-wrap;"></span><span style="font-family: "roboto" , "arial" , sans-serif; font-size: 16px; letter-spacing: 0.1px; white-space: pre-wrap;"> पण हे सगळं तर जग जाहीर आहे. मी ज्या अस्वस्थतेबद्दल बोलतोय ती उद्याची. कारण कोरोना च्या आधीच जग आणि नंतरच जग यात जमीन अस्मानाचा फरक असायची शक्यता आहे. म्हणजे थंड पडलेलं जग परत सुरु करायचं म्हणजे काम प्रचंड असणारच शिवाय त्याचे लगेच अधिकचा पगार, ओव्हरटाईम, बोनस, DA, Increment ची फळ मिळणार नाहीतच म्हणजे सगळा कारभार काही दिवस तरी कर्मण्येवाधिकारस्ते तत्वावर अर्थात कर्म करत राहा फळाची अपेक्षा करू नकोस असाच असायची शक्यता. नोकरी राहील कि जाईल आणि गेली तर परत काय? जो पर्यंत याची लस येत नाही तो जरा दुरून राम राम, सुरक्षित अंतर ठेवा करत काम. या अशा कामाची भारतात सवय आणि शक्यता दोन्ही अवघड. Change is only permanent म्हणणं सोपं असलं तरी बदलला सामोरे जण कठीणच. त्यात मजूर किंवा नोकर वर्ग त्याला विशेष विरोध करतो हे नक्की. शिवाय ऑनलाईन क्लास, मीटिंगस, घरून काम करायला लागणारी नेट ची कमी जास्त स्पीड आणि परत कामचुकार पणाची शक्यता.</span><span style="letter-spacing: 0.1px;"><br style="font-family: roboto, arial, sans-serif; font-size: 16px; letter-spacing: 0.1px; white-space: pre-wrap;"></span><span style="font-family: "roboto" , "arial" , sans-serif; font-size: 16px; letter-spacing: 0.1px; white-space: pre-wrap;">हे झालं बदलाचं या सोबत जागतिक नेते आणि देश याना बदलासोबत गरज असते बदल्याची. शब्दशः अर्थ सूड असा नाही पण कुठे तरी परत फेड हवीच की. भले चीनच कांड मुद्दाम नसेल ही पण पडत्या भावात घेतलेली अनेक कंपन्यांचे शेअर्स आणि एका महिन्यात चीनमध्ये झालेली रेकॉर्ड ब्रेक acquisitions शंका घ्यायला जागा देत आहे. तो सब कैसे गप्प बसेंगे रे बाबा. विशेषतः सध्या बरेच नेते बोल्ड निर्णय घ्यायला प्रसिद्ध त्यात भारत, अमेरिका, रशिया, इस्राएल साहजिकच आंतरराष्ट्रीय राजकारण बदलणार, ओघाने धंदे, कच्च माल, टेकनोलोजि, मानव संसाधन सगळी गणित बदलणार. प्रस्थापित बिझनेसमनला अनेक आव्हान येणार काहीचे बाजार उठतील काही नवीन लोकांना संधी मिळतील. नाही म्हणलं तरी बऱ्याच बाबतीत चीन वर अनेक देश पूर्ण अवलंबून आहेत. पण अक्खा देशाचं आरोग्य आणि आर्थिक गणित तोडणार्या देशाला काहीतरी उत्तर दिल जाईलच. अर्थात बदला तो होके रहेगा. अर्थात कसा ते पाहायचं. आणि त्याचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष बदल सगळ्यांवर होणार. आता सगळ्यांच्या मनात हे सगळे नाही पण एक किंवा अनेक नक्की येत असणार आणि आपण सगळे स्वीकारणार जा प्रश्न च आहे.</span><span style="letter-spacing: 0.1px;"><br style="font-family: roboto, arial, sans-serif; font-size: 16px; letter-spacing: 0.1px; white-space: pre-wrap;"></span><span style="font-family: "roboto" , "arial" , sans-serif; font-size: 16px; letter-spacing: 0.1px; white-space: pre-wrap;">खरंच इतके बदल होतील का अशी शंका असली तरी ते होणार नाहीत याच एक हि कारण दिसत नाहीय. कारण कोणी तरी म्हणून गेलंय पूर्ण सगळं सम्पलय अस वाटत तीच वेळ असते नवीन काही सुरु करायची...!!</span><span style="letter-spacing: 0.1px;"><br style="font-family: roboto, arial, sans-serif; font-size: 16px; letter-spacing: 0.1px; white-space: pre-wrap;"></span><span style="font-family: "roboto" , "arial" , sans-serif; font-size: 16px; letter-spacing: 0.1px; white-space: pre-wrap;">©प्रसन्न कुलकर्णी [PK ]</span></span><br>
<div>
<span style="color: white; font-family: "roboto" , "arial" , sans-serif; font-size: 16px; letter-spacing: 0.1px; white-space: pre-wrap;">Photo Courtesy- Nagpurtoday.com</span></div>
</div>
</div>
Prasanna Kulkarnihttp://www.blogger.com/profile/16790479522824925011noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-700383533597231797.post-22029374132924075732019-12-12T12:27:00.001-08:002023-07-20T20:47:48.223-07:00इथे ओशाळला दुःशासन..!!<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div class="separator" style="clear: both; text-align: center;"> दिवसापासून ३-४ वेळेला पोस्ट लिहायला सुरु केली पण एखाद्या नाजूक गोष्टीवर २ ओळी जरी लिहीत असलो तरी खरंच आपली तितकी समज आहे का असं वाटून पुढे काही सुचेनासं झालं. थोडक्यात पु लंच्या भाषेत आपण कोण आहोंत ? आपला शैक्षणिक दर्जा काय ? असा विचार स्वतःच्याच मनात येत राहिला. पण शेवटी समज, दर्जा असो नसो; इतके दिवस डोक्यात घोळतंय ते उतरवावं असं वाटलं. ते म्हणजे त्या Dr वरचा 'दुसरा' बलात्कार.<br></div><span style="background-color: #202124; color: #e8eaed; font-family: Roboto, Arial, sans-serif; font-size: 16px; font-variant-ligatures: none; letter-spacing: 0.1px; white-space: pre-wrap;"> दुसरा ? कळलं नाही ना ? कारण बलात्काराच्या बातम्या तशा रोजच वाचून 'सवय' झाली असली ( इथे सवय शब्द दुर्दैवी, किळसवाणा वाटत असला तरी आहे ते आहे ) तरी त्यात सुद्धा एक मैलाचा दगड ठरेल कि काय अशी ही घटना. अरुणा शानबाग आणि निर्भया मध्ये आणखी एक भर पडली ज्याचा कधीही उल्लेख आला तर अंगावर काटा येईल. आधी बलात्कार, मग जिवंत जाळणे, मग एन्काऊंटर अशा या घटनेत ३-४ भयंकर घटना घडल्या. पण त्याच वेळेला बाहेरच्या म्हणजे आपल्या जगात त्याहून भयंकर गोष्ट घडली ती म्हणजे ८ मिलियन म्हणजे जवळपास ८० लाख वेळेला Dr च नाव Porn Site वर शोधलं गेलं आणि ते Trending होत. हाच तो दुसरा बलात्कार..कदाचित सामूहिक. </span><br style="background-color: #202124; color: #e8eaed; font-family: Roboto, Arial, sans-serif; font-size: 16px; font-variant-ligatures: none; letter-spacing: 0.1px; white-space: pre-wrap;"><span style="background-color: #202124; color: #e8eaed; font-family: Roboto, Arial, sans-serif; font-size: 16px; font-variant-ligatures: none; letter-spacing: 0.1px; white-space: pre-wrap;"> हि बातमी वाचली तेव्हा खरं खरं डोकं बधिर झालं. आणि ते ४ ज्यांनी ती कृती केली कारण त्यांनी गुन्हा केला तेव्हा ते नशेत असतील, एकट्या मुलीला बघून त्यांची 'ईच्छा' आणि हिम्मत दोन्ही प्रबळ झाली असेल. लगोलग त्याचा निकाल हि झाला . त्या चौघांनी किमान त्या जागी प्रत्यक्ष गुन्हा केला, त्यांचे किमान चेहरे तिला दिसले. त्याचा गुन्हा सिद्ध होऊ शकतो शिक्षा करता आली. पण या ८० लाखांचं काय ? हे तर पूर्ण शुद्धीत होते. यांची हि ईच्छा असच काहीस करायची होती कदाचित संधी मिळाली तर. यांनी तर अगदी आहे त्या जागेवरून, आपला चेहरा न कळू देता पण तीला trend करून दुसऱ्यांदा बलात्कार केला. ते हि ती मेलेली असताना . मग जास्त विकृत कोण ? ते चार कि हे ८० लाख ?. आणि परत कायद्यात असा गुन्हा हि नसेल कारण गुन्हा केला तर शिक्षा. गुन्ह्याची मजा घेणे याला शिक्षा नसावी. मुळात तशा site वर हे असे खरे विडिओ असतील असं वाटत नाही. पण याना तिच्यां नावाने शोधायचं कारण काय असेल हा प्रश्न अजून हि सतावतोय. कि कधी आपल्याला अशी संधी मिळाली तर मदत होईल म्हणून कि ती Dr किती असहाय होती, किती मदत मागितली, विव्हळली याचा असुरी आनंद ? कारण काहीही असो. ८० लाखामधले ९९% लोकांना Benefit of Doubt म्हणून माफ करू. Trend का येतोय याच्या उत्सुकतेपोटी होती असं म्हणू . पण तो Trend व्हायला कारणीभूत वरचे १ % लोक म्हणजे ८० हजार, पुढे काही महिन्यात छेडा छेडीच्या घटना घडतील ते हेच असतील असं म्हणायला हरकत नाही. थोडी भीड चेपली कि यातलेच ८ हजार खरा खुरा बलात्कार हि करतील. म्हणजे पुढच्या २ वर्षाचा कोटा भरला. दुर्दैव हेच कि आपलयाला हे सगळं कळू शकत पण आपण रोखू शकत नाही. कारण काय बघावं आणि काय बघू नये हे समजणार वय यायच्या आत फुकट नेट आणि फोन मिळत. त्यावर काय करायचं हा ज्याचा त्याचा चॉईस आहे . फक्त ज्यांना तो शहाणपणा वेळीच आला ते लोक बलात्कार ऐकून किंवा बघून 'Excite' नक्कीच होणार नाहीत.</span><br style="background-color: #202124; color: #e8eaed; font-family: Roboto, Arial, sans-serif; font-size: 16px; font-variant-ligatures: none; letter-spacing: 0.1px; white-space: pre-wrap;"><span style="background-color: #202124; color: #e8eaed; font-family: Roboto, Arial, sans-serif; font-size: 16px; font-variant-ligatures: none; letter-spacing: 0.1px; white-space: pre-wrap;"> रामायण महाभारत खरं घडलं किंवा नाही यावर कित्येकांचा दुमत असलं तरी आपल्याकडे प्रत्येक वेळी त्यांचे दाखले दिले जातात. आणि मला हि ते आवडत कारण या दोन गोष्टी मध्ये सगळ्या गोष्टी आहेत ज्या आजहि बऱ्याच गोष्टीशी साधर्म्य ठेवतात. ज्यावेळी हि घटना घडली तेव्हा अनेक पोस्ट वाचल्या आपला इतिहास महिलेसाठी युद्ध करायचा आहे मग समोर रावण असो कि दुःशासन वगरे. रावण तर सोडाच, पण दुःशासन सुद्धा ओशाळला असणार आज. तो हि म्हणाला असता कि हो जसा तुमचा श्रीकृष्ण अमर आहे, शरीराने अश्वत्थामा अमर आहे, तसा बऱ्याच पुरुषामध्ये ववृत्तीने मी सुद्धा अमर आहेच कारण स्त्री ला बघून तोल सुटणारे आणि शिक्षेस पात्र कलियुगामध्ये हि असतील च. गुन्हा हा गुन्हाच तो उघड केला काय किंवा लपून केला काय पण मी केला तो उघड पणे आणि त्याची उघड शिक्षा मला मिळाली हि. तुम्ही म्हणता तस तुमचा श्रीकृष्ण यदा यदा हि धर्मस्य आणि परित्राणाय साधूनाम म्हणत येईल हि पण तो मारू शकेल माझ्यासारख्या दुःशासनाला. आणि योगायोगाने ज्याप्रमाणे दुर्योधनाने द्रौपदी समोर स्वतःची मांडणी उघडी केली आणि भीमाने शपथ घेऊन त्याचा वाढ मांडीवर प्रहार करूनच केला तो हि युद्धाचा नियम मोडून. त्याचमाणे बलात्कार्यांना त्याच जागी नेऊन पोलिसांनी सुद्धा घटने नंतर का होईना पण भीमाची भूमिका केली. नियम थोडे मोडून च. ( तेच खरे गुन्हेगार असं मानून) न्याय तर केला. पण जे अदृश्य दुर्योधन आणि दुःशासन आहेत त्यांच्या पुढे श्रीकृष्ण सुद्धा हतबल च झालेला असणार यात मला तरी शंका नाही. आणि परत एकदा रण सोडून खऱ्या अर्थाने रनछोडदास बनणार.</span><br style="background-color: #202124; color: #e8eaed; font-family: Roboto, Arial, sans-serif; font-size: 16px; font-variant-ligatures: none; letter-spacing: 0.1px; white-space: pre-wrap;"><br style="background-color: #202124; color: #e8eaed; font-family: Roboto, Arial, sans-serif; font-size: 16px; font-variant-ligatures: none; letter-spacing: 0.1px; white-space: pre-wrap;"><span style="background-color: #202124; color: #e8eaed; font-family: Roboto, Arial, sans-serif; font-size: 16px; font-variant-ligatures: none; letter-spacing: 0.1px; white-space: pre-wrap;">शेवट करताना एक आठवण झाली. मागच्या वर्षी पराधीन आहे जगती हे त्रिकालाबाधित सत्य सांगणाऱ्या गण्यावरून मी काही लिहिलं होत. ते आज हि लागू होत. माडगूळकर म्हणाले "मरण कल्पनेशी थांबे तर्क जाणत्यांचा" होऊन होऊन काय वाईट होईल तर मरण येईल. पण ते इतकं भीषण येईल, पूर्ण शरीर, इज्जत याचा लचके तोडून याचा कोण तर्क करेल...</span><br style="background-color: #202124; color: #e8eaed; font-family: Roboto, Arial, sans-serif; font-size: 16px; font-variant-ligatures: none; letter-spacing: 0.1px; white-space: pre-wrap;"><br style="background-color: #202124; color: #e8eaed; font-family: Roboto, Arial, sans-serif; font-size: 16px; font-variant-ligatures: none; letter-spacing: 0.1px; white-space: pre-wrap;"><span style="background-color: #202124; color: #e8eaed; font-family: Roboto, Arial, sans-serif; font-size: 16px; font-variant-ligatures: none; letter-spacing: 0.1px; white-space: pre-wrap;">"कामातूराणाम न भयं न लज्जा ..!!" हेच खर..!!</span><br style="background-color: #202124; color: #e8eaed; font-family: Roboto, Arial, sans-serif; font-size: 16px; font-variant-ligatures: none; letter-spacing: 0.1px; white-space: pre-wrap;"><br style="background-color: #202124; color: #e8eaed; font-family: Roboto, Arial, sans-serif; font-size: 16px; font-variant-ligatures: none; letter-spacing: 0.1px; white-space: pre-wrap;"><span style="background-color: #202124; color: #e8eaed; font-family: Roboto, Arial, sans-serif; font-size: 16px; font-variant-ligatures: none; letter-spacing: 0.1px; white-space: pre-wrap;">©प्रसन्न कुलकर्णी [PK ]</span></div>
Prasanna Kulkarnihttp://www.blogger.com/profile/16790479522824925011noreply@blogger.com2tag:blogger.com,1999:blog-700383533597231797.post-84806268076651082412019-11-16T20:52:00.001-08:002021-09-18T11:01:34.526-07:00Playlist थोडी Shuffle हवीच..!!<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhMfAcuIOu7MKdppvXesBIDZdgxl87XH0I0NY2BQrwQtKY-wwGImId0A39KegrU_Aytv_WKLj-PCZWE2_oZKzjocNGUVAjFSOEnAl1CSSRQcH46E90J7WVQoGmZ9ens3aK0a2SKc7moYHvU/s1600/1573966339953193-0.png" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;">
<br>
</a>
</div><div><br></div><div> “काय दादया, खूप दिवस पेन हातात घेतलं नाही वाटत. पेनातली शाई संपली की उत्साह ओसरला?” एका काकांचा हा प्रश्न ऐकून जरा बर वाटलं. कारण आपण असं ४-६ महिन्याला काहीतरी पोस्ट टाकणार तर कोणी असं विचारेल असं वाटलं हि नव्हतं.</div><div><br></div><div> " नाही ओ काका, थोडं परीक्षा पोटापाण्याच्या नादात हे जरा मागे पडत. आणि असं हि आजकाल फेसबुक उघडायची इच्छा होत नाहीय. विधानसभा, प्रचार हेच चालूय सगळं मग आपण काही टाकलं तरी लोकांचा सध्या मूड वेगळा आहे म्हणून मागेच पडलं."</div><div><br></div><div> " ठीके. तुमच्या परीक्षा वगरे काही म्हणणं नाही. पण लोकांचा मूड अंदाज घेत बसलास तर तुझा हि लिहायचा मूड निघून जाईल आणि सवय सुद्धा. तर समर्थ म्हणतात तस 'दिसामाजी काहीतरी लिहावे आणि प्रसंगी अखंडित वाचीत जावे.' कळलं का लेका"</div><div><br></div><div>हे संभाषण साधारण काही आठवडे पूर्वीच पण परिस्थती अजून तीच. आता तर राजकीय पोस्ट्स ना अक्षरशः ऊत आलाय. पण ठरवलं होत जोपर्यंत हलकं फुलकं सापडत नाही तोवर कीबोर्ड ला बोट लावायचं नाही. ती संधी लवकरच मिळाली ही. एका छोट्याशा गप्पांच्या प्रसंगाने डोक्यात एक विचाराची पुडी सोडली.</div><div><br></div><div> तर झालं असं कि माझ्या भावाकडे सगळे मोठे लोक एकत्र जमलेले असताना. ते SAREGAMA CARWAN MUSIC Player मध्ये जुनी गाणी लागलेली होती. रफी, किशोरकुमार, लता दीदी, आशा, मेहमूद, जगजीत, मन्ना डे, गुलजार, आर डी, एस डी अशी असंख्य filters लावून मैफिल रंगली होती. गाणी आपोआप पुढे सरकत होती. एखाद नावडत लागलं तर हे नको हे नको चा सूर लागायचा तर एखाद अगदी जिव्हाळ्याचं लागलं तर बहुमताने 'वाह राहू दे' यायचं..!! अर्थात जुन्या गाण्याची मैफिल होती मग आमच्या पेक्षा मोठ्या लोकांच्या मताला किंमत होती. आणि हो मताला किंमत, बहुमत सध्या चालूय तस नाही बर का अगदी मनापासून होत म्हणून बाहेरून पाठिंबा घेऊन ५०-५० फॉर्मुला चा इथं तसा काही स्कोप नव्हताच. आम्ही पण मग खुश रहो म्हणत रिमोट त्यांच्या कडे दिला आणि चकाट्या पिटत बसलो.</div><div><br></div><div> तेव्हा बोलत बोलत भाऊ म्हणाला,माहिती का पश्या यांना CARWAN आवडायचं कारण काय ? यात त्यांना रेडिओ, गीतमाला किंवा दूरदर्शन च्या रंगोली चा feel येतो. भले यात सुद्धा रेडिओ, USB, Bluetooth आहे पण याना असं random गाणं लागणारी गीतमाला आणि रंगोली च जास्त प्रिय. logic असं कि यांना त्या Surprise Factor ची सवय आहे म्हणजे पुढचं गाणं कोणतं हे त्यांना आधीच ठाऊक नसता. अचानक खूप दिवसांनी एखाद गाणं समोर आलं कि लहान मुलांसारखं त्याचा आनंद घायचा हि त्यांची style. तर आपण playlist च्या जमान्यातले. आपल्याकडे हजार गाणी असतील पण आपण कोणतं गाण ऐकायचं हे आधीच ठरवलेलं असता. बऱ्याचदा तर आपला मूडच आपली playlist ठरवतो. Playlist असून असून किती १० किंवा अगदी २५ गाण्याची. त्यात हि एखाद गाणं वाजेपर्यंत आपला मूड बदलला तर आपण १० सेकंद सुद्धा ऐकू शकत नाही. कारण आपला मूड वेगळा असतो. भाई बंदा बात तो एकदम बराबर बोला..दिल को टच कर गयी.</div><div> तस बोलणं २ मिनिट असलं आणि फार काही फार खोल नसलं तरी रंगोली, रेडिओ आणि playlist च Comparison डोक्यात घोळवायला पुरेस होत. पूर्वी साधनं नव्हती आणि आत्ता आहेत म्हणून फरक असेल कदाचित पण आता आहे ते आहे. पण खरंच हे फक्त गाण्यापुरतं लागू आहे? का ती अक्खी Lifestyle तशी होती, मला फक्त गाणं दिसतय. विशेष म्हणजे त्या Lifestyle मुळेच बाकी नाही पण स्ट्रेस च्या बाबतीत तरी ते आपल्याहून काकणभर सुखीच आहेत. वरच्या उदाहरणाशी सांगड घालून च बोलायचं झालं तर गाणी वेळेत वाजली पाहिजे पण क्रम तोच हवा असं काही नाही किंवा बदल झालं झाला तरी ठीक आहे. सकाळी भूपाळी वाजायला हवी पण एखाद दिवस घनःशाय्म सुंदर ऐवजी उठा उठा हो सकळिक वाजलं तरी चालेल किंवा भूपाळी ऐवजी ओंकार स्वरूप लागलं तरी एन्जॉय करूच. म्हणजे आयुष्यात पण सगळं हवं पैसा, नोकरी, लग्न, स्वतःच घर. पण ते आपल्या हव्या त्या क्रमानेच मिळायाला हवं असं नाही. एखादी गोष्ट पुढे मागे किंवा नाही मिळाली तरी आहे तरी जैसा है हम खुश है. टेन्शन नही लेने का..! याउलट आपण? यार काय फालतू गाणं लागलं हे Next. ते हि खर तर आवडत असत. आपणच घेतलेलं असत पण आत्ता मूड नसतो आपली चिडचिड होते. कारण आपण सगळं प्लॅन केलेलं असत आधी डिग्री, मग जॉब हवं तेच प्रोफाईल, Salary मग इतके रूम च घर तसेच interior शिवाय आपल्या स्टेटस आणि बजेट दोन्ही सांभाळत. पण एखाद गणित बिघडलं तर? आपली चिडचिड होते. का तर गाणं वेगळं किंवा वेगळ्या क्रमाने लागलं. हि सुरुवात आहे खरी गम्मत पुढे आहे. सकाळी कधी मराठी चॅनेल लावून बघा आजही बघायला मिळेल आज चि .चिंटू याचा वाढदिवस आहे. गाण्याची फर्माईश आहे लकडी कि काठी. शुभेच्छुक आहेत काका आत्या मामा मावशी आजी आजोबा अगदी दूधवाला मोलकरीण पर्यंत जात का काय वाटत पण हि लोक हा प्रकार प्रत्येक गाण्याला ऐकायची हो. आणि त्यांना बोर वाटलं तरी तो भाग skip चा पर्याय नव्हता. कदाचित त्यामुळे च ते म्हणतात ना 'ज़िन्दगी का तजुर्बा है, मजा तरसने में ही है..!!' और ये तरसने का ये अंदाज वो सीख गये. आणि आपण फक्त २०-३० सेकंद ad असते ज्याचा वेळ आपल्याला माहित असतो. पण आपण वाट बघू शकतो ? अजिबात नाही. मग जॉब/प्रोमोशन किंवा त्याचा/तिचा होकार हम तरस नहि सकते. शक्य असेल तर ऍड स्किप करा किंवा तू नहि तो और सही. आपल्या बाबा काका मामानी कधी 'मै हू झूम झूम झुमरू' किंवा 'याहू कोई मुझे जंगली कहे च्या मूड मध्ये लावलं असेल रेडिओ पण लागलं असेल 'मै जिंदगी का साथ निभाता' किंवा 'राही मनवा दुःख कि चिंता' म्हणून ते बंद नक्की नाही करणार. फार तर स्टेशन बदलून पाहतील आणि नसेल तर ते शांत पणे ते हि ऐकतील. म्हणजे एखाद अनपेक्षित काही घटना घडली तरी बाकी पर्याय पाहतील आणि नाही सापडले तर आहे ते शांत पण पचवतील. आपण आतिफ आणि अरिजित लावायला गेलो आणि जगजीत ची गझल लागली तर? एक तर बंद करू किंवा कपाळाला आठ्या पडू. म्हणजे प्रोमोशन ऐवजी जर परफॉर्मन्स मुळे सॅलरी कट झाली तर गाणं बदलता किंवा बंद करता येईल? Life का रेडिओ भाई. जो है जैसा है सूनना पडेगा. Last but not least एखाद्या कार्यक्रमात आजही एखादा काका एखाद्या काकूसाठी तयारी न करता तोडक मोडक जोहरा जबी म्हणेल कारण त्याला व्यक्त व्हायचंय, परफॉर्मन्स नाही द्यायचा. आणि पण एखादा भाऊ वाहिनी साठी म्हणेल तर तयारी करून karaoke ची साथ घेऊन. कारण त्याला वेळेच आणि परफॉर्मन्स च बंधन आहे.</div><div> हो आपण well planned, out of the box जाणारी पिढी आहेत. पण त्यासोबत आपण आपणच बनवलेल्या benchmark गाठताना stress घेऊन रडणारी हि आहोत. ज्याला जमलं नाही त्याच रडगाणं कर्कश वाजत राहणार आणि ज्याला जमलं त्याच मात्र-</div><div> </div><div>"जिंदगी एक सफर है सुहाना...यहा कल क्या हो किसने जाना "</div><div><br></div><div>©प्रसन्न कुलकर्णी [PK ]</div>Prasanna Kulkarnihttp://www.blogger.com/profile/16790479522824925011noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-700383533597231797.post-4054075014815946832019-05-23T18:11:00.001-07:002019-05-24T23:57:04.917-07:00काही क्षण भाळण्याचे इतर मात्र सांभाळण्याचे<p dir="ltr">     गेले कित्येक महिने चाललेल्या लोकशाहीच्या उत्कंठावर्धक सोहळ्याचा आज खऱ्या अर्थाने समारोप झाला. आता सरकार स्थापना वगैरे औपचारिकता होत राहील. आपल्या इतिहासात एका पक्षाला इतकं विक्रमी बहुमत फार कमी वेळा पाहायला मिळालं. काँगेसेतर तर प्रथमच असावं. याचा आनंद म्हणणार नाही पण अनुभव आपल्या बॅच नी अनुभवला ही एक समाधानाची बाब म्हणावी लागेल.<br>
      मी आधी ही ज्या काही २-४ राजकारण विषयक पोस्ट केलेल्या त्यात म्हणल्या प्रमाणे मी काही राजकीय पोस्ट लिहिण्या इतका मुरलेला अभ्यासक नाही. पण काही गोष्टीचा आपण आपल्या जमेल तसा अन्वयार्थ काढतो तितकच. ही निवडणूक जवळपास इतर मुद्दे बाजूला काढून फक्त मोदी हवे की नको इतक्याच गोष्टी भोवती फिरत होती हे सरळ आहे. आता त्यात इतकं राक्षसी बहुमत मिळाल्यावर त्यांच्या समर्थक उर्फ भक्त उर्फ तुम्ही द्याल ते नाव, हे सगळे अधिक उत्साहात असणार यात वाद नाही. यात मी ही आलोच. पण इतका विक्रमी विजय झाला याचा अर्थ मोदी जिंकले असा काढणे म्हणजे आततायी प्रतिक्रिया म्हणावी लागेल. कारण केलेल्या कामाची जाण ठेऊन आणि उद्याची आशा ठेवून जरी मोदींना निवडून द्यायचं काम जनेतेनी केलं असेल तरी त्यांच्या वर टीका झाल्या त्यात १००% चूक होत आणि जनता सगळ विसरली अस म्हणून आपण आपल्याच लोकशाही चां अपमान करू कदाचित. त्या टीका ही मोठ्या मनानी प्रत्येक मोदी समर्थक हा खाजगीत नक्की मान्य करेल. पैकी मला लक्षात आलेल्या काही ज्या कदाचित महागात पडू शकला असत्या पण ते झाल नाही त्या अशा -<br>
      मित्र पक्षांची फरफट जितकी मोदी शहा जोडीने केली तितकी कुणी केली नसेल. अर्थात मित्र पक्षा सोबत फार राहून निर्णयाची धडाडी ठेवता येत नाही हे जरी खर असल तरी थोड गोड बोलून किमान जुनी कृतज्ञता म्हणून तरी बरी वागणूक अपेक्षित होती, गांधी नेहरू च्या चुका नावाचे गढे मुर्दे किती प्रमाणात उक्रत बसावे याला ही थोड बंधन ठेवायला हवे होते, हिंदुत्व आधी ही होत पुढे ही राहणार आणि त्याला मतदार साद ही घालणार च पण केवळ कट्टर हिंदुत्व या एकमेव गोष्टीवर लोकांचा फोकस आणून आपण निवडून येऊ शकत नाही तस असत तर अडवाणी केव्हाच पंतप्रधान झाले असते, मोदी प्रसिद्धी आणि मार्केटिंग प्रेमी आहेत असा एक आरोप आहे आता हा गुण म्हणावा की दोष ज्याचं त्याचं मत, भाजपा ला लोकांना निवडून दिला फक्त ४-५ लोकांच्या कामाच्या जोरावर ते म्हणजे मोदी, पर्रीकर, गडकरी, सुषमा जी, प्रभू आणि राज्यातले फडणवीस योगी सारखे काही लोक. परंतु उरलेल्या खासदारापैकी बरेच से अतिशय वाचाळ आहे हे नक्की. माणसांनी एकवेळ २ काम कमी केली तरी चालेल पण नको तिथं नाही ते बोलून आपली व परिणामी आपण पक्षाची प्रतिमा खालावतोय हे इतक्या जाणत्या लोकांना कळू नये?.  गोहत्या, गोमांस, गोमूत्र अस गो गो करत राहील तर जनता पण u go म्हणायला मागे पुढे बघणार नाही, साध्वी ना उमेदवारी द्यावी की न द्यावी हा एक खरच मोठा प्रश्न चिन्ह होत बर दिली तर दिली आणि मला ही वाटतं की त्यांच्यावर झालेला अन्याय खरा आहे मात्र जेव्हा तुम्ही उमेदवार म्हणून उभे असता तेव्हा एखाद्या पोलिस कमिश्नर जो भले तुमच्या सोबत तो चूक वागला असेल पण तोच २६/११ मधे शहीद झाला आहे आणि लोक भावनिक पणे त्याला जोडले गेले आहेत त्याला नख मारून तुम्ही आपली प्रतिमा ओरखडली होती हे नक्की, परत नथुराम च एक वाक्य त्यांनी सोडल होत आणि भाजपा नी त्याची माफी मागायला लावली हा एक मोठा हिट विकेट झाली असती. तो देशभक्त होता हे मानणारा जो वर्ग आहे तो गांधीच्या कार्याला पण नाकारत नाही आणि हत्या याच समर्थन करत नाही पण त्यांना वेळीच आवर घालणं आवश्यक होते तेव्हा हत्या हा मार्ग त्यांनी निवडला इतकंच. पुलवामा चां हल्ला दुर्दैवी च होता आणि असा कोणता ही हल्ला झाला तर त्याला सडेतोड उत्तर द्यायची ताकद मोदी सरकार मधे आहे हे विरोधक ही मान्य करतील च पण त्याच्या नावावर मत मागणं हे कितपत बरोबर आहे हा ही एक वादाचा मुद्दा आहे. २०१४ पासून प्रखर राष्ट्रवाद पुढे आला हे जरी खरं असेल आणि काँग्रेसी बरेच नेते इतक्या कट्टर देश प्रेमा पासून लांब आहेत हे जरी असेल तरी त्यांना मत देणारा हा तर भारतीय होता त्याला थोडी हे कळत होत आणि काँग्रेस ला मत म्हणजे राष्ट्रद्रोह अस म्हणून आपण त्या पक्षांचं राहू दे.. पण नकळत पणे आपल्या लोकांच्या राष्ट्र प्रेमावर शंका घेत होतो.<br>
      या गोष्टी मला स्वतः ला तरी जाणवल्या आणि खटकल्या पण या इतक्या ही मोठ्या नाहीत की यामुळे त्यांना सरकार स्थापने पासून लांब ठेवावं लागेल आणि जनतेनी सुद्धा हे मान्य करून बहुमताच दान सढळ हातांनी पदरी टाकलाय. आता या गोष्टी तशाच चालू राहिल्या आणि वाचाळ लोकांना आवर नाही घातला तर आपण विरोधकांना स्वतःच बळ देण्यासारखं आहे.</p>
<p dir="ltr">सत्ता पालट हा नक्की असतो, दर ५-१०-१५ का होईना पण सत्ता बदल नक्की आहे आणि तो मोठ्या मना नी पाय जमिनीवर <u>ठेऊन</u> जिभेला आवर महत्वाचा.</p>
<p dir="ltr">हे २ दिवस फक्त भाळण्याचे बाकी सगळे सांभाळण्याचे आहेत</p>
<p dir="ltr">©प्रसन्न कुलकर्णी [PK]</p>
Prasanna Kulkarnihttp://www.blogger.com/profile/16790479522824925011noreply@blogger.com1tag:blogger.com,1999:blog-700383533597231797.post-3155298773877396322018-07-08T09:36:00.001-07:002018-07-08T11:39:18.687-07:00एके वारी कैक सवारी<p dir="ltr"><br>
       सवारी? शीर्षक जरा वेगळं आहे ना? नुसतं यमक जुळल म्हणून टाकल अस वाटण अगदीच स्वाभाविक आहे पण फक्तं तितकंच नाहीय. कारण आपल्याकडे तीर्थक्षेत्र आणि त्याचे उत्सव खूप आहेत आणि त्याविषयी जगभर आस्तिक आणि नास्तिकाना देखील आकर्षण आहे. कारण ही क्षेत्र ऊर्जेचा स्रोत आहेत किंवा प्रेरणा आहेत. त्यातलीच एक आपली वारी. ही मी लहानपणापासून पाहतोय, ऐकतोय अन् त्याविषयी वाचतोय शिवाय दोन वर्षांपूर्वी एक दिवसासाठी का असेना पण ४ पाऊले अनुभवली ही आहे. पण नुसत्या निरीक्षणाने ही त्याच्या भव्यतेचा अंदाज आपल्याला येऊ शकतो. आणि यात एक नक्की समजू शकत की वारी एक आहे पणं त्यात सवारी कैक आहेत. जशा कि वारकऱ्यांच्या समता व भक्तीची, दिंड्या आणि वारी व्यवस्थापनाची, सेवाभावी लोकांच्या माणुसकीची, असंख्य छोटे व्यापाऱ्यांची, अभ्यासू व जिज्ञासूंची, शेवटी यजमान पंढरपूर आणि चंद्रभागेच्या अगत्याची....!!! एकेका विषयावर पुस्तक लिहीता येईल एखाद्याला इतका याचा अवाका आहे.<br>
पहिली सवारी वारकऱ्यांची भक्ती याला व्यक्त करावे असे शब्द जगात कुठेही सापडणार नाहीत. कर्मयोगाचा पुरस्कार करणारा विठ्ठल आणि कसला ही त्रास झाला तरी दर्शनाची तीच आस ठेवणारा त्याचा भक्त हे कल्पने पलिकडचे आहेत. प्रश्न समतेचा म्हणालं तर एक गोष्ट मला फार भावली आपलं नाव गाव हुद्दा वय लिंग काहीही असो, जातीच म्हणालं तर तुकाराम कुणबी, ज्ञानेश्वर ब्राह्मण, सेना नाव्ही, सावता माळी, नामा शिंपी, गोरा कुंभार, नरहरी सोनार, चोखा महार तर कान्होपात्रा वारांगना पैकी कोणाचंही बोट पकडून जा वारीत पणं तुम्हाला हाक पडते ती एकाच नावांनी म्हणजे माऊली. ही एकच ओळख राहिली तर गर्व करणार कसला ना? उरलाच थोडाफार ' मी' पणाचा तर चालून चालून घामासोबत तोही गळून पडत असणार याला दुमत नाही.<br>
दुसरी सवारी म्हणजे वारीचा केंद्रबिंदू म्हणजे दिंडी व पालखी. शेकडो वर्षांची परंपरा, लाखो लोकांचा समूह आहे. पण शिस्तीमधे काही फरक पडला आहे, काही गोंधळ उडाला आहे, २ दिंड्यां मधे काही वाद झाला आहे अस ऐकिवात नाही. गल्लीतल्या २ गणेश मंडळामध्ये सुधा भांडण होत असतात पणं इथे लाखोंनी लोक असले तरी हे सहकार्य वाखाणण्याजोग. कारण त्यांचं वेळापत्रक, क्रम आहे तसाच आहे. कोण कसा जाईल, कुठे मुक्काम, मार्ग, सगळ कस पूर्वनियोजित. रिंगण, त्याला येणारे शितोळे सरकारांचे घोडे हे देखील परंपरेने असतात म्हणे. जिथे १०० च्या गर्दीत दांडपट्टा लागावा आणि लाखोंची गर्दी बिनबोभाट चालत राहावी हे दिव्य आहे.<br>
नंतर मला महत्वाचा वाटलेली सवारी म्हणजे सेवाभावी संस्था आणि असंख्य व्यापारी. कारण आस्तिक प्रत्येक जण असेल च अस सांगता नाही येत किंवा असला तरी प्रत्येकाला वारीत भाग घेता येईलच हे ही कठीणच आहे. मग वारकऱ्यांची थोडी फार सेवा करून आपण थोड पुण्य पदरात पाडून घ्यावं असा तरी उद्देग असणारे किंवा नास्तिक असले तरी ' माणूस ' म्हणून या प्रवाशांची फुल ना फुलाची पाकळी अशी सेवा करणारे यांचा मला विशेष आदर आहे. ठीके दोन्ही नाही तर असंख्य छोट्या व्यापारी यांचा जीवनावश्यक गरजा किंवा निकड भागवण्यासाठी माफक शुल्क घेऊन काम करणाऱ्यांची संख्या ही भली मोठी. मग त्यात अन्न, वाहतूक, निवास, आरोग्य यावर मोठं अर्थशास्त्र अवलंबून आहे.<br>
परत आले अभ्यासू आणि जिज्ञासू. भारतीय तर आहेतच शिवाय वारी ही कुतूहल आणि अभ्यास म्हणून करणारे कित्येक परदेशी ही आपल्याला पाहायला मिळत आहेत. बीबीसी नी वारीची दखल घेतली तेव्हा पासून ती जगात पसरली अस म्हणतात. काही जपानी महिला ३० हून अधिक वर्ष अभ्यास म्हणून वारी करतात अस ऐकून आहे. आणि MBA विद्यार्थी प्रोजेक्ट म्हणून हे विषय घेतात हे ही पाहण्यात आलाय. कारण काही का असेना पण आपली परंपरा जगात दिसतेय हे ही नसे थोडके.<br>
आता शेवट थोडा सुखदायी आणि थोडा विचार करण्या जोगा. एखादे वेळी ८ तास ८ पाहुणे आले तरी काय करू कस करू होऊन चिडचिड होऊ शकते तिथे दरवर्षी ८ लाख पाहुणे ८ दिवसापेक्षा जास्त येतात तरीही पंढरपूर आणि चंद्रभागेच अगत्य जराही कमी नाही होतय ते प्रत्येकाला सामावून च घेतय. पण त्या बदल्यात आपण त्यांना काय देऊ शकतो ? खरं तर धन्यवाद सोडून काहीही नाही. पण आपण सुसंस्कृत अतिथी आहोत, कुठेही गेलो तरी आपला वावर हा नेहमी निरुपद्रवी कसा असेल याची आपण काळजी घेतो मग अजाणते पणी आपल्या कडून अती प्रमाणात कचरा, प्लास्टिक बाटल्या, निर्माल्य जे नदी मधे अडकून पडत, दुर्गंधी येणारे पदार्थ हे इकडे तिकडे पडून त्याचा त्यांना त्रास होऊ शकत. तिथे त्या दिवसात काही टन मलमुत्र जमा होत आणि त्याचा दुर्गंध काही आठवडे राहतो अस वृत्तपत्रात वाचलेलं मला आठवत. आता मलमुत्र विल्हेवाट ही सोय प्रशासन करू शकत कारण त्या सोयी त्यांच्या कडे आहे हे अगदी मान्य, पणं इतर कचरा व्यवस्थापनात सेवाभावी संघटना येत आहेत हे कौतकास्पद आहेच त्यात निदान साथ देऊन काम हलक केलं तर पंढरी ला कृतज्ञता दिसेल किमान. आणि अतिथी देवो भव चां त्यांचा बाणा कायम ठेवण्यात त्यांना धन्यता वाटेल<br>
आता शेवटी वर कुठेही उल्लेख न केलेली सवारी आहे एक जी आजकाल जास्त भरती झाली आहे ते म्हणजे हौशी फोटोग्राफर, कवी , लेखक जे आपापल्या नजरेन वारी लोकांना दाखवतात. आणि त्याला कल्पक झालर लावतात...!!<br>
तशी वारी खूप लोकांना माझ्याहून जास्त माहीत आहे पणं मला समजलेली वारी मी शब्दात मांडली बाकी चूकभूल क्षमा असावी<br>
' बोला पुंडलिक वरदे.....!!!'<br>
<br>
©प्रसन्न कुलकर्णी [PK]</p>
Prasanna Kulkarnihttp://www.blogger.com/profile/16790479522824925011noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-700383533597231797.post-32213136342841454232018-06-09T04:07:00.001-07:002018-06-09T04:07:39.129-07:00थोडा है बस थोडे की जरुरत है....!!!<p dir="ltr"></p>
<p dir="ltr"> कालपासून ST महामंडळाचा पुन्हा एकदा वेतन वाढी साठी संप सुरू झाला. २०१७ च्या दिवाळी मधे या संपामुळे संपकरी, सरकार, पोलीस यंत्रणा आणि मुख्य म्हणजे `सामान्य नागरिक` सगळेच अक्षरशः वैतागून गेले होते. एक महत्वाची विनंती अशी की `सामान्य नागरिक` हा शब्द ते काय बोल्ड, इटालिक आणि अंडर लाईन का काय असत ना तस करून लक्षात ठेवां बर का...!! कारण कस आहे नेहमी आपण सामान्य नागरिक हा शब्द साधारण आर्थिक निकषांवर मध्यमवर्गीय आणि त्या खालचे असे घेतो पण इथे आर्थिक पेक्षा भौगोलिक निकष अभिप्रेत आहेत. म्हणजे महाराष्टातील जिल्हे, तालुके आणि त्यानंतर काही मोठी गाव सोडून इतर ठिकाणी राहणारी सगळी मंडळी म्हणजे सामान्य नागरिक. ज्यांच्या कडे स्वतःचे ४ चाकी वाहन नाही ते सगळे. आता लोक म्हणतील काय इतकं चिरफाड `सामान्य`तेची त्याच कारण एक पुण्याचे सद्गृहस्थ , ज्यांच्या मते ते महाराष्ट्र, भारत फिरले आहेत आणि दुनियादारी ची बरी जाणं आहे त्यांना. <br>
झालं असं की मागच्या दिवाळीत आमची भेट झाली होती तेव्हा हा संपाचा विषय निघाला त्यात त्यांची पहिली २-४ वाक्य अशी होती की -<br>
"राजकारण करतात साले...यांच्या कामगार संघटना भरवतात यांना. त्यांचे नेते आणि विरोधक यावर पोळ्या भाजून घेतात. त्यांना म्हणावं करा संप काहीही फरक पडत नाही. तसाही आजकाल बस च्या लाल डब्यात जातय कोण? मला नाही आठवत मी गेल्या २० वर्षात बस मधे पाय ठेवलाय. ट्रॅव्हल्स, ट्रेन्स, गाड्या इतक्या सोयी आहेत च की. लोकांना ब्लॅक मेल केलं की काहीही मिळत अस वाटत यांना. आणि अस ही यांच महामंडळ तोट्यात च चालुय की. भ्रष्टाचार केला आणि सेवा ही नाही तर नफा येणार कसा... करा म्हणाव बस खाजगी मग नफा मिळेल मग पगार वाढेल. नाहीतर बसा तुमच्यावाचून काहीही अडत नाही."<br>
"तुमच्यावाचून काहीही अडत नाही" हे वाक्य घोळत राहील आणि त्याक्षणी मला सामान्य नागरिकांची ही व्याख्या समजली. आणि ते अत्यंत सुजाण असले तरी सगळी दुनियादारी पहिली नसावेत अस वाटल आणि यांचं फिरण सुद्धा पुणे आणि त्यापेक्षा वरील शहर अस असावं. भ्रष्टाचार आणि राजकीय पोळी भाजणे हा एक प्रकार सोडला तर बाकी मुद्द्यात फार काही विशेष दम वाटला नाही. पण त्यावेळी फार आकडेवारी माझ्याकडे नव्हती म्हणून विषय सोडून दिला.<br>
ऐन दिवाळी मधे माझ्या ओळखीतले किमान २५ जण घरी जाऊ शकले नाहीत हे मला माहीत होत. बऱ्याच जणांना खाजगी ट्रॅव्हल्स त्यात स्लीपर, सेमी स्लीपर, एसी ऑप्शन आहेत किंवा ट्रेन आहेत म्हणून अस वाटत. पण काही ढोबळ आकडेवारी प्रसिद्ध केली गेली होती त्यात वाचण्यात आल की महाराष्ट्रात ४५ ते ५० हजार खेडी आहेत आणि त्यात महत्वाचे जिल्हे, तालुके आणि मोठी गाव अशी १५-२० हजार गाव सोडली तर बाकी ठिकाणी ट्रेन, आणि खाजगी ट्रॅव्हल्स चां आता पर्यंत अस्तित्व ही नव्हत. खेड्यातली लोक गरीब असतात त्यांना उच्च राहणीमान परवडत नाही हा एक शहरी गैरसमज आहे, पैसा असला तरी लाल डबा हा एकमेव पर्याय असलेली हजारो गाव आहेत. कामगार संघटना भरवतात हे काही अंशी खर असल तरी त्यात तथ्य आहेच की. सर्वात कमी पगार घेणारी संघटना काढल्या तर महामंडळ नक्की पहिल्या पाचात असेल. ९ ते १६ हजार या दरम्यान जास्तीत जास्त लोक आहेत. आणि प्रश्न राहिला नफ्याचा. एक माणूस असेल तरी ती गाडी गेली पाहिजे या तत्वावर गाडी चालते. नफा नाही तर सेवा हा मूळ उद्देश घेऊन ती रस्ता धरते. त्यात नेते, स्वतंत्र सैनिक, अपंग, वृध्द यांना सवलत देणारी एक तरी खाजगी गाडी शोधून दाखवली तरी त्यांना जागच्या जागी बक्षीस. सणासुदीला ट्रॅव्हल्स जेव्हा अव्वाच्या सव्वा दर वाढवून खाजगी वाले पैसे छापत असतात तेव्हा कित्येक जादा गाड्या सोडून लोकांची सोय बघायचं काम ही लाल परी करते. खाजगी मधे किमान वाहक चालक यांची उत्तम काळजी घेतली जाते, ऑन ड्युटी गाडी मधे झोपलेले ड्रायव्हर मी स्वतः पाहिले आहेत.<br>
मिनी, आराम, निम आराम, एशियाड अशा १७००० गाड्या मधून रोज सरासरी ७० लाख प्रवासी घेऊन जाणारी संघटनेची कदर आपण केली तरी फरक काय पडला. अर्थात राजकीय पोळी मुळे बस मधे सुधारणा कमी आहेत पणं आता ती हळु हळु कात टाकत आहे. लाल डबा ओळख पुसून शिवनेरी, शिवशाही किंवा नवीन अश्वमेध अशा नवीन नावांनी रंगांनी आपल्याला भेटत आहेत. लवकरच वायफाय किंवा स्लीपर सुद्धा आपल्यात येत आहेत. आता याचा मोबदला त्यांच्या खऱ्या कामगारांना मिळत नाही हेच आपल दुर्दैव. ते सरकार कोणताही असो. आता यात नाईलाज असेल किंवा नाकर्तेपणा. म्हणून नाक दाबून तोंड उघडाव हा त्यांचा प्रयत्न असावा. ते कितपत उघडेल यावर शंका आहे. फार ही नका देऊ हो तो निदान श्रमाच चीज वाटू द्या भिक नको. असो आपण बोलणार किती आणि कोणाला कारण खाकी रंगाच नशीब च ते आहे सगळ्या रंगात रंगून यांचा रंग च दिसत नाही असो. <br>
या लाल परी चा प्रवास हळूवार असला तरी नक्कीच वाखानण्याजोगा आहे एक च गाणं आठवत राहत -<br>
"लाल छडी मैदान खडी, क्या खूब लडी क्या खूब ल डी"</p>
<p dir="ltr">पण हिला अजून समृध्द करायचं असेल तर थोडा है बस थोडा करने की जरुरत है...!!</p>
<p dir="ltr">©प्रसन्न कुलकर्णी [Pk]</p>
Prasanna Kulkarnihttp://www.blogger.com/profile/16790479522824925011noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-700383533597231797.post-84599590572820298022018-05-21T01:50:00.001-07:002018-05-21T03:01:52.316-07:00युद्ध अटळ आहे 2019<p dir="ltr"><br>
      आधीच disclaimer देतो की ही पोस्ट काही राजकीय नाही. तितकी माझी पात्रता ही नक्कीच नाही आणि मी आधीच ठरवलं होत की राजकारण म्हणजे कानाला खड़ा . पण एक सामान्य मतदार जो राजकारण करत नाही पण जे काही चालू आहे त्यावरून स्वतःच एक मत बनवतो किंवा स्वतःला काही प्रश्न पडतात तितकच या पोस्ट चा अर्थ.<br>
कर्नाटक निवडणुक. नावाप्रमाणे अनेक नाटक करुन ते वादळ शमल ते येदियुरप्पा च सरकार शमवून च. त्यावर असंख्य प्रतिक्रिया पाहिल्या. घोडेबाजारीला आळा बसला, लोकशाहीचा विजय, सत्तेचा माज उतरला वगेरे वगेरे. अर्थात हे खरच आहे की सत्तेचा माज हा कुठेही नकोच मग पक्ष कोणता ही असो. आणि एकाच पक्षाला मक्तेदारी देणे म्हणजे मनमानी कारभाराला मूकसंमती देण्यासारखं आहे. आणि घोडेबाजार म्हणालं तर हो गोवा मधे राजकारण करून ज्या पद्धतीने सत्ता स्थापन केली गेली त्याला घोडेबाजार म्हणणे चूक वाटणार नाही. आणि अप्पा यानी सरकार सोडल पण शक्य तितके हातपाय मारून पण २२ वर्षापूर्वी अटलजींनी सरकार सोडल फक्त एक मत कमी पडलं म्हणून ते ही नैतिकतेने त्यांची बरोबरी अप्पा सोबत तर होऊच शकत नाही. क्षेत्र कोणताही असो गर्वहरण हवच, ज्याचे पाय जमिनीपासून वर गेलेत त्यांना खाली आणन हे मतदारांच कर्तव्य आहेच. पण लोकशाही ची हत्या टळली ती कशी हे काही कळल नाही. एखाद्या पक्षाच्या जागा अडीच पट वाढून त्या ५०% च्या अगदी जवळ आल्या आहेत सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. पण तरी सर्वात लहान पक्षाचा मुख्यमंत्री होतोय. हा काही लोकशाहीचा सन्मान तर नक्कीच नाही झाला. भाजपा परतीचा प्रवास करतोय तर असा पक्ष अडीच पट जागा कशा घेईल हे गणित आवाक्याबाहेर आहे. पणं कदाचित झालं ते बर झालं, आपला कामाचंं सिंहावलोकन करायची संधी समजून ती घेतली जावी इतकंच. याचा अर्थ चुकाच अस नाही तर जे काही भूमिका , निर्णय, टीका, कौतुक झाले ते खरच जनहितार्थ होते का? इतकंच. दिल्या मताला आपण जागलो आहोत का इतकंच. जर मी एकट्या माझ्या मताचा विचार केला<br>
मला अस कायम वाटत की सरकार स्थापन करण आणि टिकवण यात जमीन अस्मानचा फरक आहे. स्थापन कोणीही करेल पणं टिकवायच कस काँग्रेस कडून शिकावं. त्यांनी सुद्धा कित्येक छान निर्णय घेतले कारण सरकार हे लोकांविरुद्ध जाऊच शकत नाही. पण ते अंमल बजावणी समाधान कारक नाही झाली उलट भ्रष्टाचार झाला. २०१४ ला मोदी सरकार आल २ कारणांनी एक लोकांना बदल हवा होता काँग्रेस पासून. दुसर मोदींनी 'अच्छे दिन ' नावाचं एक स्वप्न दाखवल होत त्यांची राजकीय समज, इच्छाशक्ती, बोलण्यातली पोट तिडीक दिसत होती. लोकांनी सढळ मत देऊन त्यांना प्रधान पद बहाल केलं. त्याच त्याच प्रश्नांना तीच तीच उत्तर शोधण्यासाठी पेक्षा धाडसी आणि कल्पक निर्णय घेण्याचा निदान प्रयत्न तरी केला अस म्हणण वावग नाही. त्यात नोटाबंदी, वस्तू सेवा कर हे तर गाजलेच शिवाय RERA, make in India, स्वच्छ भारत, जनधन योजना, स्मार्ट शहर आणि डिजिटल भारत, बुलेट ट्रेन आणि मेट्रो. कित्येक देशांमध्ये केलेले विविध करार त्यातून येणार परकीय चलन, आंतर राष्ट्रीय हित संबंध, लष्करी बळ वाढवणे वगेरे. हे सगळ जनहिता मधे गेलं की नाही, त्याच अंमल झालं की नाही, योग्य उद्देश साध्य झालं की नाही हा ज्याचा त्याचा दृष्टिकोन. आपण अस समजल की हे जनहितार्थ होत तरी आव्हान वेगळी च दिसत आहेत.<br>
कारण 'अच्छे दिन ' ही वाख्या प्रत्येकानी ठरवली. आपल्या कडे मतदारांचे पण प्रकार आहेत. काही आहेत उच्च श्रीमंत आणि मोठे उद्योजक ज्यांना धंद्याला पोषक निर्णय म्हणजे अच्छे दिन, काही आहेत मध्यम व्यापारी वस्तू सेवा कर व्यवस्थेत सुलभता म्हणजे अच्छे दिन, नंतर आहेत मध्यम वर्ग त्यांना थोडा फार आयकर शिथिलता, कांदे बटाटे स्वस्त आणि पेट्रोल गॅस दर अच्छे दिन, नंतर गरीब आणि मागास त्यांना आरक्षण किंवा सुविधा अच्छे दिन, आणि याउपर नेते सपक्षिय किंवा इतर ही मलई खायला मिळाली की अच्छे दिन. आता एकाच वेळी या पैकी किती लोकाच्या अपेक्षाना आपण पुरलो हे पाहण आणि त्यांच्या पर्यंत पोचण हे एक आव्हान.<br>
२०१४ च सरकार हे सोशल मीडिया नी जिंकल अस म्हणल जात आस अर्थात हेच बुमरांग आपल्या वर उलटू शकत हे दुसर मोठं आव्हान. लोकशाहीचे ४ स्तंभ जे स्वायत्त काम करतात अस म्हणतात ते म्हणजे माध्यम, अधिकारी वर्ग, न्यायपालिका, संसद/विधिमंडळ. आता विधिमंडळ नेते आणि माध्यम एकमेका साहाय्य करू काम करतात अस भासत. आणि आता कर्नाटक मधे सर्वोच्च न्यायलयाला मधे यावं लागलं. हे ३ स्तंभ जर काही कारणांनी आपल्या विरुद्ध जात असतील तर त्यापेक्षा तीसर मोठं आव्हान काही नाही. शेवटचं म्हणजे सगळीकड स्वायत्त सत्ता घेताना प्रादेशिक पक्षांना दिलेलं दुय्यम स्थान अंगलट <a href="http://येणारच.आणि">येणारच.आणि</a> काही कष्टाळू कार्यकर्त्यांना त्यांचं चीज नाही मिळालं तरी ते फुटणारच हे चौथ आव्हान.<br>
२०१४ नंतर ज्या पद्धतीने भाजपाने लागोपाठ गोवा, जम्मू काश्मीर, आंध्र प्रदेश, हरियाणा, महाराष्ट्र, झारखंड, आसाम इथे सरकार बनवली. कुठे चतुर राजकारण करून तर कुठे प्रादेशिक पक्षांसोबत युती करून. हिमाचल प्रदेश आणि यूपी मधे तर अक्षरशः धुमाकूळ घातला त्याच श्रेय अर्थात २ वर्ष ठाण मांडून गल्ली ते दिल्ली कार्यकर्त्याची अन नेत्याची मांडलेल जाळ. हा अश्वमेध या आव्हानांवर कशी मात करणार हा एका मतदाराला पडलेला प्रश्न आहे कारण भाजपा राम राज्याचं स्वप्न दाखवत असली तरी हे महाभारत तर त्यांना लढावच लागेल ते ही आपल्या लोकांसोबत च कारण - युद्ध तर अटळ आहे.</p>
<p dir="ltr">©प्रसन्न कुलकर्णी [PK]<br>
</p>
Prasanna Kulkarnihttp://www.blogger.com/profile/16790479522824925011noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-700383533597231797.post-81699338388113245702018-02-23T07:55:00.001-08:002018-02-23T07:55:36.956-08:00धुरांच्या रेषा हवेत सोडी...!!!<p dir="ltr"></p>
<p dir="ltr"> १२५ कोटिच मनुष्यबळ आपल. आता याला बळ म्हणाव की नाही हा विनोदाचा किंवा वादाचा मुद्दा होऊ शकतो. आता इतका जनसमुदाय म्हणल की इकड तिकड़ फिरण आलच. मग आम्हाला बस, विमान, रेल्वे, कार,ट्राम, वडाप, बाइक, रिक्षा, टैक्सी, बैलगाड़ी, ऊंट, याक, घोड़ा, टांगा, सायकल तर कधी पायी. अस कुवत, आवड, भूगोल आणि उपलब्धता यानुसार निवड करावी लागते. पण या सगळ्यात रेल्वे. भाई बंदी मे कुछ बात है. सोई सुविधेबबदल लोकांच्या बोम्बा असतील पण तरी लै जनता अजुन हिच्या भरोशावर आणि प्रेमात आहे हे नक्की. <br>
‎पण इथे नॉन एसी प्रवास करणारा माणूस हा सोशल लाइफ मधे रस घेणारा, शांत पणे लोकांना पाहणारा, Silent observer च असावा अस माझ ठाम मत आहे. त्याच्याइतक एन्जॉय कुणीही करणार नाही. आपण अजुन बसलो न बसलो पाणी चहा कॉफ़ी, सैंडविच, इडली, चिप्स, कंगवे, पीना, हेडफोन, इयरिंग, बोडिस्प्रे अस अक्ख डीमार्ट समोर आल का काय वाटत? आणि त्याचं मार्केटिंग तर मार्केटिंग च्या पोराला लाजवेल एखाद वेळी. समोर दोन अवकाळी पोर आपल्या आईच्या नाकात दम करत असतात. पलीकडचे काका रेल्वेच्या तालावर होय होय नाही नाही करत असतात तर बाजुला बसलेल कपल सदृश्य जोड़ी कूच कूच करत असतात, हळूच मागुन २ वर्षाच पोट्ट त्यांच्यात डोकावत असत, तर दाराजवळ एखादा नवतरुण गाणी ऐकत दारात इतके intense लुकनी बाहेर बघत असतो तेव्हा नक्की हा सानू च ऐ काश के हम ऐकत असणार अस वाटत. बाकी जनते पैकी ३३% गाणी ऐकत, ३३% झोपेत मॉडलिंग करत आणि ३३% गप्पा टप्पा करत असते. खरी मजा या गप्पा ऐकण्यात. कोणाला जांच होतोय, कोणाच शेत कोणा चुलत्यानी घेतल, आमचा सरपंच कसा बिनविरोध येणार, निवडणुकीचे भाकित, सातव वेतन आयोग, सेंसेक्स चढ़ उतार, पेट्रोल चे दर आणि काय काय. या जगात फुकट ज्ञान फक्त ३ च ठिकाणी मिळत एक सलून मधे, नंतर दारू पिउन पायलट झालेल्या ६० किलो देहरूपी प्लेन मधे, नंतर Non AC ट्रेन मधे. दिसायला ही भव्य रेल आणि लयबद्ध चाल म्हणून हिची दखल बॉलीवुड नि पण लै घेतली. कारण विषय च खोल आहे तसा हिचा.<br>
‎म्हणजे गब्बर आणि ठाकुर यांच्यात गोलीबार कुठे ही झाला असता पण कसाय निवांत ४ उडया मारुन स्टाइल इथच शक्य. ती मलाइका बस वर पण छैय्या छैय्या करू शकली असती पण चुकुन खड्डा आला तर नाचू किती कम्बर लचकली ही लावणी तिथेच झाली असती. दूसर कुठल वाहन घेतल तर जा सिमरन जिले अपनी जिंदगी हा टाइमपास करायला तितका वेळ मिळाला नसता. हम दोनों दो प्रेमी मधे पंचम नी ट्रैन चा आवाज हुबेहुब काढलाय आता हेच ते ट्रक नि गेले असते तर किंकाळी फोडावी लागली असती. मैं हु ना मधला शाहरुख जर टमटम च्या धुरातून जैकेट घालून बैग खांद्याला देऊन उतरला असता तर ते लै गावठी वाटल असतं फराह खान ला. तर बंटी आणि बबली ला पण धड़क धड़क करत पळून जाता आल नसत. असो.<br>
‎पण यात कुठे तरी शिस्त लपलेलि आहे. ही खुप काही शिकवून जाते बहुधा म्हणून उपमा देताना सुद्धा एखाद्या यशस्वी माणसाची गाड़ी रुळावर आली अस तोंडात येत. आणि इंजिनासरख माणसाला माणूस जोड़ा म्हणजे खुप लोकांना घेऊन जाल. हिचा रूट सुद्धा अस दाखवून देत असावा की लाइफ नेहमी सरळ आणि सतत नसते. स्टेशन आल की दोन मिनिट लोकांसाठी थाम्बा आणि पुढे व्ह्या. कधी जंक्शन येईल तेव्हा खुप सारे पर्याय येतील योग्य पाहा आणि कोणाला ही उपद्रव न देता चालत रहा आणि कधी येतो टर्मिनस. तो मार्ग संपला, प्रत्येक वाट पुढे जाण्यासाठी नसते कुठ तरी थांबण आलच.<br>
‎शहरातली लोकल पासून सुरु झालेली ही बया आता मेट्रो किंवा बुलेट ट्रेन रुपात आलिय. झूक झुक आगिनगाड़ी च वय गेल कदाचित पण ते अप्रूप कायम राहणार. जस ‎एखाद्याच्या हॄदयात शिरायचा मार्ग पोटाटून जातो म्हणतात तस ही रागिणी देशाच नस बनत बनत आपल्या नसा नसात भिनली असच वाटतंय.</p>
<p dir="ltr">एक प्रवासी ©Pk</p>
Prasanna Kulkarnihttp://www.blogger.com/profile/16790479522824925011noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-700383533597231797.post-37578774154619922422018-02-14T02:16:00.001-08:002018-02-14T02:16:42.739-08:00दिल्या घेतल्या वचनाची...!!!<p dir="ltr"> <u>एक</u> जोडप पाहिलय, सहवासाचे ५०-५५ वर्ष पुर्ण केलेल.<br>
तारुण्यात घऱट्यच्या काड्या जमवत उन्हात रापलेल.<br>
तर पोरांच्या सावलीत उतावयात हसत खेळत पहुडलेल.<br>
चिंता वाटावी म्हणाव अस कुठेही काही नव्हतं.</p>
<p dir="ltr">  पण आज सकाळी एक भानगड़ झाली. त्यांच्या हाती लागल एक पार्सल, उघडून ठेवलेल. लाल काळ्या कागदानी बांधलेल आणि चॉकलेट न रिबिन्स नी सजवलेल. शिष्टाचाराचे नियम गुंडाळले आणि त्यांनी त्यात डोकावून पाहिल. पार्सल होत नातीच, लवकरच बदलणाऱ्या मधल्या नावाकडून आलेल. तिन पण न संकोचता आणि खुशित दाखवला ड्रेस, फ़ोटो कोलाज च ग्रीटिंग, सोबत पार्सल मधे टिकेल असा artificial गुलाब असावा.<br>
हे सम्पतय न सम्पतय तोच नातू ही आला थोड्याश्या घाईत.<br>
आज ऑफिस मधे पार्टी आहे. ड्रेस कोड असा आहे. आपल्याला सालसा करायच्या आहे. Etc etc etc.<br>
त्यांनी वाचल होत सकाळीच पेपर मधे आज valetine day आहे. पण त्याचा अवाका इतका मोठा आहे हे तिसऱ्या पिढिकडून कळल होत.<br>
     आता मात्र ते खुप नाराज झाले.  गूढ़ विचारात जाऊन आले. आजी च्या बाजूला ते शांत पणे जाऊन बसले. शब्द जोड़ले २ मिनिट आणि मग बोलते झाले.</p>
<p dir="ltr">"५०-५५ वर्ष झाली नाही ना लग्नाला आपल्या..?"</p>
<p dir="ltr">"हे ५३ व हो. वर्ष तितक आठवत. तारखांच कौतुक थोड़ी होत आपल्या वेळी"</p>
<p dir="ltr">थोडेसे हसत " ते खरच म्हणा. पण तरी मला आज एक प्रश्न पडलाय. पण कदाचित तू हसशील म्हणून गप्प होतो"</p>
<p dir="ltr">" प्रेमाच माप काकण भर ही कमी नाहिय दोघांच. पण व्यक्त करण्यात कुठे कमी पडलो का आपण? हाच ना प्रश्न?" टप्पा पडायच्या आतच आजीनी उचलून सिक्स मारला होता.</p>
<p dir="ltr">"मला जे सांगता येत नव्हत ते नेमकया शब्दात कस मांडलस? मुळात कळल कस?"</p>
<p dir="ltr">"५३ व. वर्ष आहे म्हणल. स्वतः ओळखत नसाल तितक ओळखून आहे तुम्हाला. एकेक वस्तु पाहताना त्या आपल्यात शोधायचा बालिश पणा तुम्हीच करू शकता."</p>
<p dir="ltr">"असेल तस. पण साधारण खीसा आणि लोक काय म्हणतिल मधे खुप काही राहून गेल."</p>
<p dir="ltr">"वय दिसतय आता बहुतेक. विचार करा थोडा. अहो मला मोगर्याचा वास आवडतो. अत्तरापासून धूप पर्यन्त सगळ मोगरा आणाायचा तुम्ही. नको म्हणायची वेळ आली. काही रुपये वाचायची बोम्ब होती त्यात arrears मधून काढलेली पैठणी पाहा आतल्या कपाटातली. अजुन कोणाला हात नाही लाउ दिलाय. आणि तुम्ही या गुलाबानी न ड्रेस नी चिंतित झालात."</p>
<p dir="ltr">"खरच की. आणी टिफ़िन देताना. त्यात येणाऱ्या चिठ्या तर कमाल. Dr नी गोळी बदललीय. नीट पाहुन घ्या. येताना हे आणा ते आणा. आज उपवास आहे. चुकुन पान शेप नका खाऊ फ़राळा नंतर. ही काळजी च्या चिठ्या सुद्धा मला greetings पेक्षा कमी नाही बर का. हा हा हा"</p>
<p dir="ltr">प्रश्न राहिला व्यक्त होण्याचा. तुमचे टोळ भैरव मित्र कंपनी नी आग्रह केल्यावर तुम्ही म्हणलेल ते एक गाण मला आयुष्यभर पुरेल-<br>
"दिल्या घेतल्या वचनाची शपथ तुला आहे." दोघ गुणगुणले</p>
<p dir="ltr">"आता सांगा आपण कुठे व्यक्त होताना कमी पडलो. यांची अजुन सुरवात आहे. आपल लोणच ५० वर्ष मुरलय."</p>
<p dir="ltr">"खरय आता जरा बर वाटतंय. मला माझ्या पेक्षा जास्त चांगल हैंडल करणारी तू कुठे सापडली देव जाणे."<br>
चला मी जरा सराव करावा म्हणतो आता."</p>
<p dir="ltr">"कसला..?"</p>
<p dir="ltr">"पोरिच्या लग्नात तुला दूसर गाण ऐकवतो. हम भी कुछ कम नही दाखवतो ना."</p>
<p dir="ltr">सकाळ पासून अये मेरी जोहरा जबी चे सुर घरात कुजबुजत आहेत. ते असेच राहतील काही दिवस बहुधा.</p>
<p dir="ltr">©प्रसन्न कुलकर्णी [PK]</p>
Prasanna Kulkarnihttp://www.blogger.com/profile/16790479522824925011noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-700383533597231797.post-65687382577929753832018-01-15T11:05:00.001-08:002018-01-15T11:05:47.219-08:00सौंदर्य- नजरे पलिकड़चा<p dir="ltr"><br>
खुप दिवसांपासून एक प्रसंग लिहायचा होता. मी बऱ्याचदा कर्वेे रोड-FC रोड- शिवाजी नगर मार्गे जातो. त्यात ही काही वेळा PMT ने पण जातो. एकदा असच बस नी जात असताना एक मुलगी बस मधे चढली. ११ वी-१२ वी असावी फार फार तर. खुप मोठ्यानी बोलत होती. कुठे उतरायच, कोणता स्टॉप येणार वगेरे. मागे वळून पाहिला तर ती अंध होती. हातात काठी नसती तर अंध आहे हे समजायला वेळ लागेल इतका सहज वावर होता. भरगच्च गर्दी मधे आपला रस्ता काढत कुठे तरी ज्ञानेश्वर पादुका चौकामधे उतरली असावी. नंतर त्याच आठवड्यात मी गाडीवर जात असताना सिग्नल ला होतो तेव्हा ती मैत्रिणींसोबत रिक्षात बसत होती. पण आता अवतार जरा वेगळा होता. Traditional Day वेगेर कॉलेज मधे असावा. व्यवस्थित functional पंजाबी ड्रेस, त्यानुसार थोड़ा फार make up, लक्षात येतील असे दागिने . पु ल च्या भाषेत सुंदर खाशी सुबक ठेंगणि वेगेर. कदाचित हे सगळ बस मधे carry होणार नाही म्हणून मैत्रिणींसोबत जात असावी. ती निघून गेली आणि सिग्नल सुटला मी ही पुढे आलो होतो.<br>
‎पण तोवर असच डोक्यात चक्र सुरु झाला. सौदर्य कोणाला नाही आवडत. आणि आपल सौंदर्य लोकांना दाखवायच्या आधी प्रत्येक जण स्वताची नजर रोखुन खात्री करुन घेतो एका हक्काच्या ठिकाणी तो म्हणजे आरसा. जिथे प्रत्येक जण स्वता पुरता असतो ती ही फ्रेम. त्यात जास्त choosy असणाऱ्या स्त्री जातीनी तर याचा over utilisation केला. कोणता रंग उठून दिसतो कोणता dull वाटतो. ढोबळ रंग सोडून अगदी चिंतामणि, शेवाळी, शेन्द्री, सरबति, करवंदी, पिरोजी ( यातला मला एक ही कळत नाही) याव न ट्याव रंग नजरेत भरून घेतले. माझ्या घरचा अनुभव कोणत्या ही सिरिअल सिनेमा मधे पाहिलेली साड़ी, डेस चा पैटर्न, हिचे इयरिंग, तिच ब्रेसलेट, कोणाच्या घरचे पडदे अगदी त्यांचे आकार उकार सुद्धा बघून सौदर्य मोजल जात हे आठवल. मुलांची पण बात वेगळी नाही. केस, दाढ़ी सॉरी beaard, स्लिम फिट, पेंसिल फिट, लोफर्स, फॉर्मल्स अशा शेकडो गोष्टी.ज्यांच् समाधान स्वता नजरेत घेतल्या शिवाय होणे नाही. मी कशी दिसते, मी माझ्याच नजरेत भरते का, हे स्वतःला समजल्याशिवाय पुढे पाउल पडत नाही.<br>
‎इथे काहीच नाहिय अस. ही मुलगी तयार झाली पण दुसऱ्या कोणाच्या तरी नजरेतुन. सगळे रंग आहेत अंगावर पण ते खुलत आहेत की नाही हे कोणी दुसर्यानी ठरवलय. काळा सोडून जिला कोणताही रंग माहीत नाही, पण बाकी लोकांनी ज्या ४ कंप्लीमेंट्स देतील त्यात तिला समजल. त्यांच्या विश्वासावर न पाहिलेल सौदर्य carry केल. तरीही तिचा वावर तितकाच सहज होता मग ती साधारण असून ही उगाच जास्त सूंदर वाटली. कारण पदोपदी ज्या आरशावर आपण अवलंबून होतो त्याची किम्मत शून्य केली तिने.<br>
<br>
‎" आयना तो खामखा मशहूर हुआ है,<br>
‎ की वो सच और असली रंग दिखाता है,<br>
‎लेकिन वही धोखेबाज है, दाये को बाए करता है,<br>
‎धूल उसपर हो तोभी चेहरा अपना खराब दिखाता है"<br>
<br>
झाला चांगला भाग पण थोड़ी नजर हवीच सौदर्याला. कारण जग जितक सूंदर आहे तितके विद्रूप आहे. नजर सांगून जाते टक लाऊन पाहणारे डोळे खरच भाळले गेलेले आहेत की वखवखलेले आहेत. नजर दाखवून देते की समोरचा बोलतोय मानानी की कुत्सित पणे. अगदी Yes I Feel safe with you किंवा आपल्या औक़ातित राहायच हे दखवायला ही कामी पडतेच. हे सगळ कस मैनेज करत असेल ती असा एक विचार मनात येऊन गेला. <br>
पण एक कळून चुकल सौदर्य सगळी कड़े आहे. आपण कोणाच्या नजरेतुन बघतो त्यातून ते दिसत.</p>
<p dir="ltr">मग ती शायरी आठवली-<br>
"अच्छे ने अच्छा है जाना मुझे,<br>
बुरे ने बुरा है माना मुझे,<br>
जिसकी नजर की जैसी फितरत थी,<br>
‎उसने वैसे पहचाना मुझे"</p>
<p dir="ltr">©प्रसन्न कुलकर्णी [PK] </p>
Prasanna Kulkarnihttp://www.blogger.com/profile/16790479522824925011noreply@blogger.com1tag:blogger.com,1999:blog-700383533597231797.post-82364609709317804002017-12-25T11:10:00.001-08:002017-12-25T11:10:05.412-08:00राजकारणी- पण राजकारणा पलिकड़चा<p dir="ltr"> <u>आपल्याकड़े</u> माणूस कोणत्याही पातळी चा असो. मग ते पदवीधर, नोकरदार, व्यावसायिक, विद्यार्थी, कलाकार, तांत्रिक, संशोधक अगदी मग दाढ़ी करणारा, पंक्चर वाला, भाजीवाला त्याही पुढे जाऊन काही येत असो किंवा नसो पण राजकारण सगळ्यांचा आवडता विषय. जो माणूस घरी जाऊन बायको च्या हातात रिमोट पाहुन बातम्या बघायचा प्लान cancel करतो तो विरोध पक्ष आक्रमक हवा म्हणून अक्कल झाड़तो आणि ज्याच M3 निघायची मारामार ते बजेट मुळे देशावर कर्ज वाढल याच गणित पाजत असतो.<br>
        अशा या राजकारण प्रेमी देशामधे कित्येक राजकारणी आले, येतील आणि जातील पण आपल्या नेहमीच्या राजकारणासोबत वेगळ्या गुणा मूळ काही लोक छाप पाडुन जातात मग त्या पक्षाची भूमिका पटेल न पटेल पण तो माणूस मन जिंकून जातो. माझ्या यादिमधे रोखठोक बाळासाहेब ठाकरे, वक्ता राज ठाकरे, अफाट जनसम्पर्क विलासराव देशमुख, दूरगामी प्रमोद महाजन, प्रणव मुखर्जी , मुंडे साहेब हे सगळे पक्षाचे आहेत पण यांनी सगळ्यांच प्रेम कमवल. असाच एक माणूस ज्याने राजकारण सुद्धा कविते इतकेच अलंकारिक केल आणि नेतृत्वाचा पाया रचला तो म्हणजे 'अटल बिहारी वाजपेयी'.<br>
        ‎यांच्या विषयी मी काही लिहाव इतकी मला माहिती ही नाही आणि माझी लायकी ही नाही. शाळेत काहीही कळत नसताना आपले पंतप्रधान कोण यावर दिलेले उत्तर सोडून माझा काही संबंध ही नाही. मग हळू हळू जेव्हा standup Comedians यांच्ये pauses घेऊन नक्कल करायला लागले तेव्हा यूट्यूब पाहिला तेव्हा विलक्षण प्रभाव पाडुन गेला हा व्यक्ति. मग विकिपीडिया, यूट्यूब, गूगल च्या कित्येक लिंक्स पाहिल्या गेल्या. आणि एक आदर निर्माण झाला. कारण माझ अस स्पष्ट मत होत की भाजपा सारखा पक्ष सता मिळवू शकेल एकवेळ पण कांग्रेस इतक पचवू शकणार नाही. अशा या नेतृत्व ची गरज असलेल्या पक्षाला दिशा आणि ताकद दिली अटल जी नी.<br>
संसदेमधे गोंधळ, बहिष्कार, आरड़ा ओरडा असताना आपला मुद्दा कसा मांडवा यामुळे उत्कृष्ठ संसदपटु हा मान यांना मिळाला. नेता या सोबत प्रभावी कवि अशी ओळख <br>
ज्याची आजहि आहे. त्यांची एक कवितेमधे ओळ होती-</p>
<p dir="ltr">जो कल थे, वे आज नहीं हैं।<br>
जो आज हैं, वे कल नहीं होंगे।<br>
होने, न होने का क्रम, इसी तरह चलता रहेगा,<br>
हम हैं, हम रहेंगे, यह भ्रम भी सदा पलता रहेगा।</p>
<p dir="ltr">या ओळी प्रमाणे सत्ता आल्या आणि गेल्या ही. पण हे हरले नाही. पहिल सरकार १३ दिवसात तर दूसर १३ महिन्यात पडल. नंतर जनतेच्या आशीर्वादनी तीसरा टर्म मात्र ५ वर्ष पूर्ण केला. आणि काळ पूर्ण करणारे पहिले बिगर कांग्रेसि सरकार म्हणून नाव चिरकाळ टिकल.</p>
<p dir="ltr">जिथ पक्षाचे फक्त २ खासदार होते तेव्हा पासून खांद्यावर पक्ष हातात घेतला. पद सम्भाळली त्यात बाबरी , गोधरा, हाईजैक केलेला विमान, संसद हल्ला असें नाजुक विषय आले. कारगिल नंतर त्यांनी पाकिस्तान ला उद्देशुन कविता केली होती. त्याच्या ही ४ ओळी अवडलेल्या-</p>
<p dir="ltr">'पर तुम क्या जानो आजादी क्या होती है<br>
तुम्हें मुफ्‍त में मिली न कीमत गई चुकाई<br>
अंगरेजों के बल पर दो टुकड़े पाए हैं<br>
मां को खंडित करते तुमको लाज न आई।'</p>
<p dir="ltr">सोबतच एकीकडे लाहौर बस सेवा सुरु करुन दोस्तीचा एक हात त्यानि पुढे केला होता दुसरी कड़े पोखरण ची दूसरी चाचणी करुन इंदिरा गांधीचा बुद्ध पुन्हा हसवला होता.</p>
<p dir="ltr">सत्तेची भूक नसते कारण स्वार्थ कोनासाठी करणार? मागे पुढे कोणी नाही. असतात काही लोक वेडाने झपाटलेली. समजाने प्रेम कराव अशी आणि विरोधकानी दाद द्यावी अशी. वाढ दिवसानिमित्त २ शब्द. शेवटच्या त्यांच्या ओळी ज्या कायम ओठावर येतात-</p>
<p dir="ltr">बाधाएं आती हैं आएं<br>
घिरें प्रलय की घोर घटाएं,<br>
पावों के नीचे अंगारे,<br>
सिर पर बरसें यदि ज्वालाएं,<br>
निज हाथों में हंसते-हंसते,<br>
आग लगाकर जलना होगा.<br>
कदम मिलाकर चलना होगा.</p>
<p dir="ltr">तेच म्हणाले होते एकदा You can be ex prime minister one day, but you can't be ex poet</p>
<p dir="ltr">©प्रसन्न कुलकर्णी [ PK]</p>
Prasanna Kulkarnihttp://www.blogger.com/profile/16790479522824925011noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-700383533597231797.post-34184324888318813242017-12-10T06:34:00.001-08:002017-12-10T06:34:24.657-08:00Change is Permanent 2017<p dir="ltr">Change is Permanent-Timeline Reviews<br>
<br>
काही वर्षापूर्वीची गोष्ट. माझ्या कड़े एक Key Chain होत, हुक असलेले. आणि एक पेन होत खटका दाबायच. दोन्ही गोष्टी फार यूनिक आणि महाग होत्या का तर अजिबात नाही. किम्मत दोन्हीची प्रत्येकी २०-२५ फक्त. पण कित्येक वर्ष त्या माझ्या कड़े होत्या. ते हुक च Key Chain पँट च्या लूप ला लावायच आणि पेन खिशाला. आणि आजुबाजुच्या लोकांना इतकी सवय झाली होती ते पाहुन. मग ते हरवायच ही नाही. मी कुठे इकडे तिकडे जरी ठेवल तरी ते माझ आहे म्हणून लोक मला आणून द्यायचे. तेव्हा माझी बहिण मला म्हणाली होती.<br>
‎<br>
" तू इतका बोर आहेस माहिती का? पेन आणि Key Chain जपायची गोष्ट आहे का? नवीन नवीन ट्राय कराव. तुला जुन्या गोष्टी वापरायला काय आवडत?"</p>
<p dir="ltr">"अस काही नाही. बदलेन कि कंटाळा आला की. पण आता उलट होत. १-२ महीने पुढे गेल आणि की स्वतःला च वाटत अरे अजुन आहे हे. बघू किती जात."</p>
<p dir="ltr">मला वाटलच तिला हे बोर वाटेल पण नंतर ती जे बोलली ते मला विचार करायला लाऊन गेल. ती म्हणे-</p>
<p dir="ltr">"Actullay मला आवडलय हे. मला पण माझी एखादी अशी वस्तु personalise करायचीय. त्या वस्तु साध्या का असेना पण त्या आपल्या आहेत अशी एक ओळख भारी वाटते. जस अण्णा च घड्याळ असेल, आजीचा बटवा असेल, बाबांच मफलर असेल. किती क्षुल्लक आहेत पण आठवत तस यांच्या कड़े च आहेत जशा आहेत तशा."</p>
<p dir="ltr"> खर तर इतका विचार करुन मी काहीच केल नव्हतं. पण खरच खुप वर्ष झाली की काही गोष्टीची सवय होऊन जाते. Emotions वगैरे नसतात पण जितक जून होत जात तितकी Comfort वगैरे आलेला असतो. 'जुने जाउ दया मरणा लागुुनी' असेल पण काही गोष्टी जुन्याच आवडतात.'<br>
हे अस कित्येक वस्तुंसोबत झालाय.लहान पणी ची खुर्ची असेल किंवा पाटी पेंसिल ची पाटी. आता आत्ता पर्यन्त होत्या या. तसाच आपला आफिस, बसायच्या जागा, लोक. चांगल असो वाइट् असो सवय होत जाते. प्रत्येक बदलणार कैलेंडर च पान यांच्या सोबत बॉन्डिंग वाढवत जातो. नंतर कधीतरी त्या कधीतरी खराब होतात, आपल अरेरे अस होत आणि आपण त्याला रिप्लेस करुन पुढे जातो कारण Change is the only permanent and useful coz habits are so cruel...!! बदल होत च असतो आणि हवाच.<br>
आज हे आठवायच कारण म्हणजे कालपासून सगळ्यांचे २०१७ चे time line review पाहतोय. मी पण पाहिला माझा. ८५ नवीन मित्र आले. लोकांनी फोटोज, पोस्ट् आणि कमेन्ट्सना सगळे मिळून ५००० च्या जवळ दाद दिली. यामुळ लिहायला प्रोत्साहन मिळाल. त्या नवीन लोकांपैकी खुप लोकांच् अफाट लेखन पाहायला मिळाल. पण तो review शेयर कराव अस नाही वाटल. कारण फेसबुक नी फक्त virtual जगातल चांगल चांगल दाखवल. इतर ही खुप चांगल्या गोष्टी ज्या offline अनुभवल्यात. किंवा काही कड़वट गोष्टी. लहान पणा पासुन ज्याना पाहत पाहत खुप गोष्टी शिकलो असा एक माणूस जग सोडून गेला. वय झाल होत जाणार च पण तरी थोड काहीतरी सुटल अस वाटत राहत. काही अफाट लोक आली ज्यांच्या मुळे नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. थोड्या फार ईगो मुळे काही दुरावली हि गेली.<br>
‎आता हे लिंक करायच कारण म्हणजे पुन्हा कैलेंडर बदलतय. पुन्हा तेच सण वाढदिवस सगळे days येतील. प्रत्येक वर्षाप्रमाणे आफिस कॉलेज इतर असे अनेक लोक त्यांच्या सोबत च्या सवयी चेंज होतील. पण काही लोक आणि त्यांच्या मुळे नवीन मिळालेल्या गोष्टी किंवा स्किल या कित्येक वर्ष त्या Key Chain आणि पेन सारख्या जवळ राहोत असा च प्रयत्न असेल. Personalisation हवच.<br>
दूसरा श्रीमन्त व्यक्ति Warren Buffet च एक वाक्य आणी सवय पण आहे, "My Favourite holding period is forever." मग shares असो किंवा काही ठराविक गोष्टी किंवा माणस सुद्धा.<br>
हे खरच confusing आहे. आपण म्हणतो Change is only permanent आणी Holding forever सुद्धा. यातल काय चेंज करायचा आणी काय ठेवायच हे जमल की लाइफ झिंगा ला ला....!!!</p>
<p dir="ltr">©प्रसन्न कुलकर्णी [PK]</p>
Prasanna Kulkarnihttp://www.blogger.com/profile/16790479522824925011noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-700383533597231797.post-67187611887242233282017-11-18T23:06:00.001-08:002017-11-18T23:06:53.603-08:00दशक्रिया (अंध) श्रद्धेची आणि (अंध) विश्वासाची<p dir="ltr"> आपली एक साधारण गोष्ट आहे भारतीय लोकांची. आपल्याकडे मूल जन्म घेत. त्याला काही दिवस लोकांना दाखवल जात नाही. नजर लागेल म्हणून किंवा आणखी काही असेल तर. ५ व्या दिवशी सटुआई येऊन आपल्या कपाळावर आपला नशीब लिहून जाते. मग त्याची कुंडली बनते जन्मानुसार त्यांची रास गोत्र नक्षत्र चरण सगळ ठरत. त्याची पत्रिका बनवून घेतली जाते. मूल मोठ होत जात. हिन्दू असेल तर मुंज , मुस्लिम असेल तर सुंता होते. पुन्हा तो शिकला मोठा झाला घर बांधतो त्यात आपण च पाहतो kitchen कुठे असाव, कुठे मास्टर बेड असावा वेगेर. मग लग्न होत. कोणाचा मंगळ शनि राहु आहे कुठल्या स्थानी काय आहे हे शोधल जात मग दिवस शोधला जातो. लग्न देवा ब्राह्मणा साक्षी नेच होत असा नाही पळून जाऊन होते, घरगुती हार घालून होत, रजिस्टर ही होते, धर्म बदलला तर कबुल है आणि I Do म्हणत ही लग्न होत. नाहीच तर लिव इन राहता येत. सम्पूर्ण जगाला प्रजनन अर्थात रिप्रोडक्शन सिस्टम माहीत आहे पण आपल्याला मुलगा हवा असतो किंवा सासुला पाळणा हवा असतो मग नवस बोलले जातात अंगारे धुपारे होतात आणि त्यामुळेच मूल देखील होतात म्हणे. हे झाल life cycle च. या सोबत माहीत ही गणपती होता कि fictional character आहे पण मनोभावे पूजा होते, . कोणी १५ दिवस चालत गेल म्हणून विठ्ठल स्वताच दर्शन सुद्धा देत नाही. की तुम्ही केस दान केले म्हणून तुम्हाला बालाजी मंदिरात काही मिळत नाही, चप्पल सोडली तर देवी तुमच्या घरी येत नाही. यात प्रत्येकाची श्रद्धा आहेच अस नाही. ज्याची आहे तो करतो ज्याची नाही तो नाही. ज्याला नाही त्याला कोणी जबरदस्ती केलेली नसते. निदान अस ऐकिवात ही नाही कुठे.<br>
    ‎ आता थोड निट पाहिला तर कळेल पत्रिका काढणे लग्न मुंज विधि करा म्हणून कोणीही सांगायला जात नाही पण ९०% लोक मनोभावे सगळ करत असतात फक्त ब्राह्मणच नाही, याचा अर्थ श्रद्धा तर सगळे ठेऊनच आहेत. पण ब्राह्मण लुटतो हा जो प्रचार चालू आहे तो अगम्य आहे. थोताण्ड असेल तर करू नये आणि विश्वास असेल तर स्वतः कराव किंवा आपल्या जातितल्या जाणकार लोकाकडून करुन घ्याव कोणी ब्राह्मण त्याला अडवणार नाही. जरी ५ मिनिट मानल की ब्राह्मण लुटतो तर गांधी च वाक्य आहे- 'अन्याय करणाऱ्या पेक्षा सहन करणारा मूर्ख' तसच सरकारी अधिकारी माजतात ते लाच मिळते म्हणून नाही तर लोक लाच देतात म्हणून. साध सरळ गणित आहे जे स्वतः या गोष्टी मानत नाहीत म्हणून कमीत कमी गोष्टी पाळणारे १०० ब्राह्मण दाखवतो तुम्ही मला ब्राह्मण लुटतो म्हणून दूसरा पर्याय तयार करणारे १० इतर दाखवा.<br>
    ‎ आता प्रश्न दशक्रियेचा. आपल्या कड़े plan cheat करणारे आहेत जे मेलेला आत्मा का काय खाली बोलवतात म्हणे, भानमती होते म्हणे, इतकच काय तर आत्मे भटकत बिटकत असतात म्हणे. किती लोकांनी पाहिला आहे ? १% बाकी ९९% लोकांना माहीत ही नसेल असला काही. यापेक्षा प्रामाणिक पणे श्राद्ध पक्ष करुन आपल्या आई बापाची आठवण काढली तर वाइट काय असाव. ठीके नाही विधि म्हणून नाही तर हे सूंदर आयुष्य त्यांच्यामुळे मिळाल म्हणून Thanks Giving Day म्हणा हव तर. तरीही नाहीच काही इच्छा तर नका करू दशक्रिया. पण कोणी एका जातीने इतका Influence करावा इतकी संख्या ही नाही ब्राह्मण लोकांची. निसर्गाची कमाल आहे त्यानि या शरीरात आत्मा नावाच सिम कार्ड घातल. त्यानि ते जगु लागल. ते काम कस करत हे संशोधकाना पण जमल नाहिय. ७०० कोटि लोकांची चेहरेपट्टी ठसे वेगळे कसे आपोआप थोड्या फार फरकाने स्त्री पुरूष संख्या सारखी असते कारण गरजा सगळ्या पुर्ण व्हाव्यात पण हे Manage कस होत यात Science आहे तस निसर्ग आहे , अफाट शक्ति आहे. कुठे ना कुठे ही शक्ति आणि Science भेटत च. आस्तिक आणि नास्तिक एका बिंदु पाशी Cross होतात च. फरक इतकाच की रस्ते आणि चश्मे वेगळे असतात. उदाहरणार्थ-<br>
    ‎गीतेच्या २ अध्यायामधे २२-२३ वे श्लोक आहेत-<br>
नैनं छिन्दन्ति शस्त्राणि, नैनं दहति पावकः,<br>
‎न चैनं क्लेदयन्त्यपो न शोषयति मारुतः||<br>
याचा अर्थ शरीर जस जुने कपड़े टाकून देत तसा आत्मा जून शरीर सोडून नवीन धारण करते. आणि तो न जळणारा, न मारता येणारा असा अवध्य आहे तो फक्त बदलला जातो मारला किंवा निर्मिला जात नाही</p>
<p dir="ltr">आणि आत्मा म्हणजे Soul ही शक्ति कोणालाही कळली नाही. पण शेवटी शक्ति चे गुणधर्म तर सारखेच ना मग आठवते शाळेतला Energy चा नियम-</p>
<p dir="ltr">'Energy can neither be created nor be destroyed but it can be transformed from one form to another. This is exactly what happens everywhere in the universe.'</p>
<p dir="ltr">याचा अर्थ काय तर तोच नैनं छिंदन्ती चा.  यात आपल्याला जी गोष्ट ज्या चश्मयातून दिसते तशी पाहवी आणि जे पटत तशी पाळावी. पण यासाठी कोणा जातीला बदनाम करू नये ही इच्छा</p>
<p dir="ltr">©प्रसन्न कुलकर्णी[PK]</p>
Prasanna Kulkarnihttp://www.blogger.com/profile/16790479522824925011noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-700383533597231797.post-30489179361665917962017-09-15T00:54:00.002-07:002017-09-15T00:54:35.886-07:00Engineers Day- एक धर्म <div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<span style="background-color: #fafafa; color: rgba(0, 0, 0, 0.87); font-family: "Roboto Slab", "Times New Roman", serif; font-size: 14px; font-variant-ligatures: none; text-align: start; white-space: pre-wrap;">Engineers Day-</span></div>
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<br style="background-color: #fafafa; color: rgba(0, 0, 0, 0.87); font-family: "Roboto Slab", "Times New Roman", serif; font-size: 14px; font-variant-ligatures: none; text-align: start; white-space: pre-wrap;" /><span style="background-color: #fafafa; color: rgba(0, 0, 0, 0.87); font-family: "Roboto Slab", "Times New Roman", serif; font-size: 14px; font-variant-ligatures: none; text-align: start; white-space: pre-wrap;"> आपला देशाला वेगवेगळ्या जातीं, उपजाती, त्यांच्या परंपरा, संप्रदाय यांचा सहवास कायम लाभलेला आहे. काही पुराण काळा पासून चालत आलेले आहेत तर काही कालानुरूप तयार झाले आहेत. अशीच एक जात म्हणा किंवा समाज किंवा Direct धर्म बिर्म Engineers नावानी भारतात खुप जागा व्यापुन बसला आहे. अगदी लोकसंख्येच प्रमाण वगैरे काढ़लच तर पहिल्या पाचात बसतो की काय अस वाटत. आज त्यांचा दिवस आहे म्हणे विश्वेश्वरैया नामक Engineer च्या जन्मदिवसा निमित्त तो साजरा होतो. अर्थातच बाकी समाजा प्रमाणेच २-४ लोक सोडली तर आपल्या धर्मगुरू च नेमक कार्य सांगू शकेल असे मला कोणी भेटले नाही.</span><br style="background-color: #fafafa; color: rgba(0, 0, 0, 0.87); font-family: "Roboto Slab", "Times New Roman", serif; font-size: 14px; font-variant-ligatures: none; text-align: start; white-space: pre-wrap;" /><span style="background-color: #fafafa; color: rgba(0, 0, 0, 0.87); font-family: "Roboto Slab", "Times New Roman", serif; font-size: 14px; font-variant-ligatures: none; text-align: start; white-space: pre-wrap;"> असो, मुद्दा काय आहे की आज यांचा दिवस आहे. तसा अत्यंत बंडखोर, शौकीन आणि तितकाच तंत्रज्ञानप्रिय मित्र प्रेमी समाज आहे. बाकी समाजाप्रमाणे यांच्याही चालिरीति, आणि रिवाज आहेत. यांची सकाळ ही कॉलेज च्या एक तास आधी होते मग वेळ काहीही असो आणि रात्र १-२ च्या पुढे कधी ही. कायम समुहासोबत राहायची आवड़ असणाऱ्या यानी एकमेका सहाय्य करू अवघे धरु सुपंथ जास्त लोकप्रिय केल मग कधी sem मधे किंवा अटेंडेंस वर का असेना. समानतेवर पण यांचा भयंकर विश्वास आहे म्हणून हे Assignment, Practicals सुद्धा समान दिसावे म्हणून एकाच सगळे Follow करतात, पण हे क्रूर जग त्याला कॉपी म्हणत. हा पण ग्रुप प्रिय असल तरी यांच्यात गटबाजी मात्र फार होते मग त्यात राडे असो किंवा HOD किंवा Faculty समोर Credit, अगदीच एखाद्या मस्तानी साठी रांझा आणि मजनू चा सुद्धा पंगा शक्य.</span><br style="background-color: #fafafa; color: rgba(0, 0, 0, 0.87); font-family: "Roboto Slab", "Times New Roman", serif; font-size: 14px; font-variant-ligatures: none; text-align: start; white-space: pre-wrap;" /><span style="background-color: #fafafa; color: rgba(0, 0, 0, 0.87); font-family: "Roboto Slab", "Times New Roman", serif; font-size: 14px; font-variant-ligatures: none; text-align: start; white-space: pre-wrap;"> हा झाला विनोदाचा भाग, पण आपला देश अविकसित पासून विकसनशील झाला यात यांचा वाटा सर्वात जास्त आहे. स्वतःच्याच क्षेत्रात अस नाही जिथे आवड़ असेल तिथे धड़पडून यांनी काम केली. विजय केळकर, नारायण मूर्ति सारख्या Engineer नी भारत स्वबळावर चमकवला तर जिथे चालत माणूस जाताना हवा जाते तिथे कोंकण रेल्वे चालवली याचे दाखले अजुन दिले जातात. तर रघुनाथ माशेलकर सारख्या engineer नी हळद नावाची गोष्टीच्या petant साठी अमेरिकेशी भांडण केल. आज इस्त्रो च्या शरपेचात वेगवेगळे मानाचे तुरे खोवले जात आहेत त्यातही यांचा वाटा सिंहासारखा आहे हेच खर. खर की खोट माहीत नाही पण बिल गेट्स म्हनाले होते म्हणे की Indian लोकांना मी घेतल नाही तर तिथे दूसरी माइक्रोसॉफ्ट तयार होऊ शकते. दुर्दैव इतकच की आज खुप Engineers ज्यांना उद्योजक व्हायच आहे. पण इथला जात पात आणि राजकारण त्याना टिकू देत नाही मोजके लोक मात करू शकले. आणि अत्यंत स्पर्धेमूळ बेरोजगार सुद्धा जास्त आहेत यातून कस बाहेर पडणार देव जाणे.</span><br style="background-color: #fafafa; color: rgba(0, 0, 0, 0.87); font-family: "Roboto Slab", "Times New Roman", serif; font-size: 14px; font-variant-ligatures: none; text-align: start; white-space: pre-wrap;" /><span style="background-color: #fafafa; color: rgba(0, 0, 0, 0.87); font-family: "Roboto Slab", "Times New Roman", serif; font-size: 14px; font-variant-ligatures: none; text-align: start; white-space: pre-wrap;"> आता खुप लोकांना वाटेल की हा Commerce चा, याला का पुळका आला Engineers चा. पण मुद्दा असा आहे की माझ्या मित्र, कुटुंब जिकड़े तिकडे या समाजाचे लोक भरलेत, मग पानी मे रहना तो मछलियों का दिल तो सम्भालना पड़ेंगा ना रे बाबा.</span><br style="background-color: #fafafa; color: rgba(0, 0, 0, 0.87); font-family: "Roboto Slab", "Times New Roman", serif; font-size: 14px; font-variant-ligatures: none; text-align: start; white-space: pre-wrap;" /><br style="background-color: #fafafa; color: rgba(0, 0, 0, 0.87); font-family: "Roboto Slab", "Times New Roman", serif; font-size: 14px; font-variant-ligatures: none; text-align: start; white-space: pre-wrap;" /><span style="background-color: #fafafa; color: rgba(0, 0, 0, 0.87); font-family: "Roboto Slab", "Times New Roman", serif; font-size: 14px; font-variant-ligatures: none; text-align: start; white-space: pre-wrap;">बाकी तुम्हाला अभियंता दिनाच्या हार्दिक शुभेच्छा नाही देणार कारण तो काही सण नाही पण तुम्ही उत्तम अभियन्ते व्हा ही सदिच्छा</span><br style="background-color: #fafafa; color: rgba(0, 0, 0, 0.87); font-family: "Roboto Slab", "Times New Roman", serif; font-size: 14px; font-variant-ligatures: none; text-align: start; white-space: pre-wrap;" /><br style="background-color: #fafafa; color: rgba(0, 0, 0, 0.87); font-family: "Roboto Slab", "Times New Roman", serif; font-size: 14px; font-variant-ligatures: none; text-align: start; white-space: pre-wrap;" /><span style="background-color: #fafafa; color: rgba(0, 0, 0, 0.87); font-family: "Roboto Slab", "Times New Roman", serif; font-size: 14px; font-variant-ligatures: none; text-align: start; white-space: pre-wrap;">©प्रसन्न कुलकर्णी [PK]</span></div>
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<br /></div>
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<br /></div>
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhM4xAKZ45tQxEw0pbR7-PkI0xDSgxyjVWNsZYQ4uLH7ZrU2QCfdZhDPpcf8ZRJFnZbsT8h2qh2xgO2rNrp91bG8KSYB7cdM4JlFstgB-rtFVVN4hn-szCSH77O0NI7GB7ISLoVzLkORX6g/s1600/download.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="183" data-original-width="275" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhM4xAKZ45tQxEw0pbR7-PkI0xDSgxyjVWNsZYQ4uLH7ZrU2QCfdZhDPpcf8ZRJFnZbsT8h2qh2xgO2rNrp91bG8KSYB7cdM4JlFstgB-rtFVVN4hn-szCSH77O0NI7GB7ISLoVzLkORX6g/s1600/download.jpg" /></a></div>
<br /></div>
Prasanna Kulkarnihttp://www.blogger.com/profile/16790479522824925011noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-700383533597231797.post-53763124574702856672017-06-07T15:15:00.001-07:002019-06-15T18:07:31.179-07:00Kool सत्यवान आणि हटके सावित्री....!!<p dir="ltr">सकाळी सकाळी न्यूज़ पेपर आणि Mobile वर updates पाहत असताना चहा नाश्ता समोर आला....आणि एकदम तो बिचकला-</p>
<p dir="ltr">तो:- आईच्या गावात....!!!! अग काय आहे हे? पंजाबी ची मारामार तुझी न हे काय? आज काही प्रोग्राम आहे का?  मला कोणी काही सांगत का नाही? एक चिमटा काढ़ पटकन....</p>
<p dir="ltr">(त्याला आवड़णारी आईची काठा पदराची इरकल साड़ी, नव्या लक्ख बांगडया, आजिची नथ जी आई कायम घालायची, सुवासिक गजरा, नवीन Brand चा परफ्यूम आणि हलकसा केलेला Touch up अस आरसपानी रूप बघून याला कळत नव्हतं....तितक्याच प्रेमानी एक चिमटा त्याला काढला गेला)</p>
<p dir="ltr">तो:- अरररर अग हळू बावळट...!!</p>
<p dir="ltr">ती:- तूच म्हणालास आता हळू का? आणि आज काहीही प्रोग्राम नाहिय. वट सावित्री पौर्णिमा आहे. So मी आई सोबत पुजेला जात आहे...!!</p>
<p dir="ltr">तो:- ऐ हा... तू जा..पूजा कर...नो प्रॉब्लम. पण plz तू असा नको म्हणू की ते ७ जन्म बिन्म तू मला मागणार आहेस. इतका नाही झेलणार काय मी? एकच पीस नको मला तितके जन्म. 😛</p>
<p dir="ltr">ती:- plz ७ जन्म तू मिळाला तरी नकोयस मला. मला पण variety पाहिजे यार. आधीच खुप लोकांना Sacrifice करुन हो बोलले तुला. सारख तेच नाही करणार मी. <br>
Cool बंदा हरीश, Businessman दीप, physic oriented राघव आणि स्कूल पासून चा मित्र नीरज यांना धूड़कवून तुला पकड़ल आहे. अगले जन्म इनमेसे कोई फिर आजाये...हीहीही</p>
<p dir="ltr">तो:- Exactly....मी पण Natural Cute असलेली नेहा, सिंगर मधुरा , वेस्टर्न लुक्स नी धुर करणारी ईशा सोडून तुला पकड़ली. हर बार उनका दिल नही दुखाना है मुझे भी. सो ७  जन्म सोडून हव ते कर. </p>
<p dir="ltr">ती:- त्यांना मरु दे...या जन्मात तरी मी बायको आहे न. जरा बाबांकडून शिक आइंसाठी ते गुलाब जामुन आणायला गेलेत. आणि माझी पाहिली पौर्णिमा आहे. तू वर्क फ्रॉम होम साठी घरिच आहेस तरी बसला आहेस म्हशापुरा... शी. </p>
<p dir="ltr">( इतक्यात आईची एंट्री)</p>
<p dir="ltr">तो:- आई, सावित्रीनी तर सत्यवान चा जीव वाचवला होता ना ग? ही वाईट चिमटे काढून हल्ला करतेय बघ. काय उपयोग व्रताचा?</p>
<p dir="ltr">आई उवाच:- आठवड्यात रोज़ पेग मारणारा तू आज महिन्यात २ दा पितो, किती वेळा तुला भरधाव गाड़ी वरुन पडून आम्ही उचलून आणायचो, लास्ट पडून आता ६ महीने झाले,  प्लान न करता पैशाची किती गोची करायचा तू आता न चुकता FD, mediclaim चे हफ्ते भरतोस, attitude बाजूला ठेवून माणस किती ओळखत आहेस. हे सगळ मला नाही जमला या पोट्टील्ला जमला. फक्त जीव वाचवणारी नाही तर असलेल जीवन सूखकर करणारी पण सावित्री असते सो रडू नका. तू लढ़ ग मी आहे.</p>
<p dir="ltr">(१० मिनीट विचार करुन झाला की तिला याचा व्हाट्स एप्प  येतो)</p>
<p dir="ltr">"ए ऐक ना, ते खर असतं का खोट माहीत नाही. पण तू ते ७ जन्म वाल मागितल तरी चालेल मला. त्या मधुरा नेहा ईशा पेक्षा तू चालेल मला नंतर पण. बरी आहेस तू तशी."<br>
( हिला आला जिंकल्याचा feel)</p>
<p dir="ltr">त्या विचारात ती आई ना<br>
ती:- आई, मी अबोली रंगाची साड़ी Dryclean साठी काढून ठेवलेली पण त्या ऐवजी ही इरकल कशी आली Dryclean होऊन. तुम्ही बदलली का चुकुन?</p>
<p dir="ltr">मधेच बाबा उवाच:- साडी च नाही सगळ बदला बदली होतय. कारण मिठाई वाला आपल्या चिरंजीवांचे दोस्त आहेत. आणि त्याला कालच व्हाट्स एप्प गेलय बाबा गुलाब जाम घ्यायला येतील एक किलो. पण अर्धा किलो गुलाब जाम आणि अर्धा किलो अम्र खंड हेच द्यायचा काहीही होवो. आणि advance पण दिला गेलाय. आता कळल याच वर्क फ्रॉम होम का ते?</p>
<p dir="ltr">( आणि आता ती आपण हरल्याच्या खुशित त्याच्या जाऊन बोलणार इटक्यात)</p>
<p dir="ltr">तो:- काही नको बोलू. I know तुला सुद्धा चालणार आहे मी ७ जन्म ते. अम्रखण्ड काढ़ लवकर plzz आता....!!</p>
<p dir="ltr">२१ व्या शतकातली साता उत्तराची कहाणी पाचाउत्तरी  सूफळ संपूर्ण...!!!</p>
<p dir="ltr">© प्रसन्न कुलकर्णी [ PK]</p>
Prasanna Kulkarnihttp://www.blogger.com/profile/16790479522824925011noreply@blogger.com1