थोडा है बस थोडे की जरुरत है....!!!

         कालपासून ST महामंडळाचा पुन्हा एकदा वेतन वाढी साठी संप सुरू झाला. २०१७ च्या दिवाळी मधे या संपामुळे संपकरी, सरकार, पोलीस यंत्रणा आणि मुख्य म्हणजे `सामान्य नागरिक` सगळेच अक्षरशः वैतागून गेले होते. एक महत्वाची विनंती अशी की `सामान्य नागरिक` हा शब्द ते काय बोल्ड, इटालिक आणि अंडर लाईन का काय असत ना तस करून लक्षात ठेवां बर का...!! कारण कस आहे नेहमी आपण सामान्य नागरिक हा शब्द साधारण आर्थिक निकषांवर मध्यमवर्गीय आणि त्या खालचे असे घेतो पण इथे आर्थिक पेक्षा भौगोलिक निकष अभिप्रेत आहेत. म्हणजे महाराष्टातील जिल्हे, तालुके आणि त्यानंतर काही मोठी गाव सोडून इतर ठिकाणी राहणारी सगळी मंडळी म्हणजे सामान्य नागरिक. ज्यांच्या कडे स्वतःचे ४ चाकी वाहन नाही ते सगळे. आता लोक म्हणतील काय इतकं चिरफाड `सामान्य`तेची त्याच कारण एक पुण्याचे सद्गृहस्थ , ज्यांच्या मते ते महाराष्ट्र, भारत फिरले आहेत आणि दुनियादारी ची बरी जाणं आहे त्यांना.
      झालं असं की मागच्या  दिवाळीत आमची भेट झाली होती तेव्हा हा संपाचा विषय निघाला त्यात त्यांची पहिली २-४ वाक्य अशी होती की -
"राजकारण करतात साले...यांच्या कामगार संघटना भरवतात यांना. त्यांचे नेते आणि विरोधक यावर पोळ्या भाजून घेतात. त्यांना म्हणावं करा संप काहीही फरक पडत नाही. तसाही आजकाल बस च्या लाल डब्यात जातय कोण? मला नाही आठवत मी गेल्या २० वर्षात बस मधे पाय ठेवलाय. ट्रॅव्हल्स, ट्रेन्स, गाड्या इतक्या सोयी आहेत च की. लोकांना ब्लॅक मेल केलं की काहीही मिळत अस वाटत यांना. आणि अस ही यांच महामंडळ  तोट्यात च चालुय की. भ्रष्टाचार केला आणि सेवा ही नाही तर नफा येणार कसा... करा म्हणाव बस खाजगी मग नफा मिळेल मग पगार वाढेल. नाहीतर बसा तुमच्यावाचून काहीही अडत नाही."
      "तुमच्यावाचून काहीही अडत नाही" हे वाक्य घोळत राहील आणि त्याक्षणी  मला सामान्य नागरिकांची ही व्याख्या समजली. आणि ते अत्यंत सुजाण असले तरी सगळी दुनियादारी पहिली नसावेत अस वाटल आणि यांचं फिरण सुद्धा पुणे आणि त्यापेक्षा वरील शहर अस असावं. भ्रष्टाचार आणि राजकीय पोळी भाजणे हा एक प्रकार सोडला तर बाकी मुद्द्यात फार काही विशेष दम वाटला नाही. पण त्यावेळी फार आकडेवारी माझ्याकडे नव्हती म्हणून विषय सोडून दिला.
        ऐन दिवाळी मधे माझ्या ओळखीतले किमान २५ जण घरी जाऊ शकले नाहीत हे मला माहीत होत. बऱ्याच जणांना खाजगी ट्रॅव्हल्स त्यात स्लीपर, सेमी स्लीपर, एसी ऑप्शन आहेत किंवा ट्रेन आहेत म्हणून अस वाटत. पण काही ढोबळ आकडेवारी प्रसिद्ध केली गेली होती त्यात वाचण्यात आल की महाराष्ट्रात ४५ ते ५० हजार खेडी आहेत आणि त्यात महत्वाचे जिल्हे, तालुके आणि मोठी गाव अशी १५-२० हजार गाव सोडली तर बाकी ठिकाणी ट्रेन, आणि खाजगी ट्रॅव्हल्स चां आता पर्यंत अस्तित्व ही नव्हत. खेड्यातली लोक गरीब असतात त्यांना उच्च राहणीमान परवडत  नाही हा एक शहरी गैरसमज आहे, पैसा असला तरी लाल डबा हा एकमेव पर्याय असलेली हजारो गाव आहेत. कामगार संघटना भरवतात हे काही अंशी खर असल तरी त्यात तथ्य आहेच की. सर्वात कमी पगार घेणारी संघटना काढल्या तर महामंडळ नक्की पहिल्या पाचात असेल. ९ ते १६ हजार या दरम्यान जास्तीत जास्त लोक आहेत. आणि प्रश्न राहिला नफ्याचा. एक माणूस असेल तरी ती गाडी गेली पाहिजे या तत्वावर गाडी चालते. नफा नाही तर सेवा हा मूळ उद्देश घेऊन ती रस्ता धरते. त्यात नेते, स्वतंत्र सैनिक, अपंग, वृध्द यांना सवलत देणारी एक तरी खाजगी गाडी शोधून दाखवली तरी त्यांना जागच्या जागी बक्षीस. सणासुदीला ट्रॅव्हल्स जेव्हा अव्वाच्या सव्वा दर वाढवून खाजगी वाले पैसे छापत असतात तेव्हा कित्येक जादा गाड्या सोडून लोकांची सोय बघायचं काम ही लाल परी करते. खाजगी मधे किमान वाहक चालक यांची उत्तम काळजी घेतली जाते, ऑन ड्युटी गाडी मधे झोपलेले ड्रायव्हर मी स्वतः पाहिले आहेत.
मिनी, आराम, निम आराम, एशियाड अशा १७००० गाड्या मधून रोज सरासरी ७० लाख प्रवासी घेऊन जाणारी संघटनेची कदर आपण केली तरी फरक काय पडला. अर्थात राजकीय पोळी मुळे बस मधे सुधारणा कमी आहेत पणं आता ती हळु हळु कात टाकत आहे. लाल डबा ओळख पुसून शिवनेरी, शिवशाही किंवा नवीन अश्वमेध अशा नवीन नावांनी रंगांनी आपल्याला भेटत आहेत. लवकरच वायफाय किंवा स्लीपर सुद्धा आपल्यात येत आहेत. आता याचा मोबदला त्यांच्या खऱ्या कामगारांना मिळत नाही हेच आपल दुर्दैव. ते सरकार कोणताही असो. आता यात नाईलाज असेल किंवा नाकर्तेपणा. म्हणून नाक दाबून तोंड उघडाव हा त्यांचा प्रयत्न असावा. ते कितपत उघडेल यावर शंका आहे. फार ही नका देऊ हो तो निदान श्रमाच चीज वाटू द्या भिक नको. असो आपण बोलणार किती आणि कोणाला कारण खाकी रंगाच नशीब च ते आहे सगळ्या रंगात रंगून यांचा रंग च दिसत नाही असो.
      या लाल परी चा प्रवास हळूवार असला तरी नक्कीच वाखानण्याजोगा आहे एक च गाणं आठवत राहत -
      "लाल छडी मैदान खडी, क्या खूब लडी क्या खूब ल डी"

पण हिला अजून समृध्द करायचं असेल तर थोडा है बस थोडा करने की जरुरत है...!!

©प्रसन्न कुलकर्णी [Pk]

Comments

Popular Post

रामाच्या निमित्ताने काहीस

वारी १ : यत्र योगेश्वरः कृष्णो...!!

सावली माडगूळकरांची...!!